शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
5
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
6
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
7
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
8
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
9
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
10
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
11
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
12
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
13
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाहीतर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
14
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
15
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
16
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
17
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...
18
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
19
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
20
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले

व्हॅली क्रॉसिंगद्वारे हवेत तरंगत अनोखा विवाह

By admin | Updated: July 30, 2016 00:33 IST

जयदीप, रेश्मा यांचा संकल्प : शाहूवाडीतील भाततळीत उद्या साहसी सोहळा

कोल्हापूर : वेस्टर्न माउंटन स्पोर्टस व हिल रायडर्स अ‍ॅँड हायकर्स गु्रपचे सदस्य जयदीप गुणाजीराव जाधव व पाडळी खुर्दची रेश्मा पाटील हे दोघे साहसी पद्धतीने शाहूवाडीतील भाततळी परिसरातील जखनाईचा कडा येथे उद्या, रविवारी दुपारी १२ वाजता विवाहबद्ध होत आहेत. ते गिर्यारोहणातील व्हॅली क्रॉसिंग तंत्र वापरून हवेत तरंगत लग्न करणार आहेत. गेल्या १७ वर्षांपासून वेस्टर्न माउंटन व हिल रायडर्स गु्रपच्या माध्यमातून जयदीप जाधवने गिर्यारोहणाची व भटकंतीची आवड सांभाळली. त्यामुळे जयदीपने आपल्या जीवनातील महत्त्वपूर्ण क्षण म्हणजेच विवाह हासुद्धा गिर्यारोहणाच्या तंत्राने व्हावा, असे मनोगत गु्रपचे विनोद कांबोज, प्रमोद पाटील व मुंबईतील मलय अ‍ॅडव्हेंचर्सचे मेहबूब मुजावर या ज्येष्ठांपुढे व्यक्त केले. यासाठी जागेची पाहणी करून विशाळगडचा पवित्र परिसर निवडला. हे निवडण्यामागे १७ वर्षांपूर्वी पन्हाळा-पावनखिंड या मोहिमेने जयदीपने गिर्यारोहणाची सुरुवात केली होती.प्रथम जयदीपने ही साहसी विवाहाची गोष्ट घरच्यापुढे बोलून दाखविली. त्याला घरच्यांनी विरोध केला; पण त्याच्या गिर्यारोहणाच्या वेडापायी त्यांनीही होकार दर्शविला. गिर्यारोहणाची आवड असणारी रेश्मा पाटील हिलाही त्यांनी ही साहसी लग्नाची कल्पना सांगितली. त्यावर तीही तयार झाली. त्या दृष्टीने तिच्या नातेवाइकांनीही या अनोख्या विवाहास मान्यता दिली. हा विवाह आता उद्या दुपारी १२ च्या मुहूर्तावर होत आहे. तो शाहूवाडीतील भाततळी परिसरात जखनाईचा कडा आहे. त्यावर गिर्यारोहणातील व्हॅली क्रॉसिंगचे तंत्र वापरून करण्यात येणार आहे. यासाठी सर्व साधनसामग्रीची जय्यत तयारी केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात असा विवाह प्रथमच होत आहे. त्यामुळे या विवाहाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.