शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
3
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
4
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
5
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
6
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
7
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
8
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
9
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
10
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
11
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
12
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
13
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
14
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
15
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
16
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
17
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
18
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
19
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
20
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा

कागल तालुक्यात बिनविरोधचे वारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:19 IST

: गावाच्या विकासासाठी एकत्र येण्याची तयारी अनिल पाटील मुरगूड : राज्यात राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कागल तालुक्यात सध्या ...

:

गावाच्या विकासासाठी एकत्र येण्याची तयारी

अनिल पाटील

मुरगूड : राज्यात राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कागल तालुक्यात सध्या मात्र सामंजस्याचा वेगळाच ट्रेंड बघायला मिळत आहे. १५ जानेवारी रोजी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोधचे वारे वाहू लागले आहे. हळदी, यमगे, कुरुकली, सोनगे, आलाबाद अशा गावात निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न जोरात सुरू आहेत. त्यामुळे गावाच्या विकासासाठी गावपातळीवरील नेत्यांनी घेतलेली सामंजस्याची भूमिका नक्कीच कौतुकास्पद आहे.

कोणतीही निवडणूक असली की कागल तालुक्यात राजकीय ज्वर शिगेला पोहोचतो. अगदी गावातील दूध संस्था असो वा विकास संस्था असो, निवडणूक ठरलेली. त्यातून हेवेदावे, जोरदार रस्सीखेच आणि हमखास हाणामाऱ्या ठरलेल्या. विशेषतः मुरगूड आणि कागल पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काही गावांमध्ये पोलिसांना मोठा बंदोबस्त ठेवावा लागतो. इतकेच नव्हे तर काही गावात निवडणुकीचे काम करणे शासकीय अधिकाऱ्यांना जिकिरीचे बनायचे. यातून आता तालुका बाहेर येतोय, असे सकारात्मक चित्र गेल्या काही निवडणुकांमध्ये दिसत आहे.

सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. सर्वसामान्यांशी निगडित असणारी कामे पूर्ण करण्यासाठी सर्वच गटांना ग्रामपंचायतीवर सत्ता हवी असते. यासाठी अन्य कोणत्याही निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत जोरदार ईर्षा दिसत होती. पण सध्या मात्र चित्र वेगळे दिसत आहे. वरच्या राजकारणात नेते एकमेकांना सांभाळून घेत असतील आणि आपल्या सोयीचे राजकारण करत असतील, तर आपली डोकी का फोडून घ्यायची? असा सूर सर्वसामान्य कार्यकर्त्यांतून उमटत आहे. यातूनच ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा विचार बळावत आहे. कागल तालुक्यात हसन मुश्रिफ, संजय मंडलिक आणि संजय घाटगे हे गट एकत्र आहेत. हे तिन्ही नेतेही अनेक वेळा व्यासपीठावर एकत्र येत आहेत. भविष्यात अनेक निवडणुकीत अशीच समीकरणे दिसतील, यात शंका नाही. समरजित घाटगे गट या तिघांचे टार्गेट आहे. बऱ्याच गावात मुश्रिफ, मंडलिक व संजय घाटगे गटाचे कार्यकर्ते एकत्र येत आहेत. त्यामुळे राजे गटाच्या कार्यकर्त्यांचीही मानसिकता बिनविरोधाची दिसत आहे. गावाच्या विकासासाठी सर्व हेवेदावे विसरून एकत्र येण्याची मानसिकता गावपातळीवरील नेत्यांमध्ये दिसत आहे. जास्तीत जास्त ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, तर कागलमधून जिल्ह्यात नव्हे, तर राज्यात एक सकारात्मक संदेश जाईल हे नक्की!

बिनविरोध अभिमानास्पद

गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील सर्वच गावांना गट-तट न पाहता कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. त्यामुळे गावांचा चेहरामोहरा बदललेला आहे. येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत जर गावपातळीवरील नेत्यांनी एकत्रित येत गाव बिनविरोध केले, तर ते अभिमानास्पद असेल. अशा गावांना शासनाकडून जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न करू.

- ना. हसन मुश्रिफ

ग्रामविकासमंत्री

पेरे पाटलांचा व्हिडीओ व्हायरल

पंधरा दिवसांपूर्वी मुरगूडमध्ये आदर्श ग्रामपंचायतीचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे व्याख्यान होते. त्यामध्ये त्यांनी गावाच्या विकासासाठी निवडणुका बिनविरोध करा, असे आवाहन केले होते. त्यांच्या भाषणाचा व्हिडीओही सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.