शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

एकीअभावी मराठा नेतृत्वाला पंतप्रधानपद दूर

By admin | Updated: January 7, 2017 01:26 IST

विजय नाईक : कोल्हापूर प्रेस क्लबच्या विविध पुरस्कारांचे वितरण; शरद पवार सर्वपक्षीय संबंध असणारे नेते

कोल्हापूर : सत्तर वर्षांत उत्तर प्रदेश, पंजाब, कर्नाटक, गुजरात आदी राज्यांतील नेतृत्वाला पंतप्रधानपदाची संधी मिळाली; परंतु महाराष्ट्राला प्रगल्भ नेतृत्व, सांस्कृतिक, व्यापार, राजकीय व संत-महंतांचा वारसा असूनही दिल्लीच्या धोरणाने मराठा नेतृत्वाला एकत्र येऊ दिले नाही. मराठा नेतृत्वातही एकीचा अभाव आहे. त्यामुळे आजपर्यंत मराठी नेता पंतप्रधानपदापर्यंत पोहोचू शकला नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक यांनी शुक्रवारी केले. पत्रकार दिनानिमित्त राजर्षी शाहू स्मारक भवन येथे कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे आयोजित समारंभात पुरस्कार वितरणप्रसंगी ते ‘पत्रकारिता आणि भारतीय राजकारण’ यावर बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार राजू शेट्टी होते. मान्यवरांच्या हस्ते ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमाचे पूजन करण्यात आले. यावेळी ‘उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारा’ने विजय पाटील (दैनिक पुढारी), सुनील काटकर (टीव्ही नाईन कॅमेरामन), ‘उत्कृष्ट छायाचित्रकार’ पुरस्काराने पांडुरंग पाटील (दैनिक पुण्यनगरी) यांना गौरविण्यात आले. रोख ५००१ व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.ज्येष्ठ पत्रकार नाईक म्हणाले, दिल्लीत महाराष्ट्राच्या नेतृत्वाचे तीन टप्पे दिसतात. त्यामध्ये यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार यांनी महत्त्वाची खाती सांभाळली. यशवंतराव चव्हाण २३ वर्षे दिल्लीत होते. वसंतदादा पाटील यांना तर ‘दिल्ली’ घाबरायची. शरद पवार यांचा गेल्या २२ वर्षांपासून दिल्लीशी संबंध आहे. ‘सर्वपक्षीय संबंध असलेला एकमेव नेता’अशी त्यांची ओळख आहे. या तिघांचेही दिल्लीच्या राजकारणात मोठे योगदान आहे; तरी एकही मराठा नेतृत्व पंतप्रधानपदापर्यंत पोहोचले नाही. नाईक यांनी भाषणादरम्यान दिल्लीत पत्रकारिता करत असताना आलेले अनुभव, विविध किस्से, राजकीय स्थित्यंतरे, महाराष्ट्रातील राजकारण यांचा मागोवा घेतला. दरम्यान, जाहिरात क्षेत्रातील विशेष कार्याबद्दल अलंकार पब्लिसिटीचे राजाराम शिंदे तसेच दै. ‘तरुण भारत’चे निवासी संपादक जयसिंग पाटील, ‘लोकमत’चे उपवृत्त संपादक चंद्रकांत कित्तुरे, ‘महाराष्ट्र टाईम्स’चे सहायक संपादक गुरुबाळ माळी, ‘दै. पुढारी’च्या प्रिया सरीकर, ‘केसरी’च्या अश्विनी टेंबे यांचा सत्कार करण्यात आला. खासदार राजू शेट्टी म्हणाले, मनमोहन सिंग लोकनेते नसले तरी त्यांच्या कार्यकाळात विरोधक व सत्ताधाऱ्यांत संवाद होता. विरोधकांचे प्रश्न, मुद्दे समजून घेतले जायचे. एखाद्या मुद्द्यावर गटनेत्यांच्या बैठका, पक्षप्रमुखांशी चर्चा व्हायची; परंतु सध्या हा संवाद होत नाही. त्यासाठी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजनही पुढाकार घेत नाहीत. विरोधी पक्ष हा लोकशाहीचा प्रमुख घटक आहे, परंतु त्यांच्याशी संवाद तुटल्याचे जाणवते. इंदिरा गांधींच्या काळाची प्रचिती यावी असे वातावरण संसदेत दिसते. प्रास्ताविकात कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी वर्षभरात राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. ‘महाराष्ट्र टाईम्स’चे निवासी संपादक विजय जाधव यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. शुभदा हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष संतोष पाटील यांनी आभार मानले. बहुमताच्या जोरावर एककल्ली कारभारपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात संवाद हरवत चालला आहे, अशी खंत व्यक्त करत विजय नाईक म्हणाले, पंतप्रधान पत्रकारांशी संवाद साधत नाहीत. याउलट ते थेट फेसबुक, इंस्ट्राग्राम, ‘टिष्ट्वटर’च्या माध्यमातून थेट जनतेशी संपर्क साधतात. संसदेतही ते विरोधकांशी कोणत्याही विषयावर चर्चा करत नाहीत. त्यांच्याकडून बहुमताच्या बळावर एककल्ली कारभार हाकला जात आहे.दिल्लीत मराठा नेतृत्वाचे खच्चीकरणचसंत तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगात ‘मराठा तितुका मिळवावा’ असे म्हटले आहे. सध्या मात्र दिल्लीच्या राजकारणात मराठा नेतृत्वाचे खच्चीकरणच करण्यात येत आहे. यशवंतराव चव्हाण यांनी सुरुवातीच्या काळात उपपंतप्रधानपद भूषविले. मात्र, त्यानंतरच्या नेत्यांना दिल्लीतील राजकारणामुळे पंतप्रधानपदाची संधी मिळालेली नाही.