शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

विनाअट सरसकट कर्जमाफी द्या

By admin | Updated: June 27, 2017 19:00 IST

श्रमिक मुक्ती दलाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. २७ : राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली असली तरी अटीमुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहणार आहेत. यासाठी विनाअट सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

शेतीमालाला उत्पादनखर्चावर आधारीत भाव नाही, शेतीमाल प्रक्रिया उद्योग नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर दिवसेंदिवस कर्जाचा डोंंगर वाढत आहे. या कर्जाला कंटाळून शेतकरी आत्महत्येकडे वळत आहे. कर्जमाफी करून त्यांच्या गळ्याभोवतीचा फास काढून टाकण्याची मागणी शेतकरी करत आहे. शेतकऱ्यांनी संपाचे हत्यार उपसून आंदोलन सुरू केल्यानंतर सरकारने कर्जमाफीची घोषणा केली; पण त्यातही ‘तत्त्वत: ’ व ‘सरसकट’ या दोन शब्दाने शेतकऱ्यांचा घात करण्यास सुरुवात केली आहे. सरकारने शब्दांचा खेळ बंद करून प्रत्यक्षात कर्जमाफी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

टाऊन हॉल येथून मोर्चास सुरुवात झाली. मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हाप्रमुख मारुती पाटील, डी. के. बोडके, शंकर पाटील, आनंदा आमकर, अशोक पाटील, वसंत पाटील, पांडुरंग पवार, दाऊद पटेल, आनंदा गोटल, आकाराम झोरे, भगवान बोडके, पांडुरंग कोठारे, जगन्नाथ कुरतुडकर, दगडू पाटील आदी उपस्थित होते.