शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या शिक्षकाची पाणी वाचविण्याची अनोखी चळवळ

By admin | Updated: September 28, 2015 23:52 IST

मिलिंद यादव यांचा प्रयत्न : वर्षाच्या परिश्रमाला आता मिळतेय बळ

संदीप आडनाईक -कोल्हापूर -पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे, ती जपून वापरा असा संदेश दुसऱ्यांना सांगणारे अनेकजण भेटतील; परंतु त्यासाठी स्वत:पासून प्रयत्न करणारा विरळाच. कोल्हापुरातील शिक्षक मिलिंद यादव मात्र याला अपवाद आहेत. काही वर्षांपूर्वी शाळेच्या परिसरातील पाण्याचे वाहते नळ बंद करण्यास त्यांनी प्रारंभ केला. त्यांच्या या परिश्रमाला आता कुठे बळ मिळू लागले आहे. मिलिंद हे कोल्हापुरातील सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय चळवळीत अग्रेसर असलेले नाव. प्रिन्स शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये कलाशिक्षक. कोल्हापुरातील अनेक चळवळींना त्यांनी जन्म दिला, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. जीवन बोडकेसारख्या अवघ्या सहा मित्रांच्या मदतीने मूर्तीदान, निर्माल्य दान या चळवळीला १९८५ मध्ये प्रारंभ केला होता. चिल्लर पार्टीसारख्या उपक्रमातून लहान मुलांमध्ये चित्रपट चळवळ जोपासण्याचा ते प्रयत्न करत आहेत. पारंपरिक खेळ, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू, दुर्मीळ बियांचे जतन, खतनिर्मिती असे विविध प्रयोग आणि चळवळ त्यांच्या प्रयत्नातून सुरू झाल्या आहेत. विज्ञान प्रबोधिनी, निसर्गमित्र यासारख्या संस्थांची पाणी वाचविण्याची मोहीमही दहा वर्षांपूर्वीच कोल्हापुरात सुरू झाली. आता त्याला बळ मिळू लागले आहे. जुना बुधवार पेठेतून शाळेला जाता-येता या परिसरातील महिला आणि नागरिक घरासमोरील पाण्याचे नळ गरज नसताना सुरू ठेवतात. यामुळे कितीतरी पाणी वाया जाते, हे मिलिंद यांच्या लक्षात आले. सुरुवातीला अनेकांना त्यांनी समजावून सांगितले; परंतु नंतर मात्र त्यांनी स्वत:च ते नळ बंद करण्यास सुरुवात केली. गेली काही वर्षे सातत्याने ते न थकता हे काम करत आले आहेत. शाळेतील एका पाण्याच्या नळातून गळणारे पाणी किती वाया जाते याचे मिलिंद यांनी एकदा चित्रीकरण केले, तेव्हा एका मिनिटात २५० मिलीलिटर पाणी वाया गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. मग एका तासात वाया गेलेल्या १५ लिटर पाण्याच्या हिशेबात महानगरपालिकेला वर्षाला ५६२९ रुपये इतके विनाकारण भरावे लागल्याचे लक्षात आल्यानंतर मिलिंद यांनी परिसरातील किती ठिकाणच्या नळाचे पाणी वाया जाते, याचा अभ्यास सुरू केला आणि त्याबाबत स्वत:च जनजागृती सुरू केली. त्यांनी स्वत:च्या शाळेत विद्यार्थी, माता पालक यांना पाणी वाचविण्यासंदर्भात तसेच दुष्काळाची गंभीर स्थिती दाखविण्यासाठी स्लाईड शोचे आयोजन केले. त्यांच्या प्रयत्नामुळे बचत गटाच्या महिलांनी गल्लोगल्ली फिरून ‘पाणी जपून वापरा’ असा संदेश द्यायला सुरुवात केली. मिलिंद यादव यांच्यासारख्या एका व्यक्तीच्या या छोटाशा प्रयत्नामुळे भविष्यात ही मोठी चळवळ निर्माण होईल. कोल्हापूरच्या शिक्षकाची पाणी वाचविण्याची अनोखी चळवळमिलिंद यादव यांचा प्रयत्न : वर्षाच्या परिश्रमाला आता मिळतेय बळ संदीप आडनाईक ल्ल कोल्हापूरपाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे, ती जपून वापरा असा संदेश दुसऱ्यांना सांगणारे अनेकजण भेटतील; परंतु त्यासाठी स्वत:पासून प्रयत्न करणारा विरळाच. कोल्हापुरातील शिक्षक मिलिंद यादव मात्र याला अपवाद आहेत. काही वर्षांपूर्वी शाळेच्या परिसरातील पाण्याचे वाहते नळ बंद करण्यास त्यांनी प्रारंभ केला. त्यांच्या या परिश्रमाला आता कुठे बळ मिळू लागले आहे. मिलिंद हे कोल्हापुरातील सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय चळवळीत अग्रेसर असलेले नाव. प्रिन्स शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये कलाशिक्षक. कोल्हापुरातील अनेक चळवळींना त्यांनी जन्म दिला, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. जीवन बोडकेसारख्या अवघ्या सहा मित्रांच्या मदतीने मूर्तीदान, निर्माल्य दान या चळवळीला १९८५ मध्ये प्रारंभ केला होता. चिल्लर पार्टीसारख्या उपक्रमातून लहान मुलांमध्ये चित्रपट चळवळ जोपासण्याचा ते प्रयत्न करत आहेत. पारंपरिक खेळ, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू, दुर्मीळ बियांचे जतन, खतनिर्मिती असे विविध प्रयोग आणि चळवळ त्यांच्या प्रयत्नातून सुरू झाल्या आहेत. विज्ञान प्रबोधिनी, निसर्गमित्र यासारख्या संस्थांची पाणी वाचविण्याची मोहीमही दहा वर्षांपूर्वीच कोल्हापुरात सुरू झाली. आता त्याला बळ मिळू लागले आहे. जुना बुधवार पेठेतून शाळेला जाता-येता या परिसरातील महिला आणि नागरिक घरासमोरील पाण्याचे नळ गरज नसताना सुरू ठेवतात. यामुळे कितीतरी पाणी वाया जाते, हे मिलिंद यांच्या लक्षात आले. सुरुवातीला अनेकांना त्यांनी समजावून सांगितले; परंतु नंतर मात्र त्यांनी स्वत:च ते नळ बंद करण्यास सुरुवात केली. गेली काही वर्षे सातत्याने ते न थकता हे काम करत आले आहेत. शाळेतील एका पाण्याच्या नळातून गळणारे पाणी किती वाया जाते याचे मिलिंद यांनी एकदा चित्रीकरण केले, तेव्हा एका मिनिटात २५० मिलीलिटर पाणी वाया गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. मग एका तासात वाया गेलेल्या १५ लिटर पाण्याच्या हिशेबात महानगरपालिकेला वर्षाला ५६२९ रुपये इतके विनाकारण भरावे लागल्याचे लक्षात आल्यानंतर मिलिंद यांनी परिसरातील किती ठिकाणच्या नळाचे पाणी वाया जाते, याचा अभ्यास सुरू केला आणि त्याबाबत स्वत:च जनजागृती सुरू केली. त्यांनी स्वत:च्या शाळेत विद्यार्थी, माता पालक यांना पाणी वाचविण्यासंदर्भात तसेच दुष्काळाची गंभीर स्थिती दाखविण्यासाठी स्लाईड शोचे आयोजन केले. त्यांच्या प्रयत्नामुळे बचत गटाच्या महिलांनी गल्लोगल्ली फिरून ‘पाणी जपून वापरा’ असा संदेश द्यायला सुरुवात केली. मिलिंद यादव यांच्यासारख्या एका व्यक्तीच्या या छोटाशा प्रयत्नामुळे भविष्यात ही मोठी चळवळ निर्माण होईल. स्लाईड शोमिलिंद यादव यांनी रंकाळा परिसरातील बंद न केलेल्या नळाच्या वाहत्या पाण्यामुळे पाण्याचा कसा अपव्यय होतो, याचे चित्रीकरण केले आहे. १४ मिनिटांचा हा स्लाईड शो गणेशोत्सवात दाखविण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला आहे.