शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

जयसिंगपूरसाठी भुयारी गटर योजना

By admin | Updated: March 3, 2015 21:31 IST

६० ते ७० कोटी खर्च अपेक्षित : सांडपाण्याचा प्रश्न निकाली निघणार; सांडपाणी प्रक्रिया केंद्रही उभारणार

संदीप बावचे - जयसिंगपूर -कोणतीही करवाढ न करता नगरपालिकेने शहरात विकासकामे राबविण्याचा निर्णय घेऊन आणखी एक विकासात्मक पाऊल टाकले आहे. शहरात भुयारी गटर योजना राबविण्यात येणार असून, ६० ते ७० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ही योजना राबवीत असताना सांडपाणी प्रक्रिया केंद्रही उभारले जाणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची असणाऱ्या या योजनेचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे.नळपाणी योजनेबरोबरच शहराला भुयारी गटर योजना राबविण्याच्या दृष्टिकोनातून जयसिंगपूर पालिकेने पाऊल टाकले आहे. शहरात आंबेडकर सोसायटी, शाहूनगर, संभाजीनगर या तीन मुख्य ठिकाणी नाले असून, त्याचे सांडपाणी शहरातील स्टेशन रोडवर एकत्रित होते. २० वर्षांत वाढीव वसाहतीमुळे शहराच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे. परिणामी शहराला भुयारी गटर योजनेची गरज भासू लागली. आरोग्याच्या दृष्टीने भुयारी गटर योजना महत्त्वाची असल्याने नगरपालिकेने सुमारे ६० ते ७० कोटी रुपये अपेक्षित खर्च असणारी ही योजना राबविण्याचा निर्णय घेऊन नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय विशेष सभेत योजनेसाठी तीस कोटींची तरतूद केली आहे. सुमारे शंभर किलोमीटर अंतराच्या नलिका टाकण्याचे नियोजन आहे. योजना राबविण्याच्या दृष्टिकोनातून सर्वेक्षण करण्याचे काम सुरू असून त्यानंतरच शहरात किती सांडपाणी साचते, हे सांडपाणी निचरा करण्यासाठी किती खर्च, योजनेसाठी किती कोटी रुपयांचा निधी अपेक्षित असेल हे समजणार आहे. योजना राबवीत असताना सांडपाणी प्रक्रिया केंद्रही उभारण्याचे नियोजन आहे. जेणेकरून या पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी शेतीसाठी व बागेसाठी तसेच पाणी संस्थांना देऊन पालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सध्या भुयारी गटर योजना आराखडा तयार करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वेक्षण सुरू आहे. असे असले तरी भुयारी गटर योजनेची पाईपलाईन अडचणीची ठरू नये, याचे देखील नियोजन करणे महत्त्वाचे आहे.भुयारी गटर योजनेसाठी आराखडा मंजूर करून तो शासनाकडे पाठविला जाणार आहे. १५ टक्के नगरपालिका, ४५ टक्के शासनाचा निधी अशी ही योजना आहे. योजना मंजुरीनंतर शासनाकडून ३० कोटी रुपयांचा निधी अपेक्षित धरून अर्थसंकल्पात तशी तरतूद केली आहे. सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात आल्यानंतर निश्चितच पालिकेच्या उत्पन्नातही भर पडणार आहे. - हेमंत निकम, मुख्याधिकारी घरगुती सांडपाण्याचा प्रश्न निकालातशहरामध्ये १०० टक्के भुयारी गटर योजना राबविण्यात येणार असल्यामुळे घरगुती सांडपाण्याचा प्रश्न निकालात निघणार आहे. आराखडा तयार करण्यासाठी चार महिन्यांची मुदत आहे. सर्वेक्षणानंतरच अपेक्षित खर्च व येणाऱ्या अडचणी समजणार आहेत. पर्यायाने या योजनेमुळे सांडपाण्याचा प्रश्न निकालात निघेल, अशी अपेक्षा पालिकेकडून व्यक्त केली जात आहे.