शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
5
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
6
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
7
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
8
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
9
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
10
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
11
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
12
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
13
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
14
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
15
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
16
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
17
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
18
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
19
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
20
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा

जयसिंगपूरसाठी भुयारी गटर योजना

By admin | Updated: March 3, 2015 21:31 IST

६० ते ७० कोटी खर्च अपेक्षित : सांडपाण्याचा प्रश्न निकाली निघणार; सांडपाणी प्रक्रिया केंद्रही उभारणार

संदीप बावचे - जयसिंगपूर -कोणतीही करवाढ न करता नगरपालिकेने शहरात विकासकामे राबविण्याचा निर्णय घेऊन आणखी एक विकासात्मक पाऊल टाकले आहे. शहरात भुयारी गटर योजना राबविण्यात येणार असून, ६० ते ७० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ही योजना राबवीत असताना सांडपाणी प्रक्रिया केंद्रही उभारले जाणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची असणाऱ्या या योजनेचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे.नळपाणी योजनेबरोबरच शहराला भुयारी गटर योजना राबविण्याच्या दृष्टिकोनातून जयसिंगपूर पालिकेने पाऊल टाकले आहे. शहरात आंबेडकर सोसायटी, शाहूनगर, संभाजीनगर या तीन मुख्य ठिकाणी नाले असून, त्याचे सांडपाणी शहरातील स्टेशन रोडवर एकत्रित होते. २० वर्षांत वाढीव वसाहतीमुळे शहराच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे. परिणामी शहराला भुयारी गटर योजनेची गरज भासू लागली. आरोग्याच्या दृष्टीने भुयारी गटर योजना महत्त्वाची असल्याने नगरपालिकेने सुमारे ६० ते ७० कोटी रुपये अपेक्षित खर्च असणारी ही योजना राबविण्याचा निर्णय घेऊन नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय विशेष सभेत योजनेसाठी तीस कोटींची तरतूद केली आहे. सुमारे शंभर किलोमीटर अंतराच्या नलिका टाकण्याचे नियोजन आहे. योजना राबविण्याच्या दृष्टिकोनातून सर्वेक्षण करण्याचे काम सुरू असून त्यानंतरच शहरात किती सांडपाणी साचते, हे सांडपाणी निचरा करण्यासाठी किती खर्च, योजनेसाठी किती कोटी रुपयांचा निधी अपेक्षित असेल हे समजणार आहे. योजना राबवीत असताना सांडपाणी प्रक्रिया केंद्रही उभारण्याचे नियोजन आहे. जेणेकरून या पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी शेतीसाठी व बागेसाठी तसेच पाणी संस्थांना देऊन पालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सध्या भुयारी गटर योजना आराखडा तयार करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वेक्षण सुरू आहे. असे असले तरी भुयारी गटर योजनेची पाईपलाईन अडचणीची ठरू नये, याचे देखील नियोजन करणे महत्त्वाचे आहे.भुयारी गटर योजनेसाठी आराखडा मंजूर करून तो शासनाकडे पाठविला जाणार आहे. १५ टक्के नगरपालिका, ४५ टक्के शासनाचा निधी अशी ही योजना आहे. योजना मंजुरीनंतर शासनाकडून ३० कोटी रुपयांचा निधी अपेक्षित धरून अर्थसंकल्पात तशी तरतूद केली आहे. सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात आल्यानंतर निश्चितच पालिकेच्या उत्पन्नातही भर पडणार आहे. - हेमंत निकम, मुख्याधिकारी घरगुती सांडपाण्याचा प्रश्न निकालातशहरामध्ये १०० टक्के भुयारी गटर योजना राबविण्यात येणार असल्यामुळे घरगुती सांडपाण्याचा प्रश्न निकालात निघणार आहे. आराखडा तयार करण्यासाठी चार महिन्यांची मुदत आहे. सर्वेक्षणानंतरच अपेक्षित खर्च व येणाऱ्या अडचणी समजणार आहेत. पर्यायाने या योजनेमुळे सांडपाण्याचा प्रश्न निकालात निघेल, अशी अपेक्षा पालिकेकडून व्यक्त केली जात आहे.