शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोड मजूर बनले शेतमजूर

By admin | Updated: May 4, 2016 00:06 IST

दुष्काळाचा परिणाम : गळीत हंगाम संपूनही मजूर अद्याप गावातच

गणपती कोळी --कुरूंदवाड --उसाचा गळीत हंगाम संपण्यापूर्वीच ऊसतोड मजुरांना गावाकडे परतीचा वेध लागलेला असतो़ यंदाचा गळीत हंगाम संपून आठवडा संपला तरी अनेक भागात ऊसतोड मजूर अद्याप गावातच आहेत़ गावाकडे पाणीच नसल्याने जनावरे कशी जगवायची म्हणून याच भागात राहून शेतीच्या कामाच्या शोधात आहेत़ कोल्हापूर जिल्हा पाण्यासाठी समृध्द असल्याने या भागात ऊस शेती मोठी आहे़ त्यामुळे या पिकांवर प्रक्रिया करणारे साखर कारखानेही मोठ्या प्रमाणात आहेत. याउलट इंडी या भागातील शेतकऱ्यांची शेती मोठी असूनही शेतीसाठी पाण्याची कमतरता असल्याने या भागातील बहुतांश शेतकरी मजुरी मिळविण्यासाठी ऊसतोडीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात सहा ते सात महिने जनावरे व कुटुंबाला घेऊन ऊसतोडीच्या निमित्ताने स्थलांतर करत असतात़मजूरांच्या गावाकडे शेतीवाडी असूनही पाण्याअभावी पावसाळी पिकेच घेतली जातात़ संसाराचा गाढा ऊस ठेकेदार मुकादम, वाहनमालक यांच्याकडून उचलीवर व जनावरांच्या दुभत्यावर चालतो़ उसाचा गळीत हंगाम संपत आला की या मजुरांना गड्या आपला गाव बरा म्हणून गावाकडे परतण्याची ओढ लागलेली असते़ यंदा बीड, उस्मानाबाद, लातूर, कर्नाटकातील इंडी, जालना या जिल्ह्यांत दुष्काळाची तीव्रता वाढली आहे़ कुपनलिका, विहिरी आटल्याने माणसांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली आहे़ त्यामुळे जनावरांना चारा तर नाहीच शिवाय त्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणेही कठीण बनले आहे़ त्यामुळे ऊसतोडीसाठी आलेल्या मजुरांनी गावाकडे असलेल्या नातेवाईकांशी संपर्क करुन परिस्थितीची माहिती घेऊन किमान एखादा वळवाचा पाऊस पडून विहीर, कूपनलिकांना पाणी येईपर्यंत ऊसतोडीच्या भागातच राहण्याचा निर्णय घेतला आहे़ ऊसतोड करणाऱ्या मजुरांना शेतातील मजुरीची कामे फारसे जमत नाही़ मात्र परिस्थितीमुळे जनावरांच्या चाऱ्यासाठी व रोजचा चरितार्थ चालविण्यासाठी शेतीच्या कामाच्या शोधात लागले आहेत़ दुष्काळाची छाया कोल्हापूर जिल्ह्यातही जाणवत असून, नदीतील पाणी आटल्याने पाण्याअभावी या भागातील उभे पिकही करपू लागले आहेत़ त्यामुळे शेतीची कामेही ठप्प असल्याने या ऊसतोड मजुरांना मजुरीअभावीही हाल सोसावे लागत आहे़