शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
4
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
5
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
6
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
7
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
8
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
9
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
10
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
13
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
14
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
15
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
16
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
17
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
18
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
19
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
20
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...

भुयारी मार्ग, उड्डाणपुलांची कोल्हापूरला गरज : चंद्रकांतदादा

By admin | Updated: May 10, 2017 17:49 IST

आराखडा तयार करा, कोट्यवधींचा निधी देऊ

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर , दि. १0 : खासबाग येथे भुयारी मार्ग तसेच वाहतुकीची कोंडी होणाऱ्या मार्गांवर उड्डाणपूल केल्यास शहराची वाहतुकीच्या कोंडीतून मुक्तता करता येणे शक्य असल्याने त्याप्रमाणे उपाययोजना करा, एकात्मिक वाहतूक व्यवस्थापनाचा आराखडा तयार करा, लागेल तितका निधी शासनाकडून देऊ, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मंगळवारी (दि. ९) पोलीस मुख्यालयात झालेल्या वाहतूक समस्येसंदर्भातील बैठकीत केल्या.

शहरातील वाहतुकीच्या आगामी नियोजनाबाबत शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सादरीकरण केले. त्यामध्ये त्यांनी या उपाययोजना सुचविल्या होता. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने शहरातील वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी बैठक झाली. शहरात वाहतुकीची कोंडी होणारी एकूण १९ ठिकाणे असून, त्यांपैकी छोट्या स्वरूपातील उपाययोजना तातडीने करून कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न करावेत, अशाही सूचना मंत्री पाटील यांनी दिल्या. खासबाग येथे वाहतुकीची नेहमीच कोंडी होत असल्याने तेथे पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग आवश्यक असल्याची सूचना शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी मांडली.

शहरातील रस्त्यांची रुंदी वाढविणे आवश्यक आहे. तसेच दाभोळकर कॉर्नर ते व्हीनस कॉर्नर, बिंदू चौक ते मिरजकर तिकटी, गंगावेश चौक ते रंकाळा टॉवर या तीन मार्गांवर उड्डाणपुलाची आवश्यकता आहे. या तिन्हीही मार्गांवर व्यापारपेठा, शाळा, हॉटेल्स आहेत. तसेच या मार्गांवरूनच शहराबाहेर जाणारी वाहतूक होत असल्याचेही सरनोबत यांनी सादरीकरणात सांगितले.

नागपूरच्या धर्तीवर कोल्हापूरचा विकास करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगून वाहतुकीची व्यवस्था सुरळीत करण्यासाठी भुयारी मार्ग, उड्डाणपूल आवश्यक असल्याचे सांगितले. यासाठी शहराचा एकात्मिक वाहतूक आराखडा तयार करा. त्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी लागणारा कोट्यवधी रुपयांचा निधी देण्याची शासनाची तयारी असल्याचेही मंत्री पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.