शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
3
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
4
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
5
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
6
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
7
तिसरा श्रावण शनिवार: तुमची साडेसाती सुरू आहे? अश्वत्थ मारुती पूजनासह ‘हे’ ५ शनि उपाय कराच!
8
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
9
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
10
आरोग्याचा विषय जास्त महत्त्वाचा; पण कबुतरांबाबतही जाणिवा दाखवा : मंत्री लोढा
11
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
12
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
13
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
14
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
15
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
16
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
17
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
18
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
19
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
20
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न

कागल तालुक्यात बिनविरोधचे वारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:19 IST

: गावाच्या विकासासाठी एकत्र येण्याची तयारी अनिल पाटील मुरगूड : राज्यात राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कागल तालुक्यात सध्या ...

:

गावाच्या विकासासाठी एकत्र येण्याची तयारी

अनिल पाटील

मुरगूड : राज्यात राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कागल तालुक्यात सध्या मात्र सामंजस्याचा वेगळाच ट्रेंड बघायला मिळत आहे. १५ जानेवारी रोजी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोधचे वारे वाहू लागले आहे. हळदी, यमगे, कुरुकली, सोनगे, आलाबाद अशा गावात निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न जोरात सुरू आहेत. त्यामुळे गावाच्या विकासासाठी गावपातळीवरील नेत्यांनी घेतलेली सामंजस्याची भूमिका नक्कीच कौतुकास्पद आहे.

कोणतीही निवडणूक असली की कागल तालुक्यात राजकीय ज्वर शिगेला पोहोचतो. अगदी गावातील दूध संस्था असो वा विकास संस्था असो, निवडणूक ठरलेली. त्यातून हेवेदावे, जोरदार रस्सीखेच आणि हमखास हाणामाऱ्या ठरलेल्या. विशेषतः मुरगूड आणि कागल पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काही गावांमध्ये पोलिसांना मोठा बंदोबस्त ठेवावा लागतो. इतकेच नव्हे तर काही गावात निवडणुकीचे काम करणे शासकीय अधिकाऱ्यांना जिकिरीचे बनायचे. यातून आता तालुका बाहेर येतोय, असे सकारात्मक चित्र गेल्या काही निवडणुकांमध्ये दिसत आहे.

सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. सर्वसामान्यांशी निगडित असणारी कामे पूर्ण करण्यासाठी सर्वच गटांना ग्रामपंचायतीवर सत्ता हवी असते. यासाठी अन्य कोणत्याही निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत जोरदार ईर्षा दिसत होती. पण सध्या मात्र चित्र वेगळे दिसत आहे. वरच्या राजकारणात नेते एकमेकांना सांभाळून घेत असतील आणि आपल्या सोयीचे राजकारण करत असतील, तर आपली डोकी का फोडून घ्यायची? असा सूर सर्वसामान्य कार्यकर्त्यांतून उमटत आहे. यातूनच ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा विचार बळावत आहे. कागल तालुक्यात हसन मुश्रिफ, संजय मंडलिक आणि संजय घाटगे हे गट एकत्र आहेत. हे तिन्ही नेतेही अनेक वेळा व्यासपीठावर एकत्र येत आहेत. भविष्यात अनेक निवडणुकीत अशीच समीकरणे दिसतील, यात शंका नाही. समरजित घाटगे गट या तिघांचे टार्गेट आहे. बऱ्याच गावात मुश्रिफ, मंडलिक व संजय घाटगे गटाचे कार्यकर्ते एकत्र येत आहेत. त्यामुळे राजे गटाच्या कार्यकर्त्यांचीही मानसिकता बिनविरोधाची दिसत आहे. गावाच्या विकासासाठी सर्व हेवेदावे विसरून एकत्र येण्याची मानसिकता गावपातळीवरील नेत्यांमध्ये दिसत आहे. जास्तीत जास्त ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, तर कागलमधून जिल्ह्यात नव्हे, तर राज्यात एक सकारात्मक संदेश जाईल हे नक्की!

बिनविरोध अभिमानास्पद

गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील सर्वच गावांना गट-तट न पाहता कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. त्यामुळे गावांचा चेहरामोहरा बदललेला आहे. येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत जर गावपातळीवरील नेत्यांनी एकत्रित येत गाव बिनविरोध केले, तर ते अभिमानास्पद असेल. अशा गावांना शासनाकडून जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न करू.

- ना. हसन मुश्रिफ

ग्रामविकासमंत्री

पेरे पाटलांचा व्हिडीओ व्हायरल

पंधरा दिवसांपूर्वी मुरगूडमध्ये आदर्श ग्रामपंचायतीचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे व्याख्यान होते. त्यामध्ये त्यांनी गावाच्या विकासासाठी निवडणुका बिनविरोध करा, असे आवाहन केले होते. त्यांच्या भाषणाचा व्हिडीओही सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.