शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

विनाअट सरसकट कर्जमाफी द्या

By admin | Updated: June 27, 2017 19:00 IST

श्रमिक मुक्ती दलाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. २७ : राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली असली तरी अटीमुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहणार आहेत. यासाठी विनाअट सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

शेतीमालाला उत्पादनखर्चावर आधारीत भाव नाही, शेतीमाल प्रक्रिया उद्योग नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर दिवसेंदिवस कर्जाचा डोंंगर वाढत आहे. या कर्जाला कंटाळून शेतकरी आत्महत्येकडे वळत आहे. कर्जमाफी करून त्यांच्या गळ्याभोवतीचा फास काढून टाकण्याची मागणी शेतकरी करत आहे. शेतकऱ्यांनी संपाचे हत्यार उपसून आंदोलन सुरू केल्यानंतर सरकारने कर्जमाफीची घोषणा केली; पण त्यातही ‘तत्त्वत: ’ व ‘सरसकट’ या दोन शब्दाने शेतकऱ्यांचा घात करण्यास सुरुवात केली आहे. सरकारने शब्दांचा खेळ बंद करून प्रत्यक्षात कर्जमाफी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

टाऊन हॉल येथून मोर्चास सुरुवात झाली. मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हाप्रमुख मारुती पाटील, डी. के. बोडके, शंकर पाटील, आनंदा आमकर, अशोक पाटील, वसंत पाटील, पांडुरंग पवार, दाऊद पटेल, आनंदा गोटल, आकाराम झोरे, भगवान बोडके, पांडुरंग कोठारे, जगन्नाथ कुरतुडकर, दगडू पाटील आदी उपस्थित होते.