शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

‘परस्पर सहाय्यकारक’ची बिनविरोध परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:28 IST

अशोक खाडे । लोकमत न्यूज नेटवर्क कुंभोज : परस्पर सहकार्याशिवाय मानवी जीवनाचा विकास अशक्य आहे. उदरनिवार्हाचे साधन असणारी शेतीवाडी ...

अशोक खाडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककुंभोज : परस्पर सहकार्याशिवाय मानवी जीवनाचा विकास अशक्य आहे. उदरनिवार्हाचे साधन असणारी शेतीवाडी चांगली पिकावी आणि त्याद्वारे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवावे या हेतूने सहकारमहर्र्षींनी पश्चिम महाराष्ट्रासह कोल्हापूर जिल्ह्यात सहकार रुजविला. याच सहकाराच्या वाटेवरून जात असंख्य अडीअडचणींना तोंड देत काटेकोर नियोजन आणि पारदर्शी कारभाराच्या बळावर कुंभोज (ता.हातकणंगले) येथील परस्पर सहाय्यकारक सहकारी सेवा संस्थेने १०२ वर्षांच्या वाटचालीत सर्वोत्कृष्ट कारभार करून कुंभोज गावातील हजाराच्या आसपास सभासद शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे.सन १९८४ नंतर वारणा नदी बारमाही वाहू लागताच वारणामाईच्या कुशीतील कर्मवीर आण्णांची जन्मभूमी असलेले हातकणंगले तालुक्यातील कुंभोज गाव ऊसशेतीचे आगार बनून गेले. शेती आणि शेतकºयांच्या उन्नतीसाठी २३ मे १९१७ रोजी परस्पर सहाय्यकारी मंडळी अनलिमिटेड संस्थेची स्थापना झाली. नंतर संस्थेच्या इमारतीची पायाभरणी मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याहस्ते झाली. ही संस्था अल्पावधीतच शेतकºयांचा आधारवड बनली. पुढे या संस्थेचे नामांतर परस्पर सहाय्यकारक सहकारी सेवा संस्था असे केले.सभासदांमध्ये काटकसर, स्वावलंबन व परस्पर सहकार्य वाढीस लावून त्यांची आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक उन्नती करणे हा संस्था स्थापनेमागचा मूळ हेतू. सहकाराचे अपुरे ज्ञान आणि व्यावसायिकतेचा अभाव यामुळे गावातील या पहिल्या सेवा संस्थेची सुरुवातीच्या २३ वर्षांतील प्रगतीची वाटचाल खडतर पण सभासदांच्या विश्वासास पात्र ठरणारी राहिली.१९४० ते १९८६ दरम्यान संस्थेच्या कारभारात शिथीलता आली. एकीकडे गावच्या शेतीचे बागायती क्षेत्र झपाट्याने वाढत असताना शेतकºयांची सुलभ पीककर्ज आणि रासायनिक खत उपलब्धतेची वाढती गरज ओळखून माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब पाटील यांनी संस्थेच्या कारभारात स्वत: जातीनिशी लक्ष घातले. नि:स्पृहवृत्ती, राजकारणविरहित कारभार तसेच सभासदांत कोणत्याही प्रकारचा दुजाभाव न करणे या त्रिसूत्रीचा अवलंब करीत पाटील यांनी संस्थेची सूत्रे हाती घेतल्यानंतर आजपर्यंतचा संस्थेचा ३२ वर्षांचा प्रगतीचा आलेख चढता तर राहिलाच किंबहुना संस्थेच्या प्रगतशील वाटचालीचा हा जणू सुवर्णकाळ ठरला आहे.सभासदांची गरज आणि त्याची पत पाहून पीककर्ज एकरी अडतीस हजार, खावटी कर्ज बावीस हजार, विशेष कर्ज पंचवीस हजार रुपये तर केडीसीच्या धोरणानुसार आणि सभासदांकडील परतफेडीच्या पात्रतेनुसार त्यास मध्यम मुदतीचे कर्ज वितरीत केले जाते. संस्था पातळीवर ९८ टक्के तर बँक पातळीवर १०० टक्के कर्जवसुली आहे.सभासदाभिमुख, पारदर्शी, काटकसरीच्या कारभाराने सभासदांची मने जिंकलेल्या संचालक मंडळास १०२ वर्षांच्या वाटचालीत एकाही निवडणुकीस सामोरे जावे लागले नाही. तब्बल शंभरी पार केलेल्या सेवा संस्थेची बिनविरोध निवडणुकीची परंपरा केवळ जिल्ह्यालाच नव्हे तर सहकार क्षेत्रासमोर आदर्श निर्माण करणारी ठरली आहे.सभासद शेतकºयांच्या मागणीनुसार ७६ रासायनिक खतांची उत्पादने विक्रीस ठेवून संस्थेचा खतविभाग प्रतिवर्षी अडीच कोटी रपयांच्या उलाढालीद्वारे सुमारे आठ लाख रुपये नफा मिळवून देत आहे. तर संस्थेच्या धान्य विभागाचे कामकाजही अतिशय चोखपणे सुरू आहे. २९ जुलै २०१८ रोजी संस्थेचा शतकोत्तर महोत्सव कार्यक्रम खासदार राजू शेट्टी, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, निवेदिता माने, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, अमल महाडिक, सतेज पाटील, माजी मंत्री विनय कोरे, प्रकाश आवाडे, माजी आमदार महादेवराव महाडिक, राजीव आवळे, माजी जि.प. अध्यक्ष डी. सी. पाटील, वारणा दूध संघाचे संचालक अरूण पाटील आदींच्या उपस्थितीत बाहुबली येथे दिमाखात पार पडला. याप्रसंगी संस्थेने सभासदांना शेअर्सच्या प्रमाणात ५ ते ६५ ग्रॅमची चांदीची नाणी भेट देऊन यथोचित सन्मान केला.सहकारवाढीच्या दृष्टीने सहकारी कायद्याचे पालन करत संस्थेने सभासदांमध्ये काटकसर स्वावलंबन, परस्पर सहकार्याची भावना वाढीस लावण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे.