शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

कारभारवाडीची सर्व शेती ‘ठिबक’खाली

By admin | Updated: January 30, 2015 23:16 IST

पाण्याची ४० टक्के बचत : उत्पादनात ३० टक्क्यांनी वाढ; संगणकीकृत प्रकल्प

दीपक मेटील - सडोली खालसा-- पाण्याच्या अतिवापरामुळे शेती नापीक होऊन उत्पादन क्षमता घटत आहे. त्यामुळे शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. उत्पादन वाढीसाठी व पाण्याचा अतिवापर टाळण्यासाठी कारभारवाडी (ता. करवीर) या गावातील शिवाजी पाटील पाणीपुरवठा संस्थेने सर्व शेती ठिबक सिंचनाखाली आणली आहे. त्यामुळे पाण्याची ४० टक्के बचत, तर उत्पादनात ३० टक्के वाढ होणार आहे. हा ठिबक सिंचन प्रकल्प संपूर्ण संगणकीकृत असल्याने पिकांना पाणी, औषधे, खते एकाच क्लिकवर मिळणार आहेत.कारभारवाडी, सडोली (खालसा) गावातील उपगाव येथील लोकसंख्या ४५० असून, ६० कुटुंबे आहेत. गावासाठी १०५ हेक्टर इतके जमिनीचे क्षेत्र असून ऊस, भात, भुईमूग, सोयाबीन, सूर्यफुल व अन्य पिके घेतली जातात. पिकांना भोगावती नदीवरून संस्थेमार्फत पाणीपुरवठा केला जातो. योग्य नियोजनामुळे या संस्थेचा खर्च वजा जाता जिल्हा बॅँकेत ठेवी आहेत. पाण्याचा अतिवापर व लोडशेडिंग या कारणाने योग्य उत्पादन मिळत नसल्यामुळे गावातील तरुण शेतकऱ्यांनी इफको खत कंपनी, कृषी विभाग यांच्या माध्यमातून ठिबक सिंचनचा एकमुखी निर्णय घेतला.या प्रकल्पासाठी एकरी एक लाख रुपये खर्च येणार आहे. नाबार्ड व कोल्हापूर जिल्हा बॅँक यांच्या माध्यमातून सखाराम पाटील, हरी रामजी पाटील, भैरवनाथ कारभारवाडी, भैरवनाथ गाडेगोंडवाडी या विकास संस्थांकडून ७२ लाख रुपये कर्ज मिळाले आहे. हे काम युद्धपातळीवर सुरू असून ते लवकरच पूर्ण होईल. या प्रकल्पामुळे ४० टक्के पाणीवापर कमी व ३० टक्के उत्पादन वाढणार आहे. ‘एकी हेच बळ’, या म्हणीप्रमाणे कारभारवाडी गावचा हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आहे.या उपक्रमासाठी इफको खत कंपनी, केडीसीसी बॅँक, नाबार्ड बॅँक, कृषी विभाग, भोगावती कारखाना, विकास संस्था यांचे सहकार्य लाभले आहे.एकरी ४१ हजार रुपयांचे अनुदानया प्रकल्पासाठी एकरी एक लाख खर्च येणार आहे, तर महाराष्ट्र राज्य १५ हजार, केंद्र सरकार १५ हजार, भोगावती साखर कारखाना सात हजार, इफको खत कंपनी चार हजार, असे एकूण ४१ हजार प्रति एकर अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे.भोगावती साखर कारखान्याने ठिबक सिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांना एकरी सात हजार रुपये अनुदान दिले असून, शासनाने शंभर टक्के अनुदान देण्याची गरज आहे, तरच पाणी वाचविण्यासाठी सर्व शेतकरी प्रयत्न करतील.- धैर्यशील पाटील (कौलवकर), अध्यक्ष, भोगावती साखर कारखाना.शेतीला कृषी तंत्रज्ञानाची जोड दिल्यास शेती किफायतशीर ठरेल. शेती आदर्श व्यवसाय ठरावा, यासाठी शेतकऱ्यांनी वाडीची सर्व शेती ठिबक सिंचनाखाली आणण्याचा निर्णय घेतला आहे.- प्रा. नेताजी पाटीलअध्यक्ष, कै. शिवाजी पाटील पाणीपुरवठा संस्था.