शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

दुहेरी नगरसेवक पद्धतीने अस्वस्थता

By admin | Updated: March 10, 2016 23:57 IST

राजकीय क्षेत्रात खळबळ : प्रभाग रचना बदलणार, जनतेतून नगराध्यक्ष निवड

राजाराम पाटील --इचलकरंजी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकेरी नगरसेवक प्रभागाची रचना बदलून दुहेरी नगरसेवक प्रभाग आणि जनतेतून नगराध्यक्ष निवड अशी पद्धती अस्तित्वात येत असल्याने येथील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अशा निवडणुकीतून राजकीय पद्धतीत होणाऱ्या स्थित्यंतरामुळे निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.इचलकरंजी नगरपालिकेमध्ये झालेल्या बहुतांशी निवडणुका एकेरी नगरसेवक प्रभाग पद्धतीने झाल्या आहेत. मात्र, २००१ मध्ये झालेल्या निवडणुकीसाठी तिहेरी नगरसेवक प्रभाग आणि २०११ मधील निवडणुका चार नगरसेवक प्रभाग पद्धतीने झाल्या. २००१ मधील अपवाद वगळता सर्व निवडणुकांवेळी निवडून आलेल्या नगरसेवकांतूनच नगराध्यक्षांची निवड झाली.एकेरी नगरसेवक प्रभाग पद्धतीमध्ये पक्ष किंवा नोंदणीकृत आघाडीऐवजी अपक्ष नगरसेवक निवडून येण्याची अधिक संधी असते आणि अपक्ष निवडून आले की, घोडेबाजार अधिक होतो, अशा निरीक्षणामुळे एकापेक्षा अधिक नगरसेवकांचे प्रभाग करून निवडणुका घेण्याची पद्धत संबंधित सरकारकडून अवलंबली जात आहे. २०११ मध्ये झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीत चार नगरसेवकांच्या प्रभागांची पद्धती अवलंबली. त्याचा चांगला लाभ दोन्ही कॉँग्रेसला झाला. त्यामुळे सध्याच्या सरकारकडून तीन किंवा चार नगरसेवकांच्या प्रभागाऐवजी आता दुहेरी नगरसेवक प्रभाग पद्धत अवलंबली जात असल्याची चर्चा आहे.साधारणत: दोन महिन्यांपूर्वी आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडती काढण्यात आल्या. त्यावेळी नगरपालिकांच्या निवडणुका एकेरी प्रभाग पद्धतीने होणार, अशी चर्चा सर्वत्र पसरली. त्याचा परिणाम म्हणून आगामी निवडणुकांना इच्छुक असलेल्यांनी आपापले संभाव्य प्रभाग निश्चित करून ‘तयारी’ सुरू केली. असे इच्छुक प्रभागातील सेवा-सुविधांसाठी आंदोलने करू लागले. या पार्श्वभूमीवर निवडणुकीसाठी आता दुहेरी नगरसेवक प्रभाग आणि नगराध्यक्ष जनतेतून निवडला जाणार, अशी पद्धत सरकार अवलंबणार असल्याच्या वृत्ताने येथील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे, तर अपक्ष म्हणून उमेदवारीची तयारी केलेल्या इच्छुकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. २००१ मध्ये तीन नगरसेवकांचा प्रभाग आणि जनतेतून नगराध्यक्ष निवड अशी पद्धत अवलंबण्यात आली. त्यावेळी कॉँग्रेसकडून नगराध्यक्षा म्हणून किशोरी आवाडे निवडून आल्या. मात्र, त्यांच्या कॉँग्रेस पक्षास बहुमत मिळाले नाही. म्हणून तत्कालीन शहर विकास आघाडीबरोबर कॉँग्रेसला आघाडी करावी लागली.