शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील शुगर लॉबीत अस्वस्थता

By admin | Updated: November 3, 2014 23:32 IST

साखर उद्योगापुढे संकट : ऊसदर, ऊसतोड मजुरांसह साखर कामगारांचा संप

प्रकाश पाटील - कोपार्डे -साखर कारखानदारीतील सत्तेच्या जिवावर जिल्ह्यात राजकीय क्षेत्रावरही वर्चस्व निर्माण करणाऱ्या कारखानदारांना विधानसभा निवडणुकीत जनतेने साफ नाकारल्याने कारखानदारांत नाराजी असतानाच ऊसदर, ऊसतोड मजुरांबरोबर साखर कामगारांच्या संपाच्या एल्गाराने जिल्ह्यातील शुगर लॉबीत अस्वस्थता पसरली आहे. कारखाने वेळेत सुरू झाले नाहीत, तर त्याचा आर्थिक भुर्दंड कारखान्यांबरोबर शेतकऱ्यांनाही बसणार आहे.जिल्ह्यात २१ साखर कारखाने आहेत. यावर्षी यामध्ये नव्या दोन साखर कारखान्यांची भर पडली. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कारखानदारांशी संबंधित असणारे आठ उमेदवार विधानसभेच्या रिंंगणात होते. मात्र, यापैकी आमदार चंद्रदीप नरके वगळता सर्वच कारखानदारांना अपयश आल्याने कारखानदारीच्या क्षेत्रात नाराजीचा प्रवाह सुरू असतानाच कारखान्याचे बॉयलर प्रदीपन करून गाळप हंगामासाठी तयारी सुरू केली आहे.गाळप हंगामाची तयारी सुरू झाली असली तरी ऊसदरावरून शासन, कारखानदार व शेतकरी संघटनांत समेट घडणार का? हा महत्त्वाचा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे. संघटनेच्या भूमिकेवरच हंगामासाठी कारखान्याची चाके फिरू शकतात, अन्यथा ऊसदराचा निर्णय ताणला गेला, तर गाळप हंगाम सुरू होण्याबाबत अनिश्चितता निर्माण होणार आहे. जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी हंगाम सुरू करण्यासाठी पूर्ण नियोजन केले असून, जर वेळेवर हंगाम सुरू झाला नाही, तर मोठा आर्थिक फटका कारखान्यांना सोसावा लागणार आहे.ऊसतोड मजूर व साखर कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी संपाचे हत्यार उपसल्याने कारखानदारांसमोर नवे संकट निर्माण झाले आहे.शुगरलॉबीवर वर्चस्व असणारे काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार बाजूला झाल्याने व साखर उद्योगातील विविध प्रश्नांची जाण असणारे भाजपमधील गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे नेतृत्व नसल्याने अशा विविध प्रश्नांवर सध्याचे भाजप सरकार काय तोडगा काढणार, याकडे साखर उद्योगाचे लक्ष लागून राहिले आहे.जिल्ह्यातील साखर उद्योगाची परिस्थितीसाखर कारखाने : २३ (खासगी : ७, सहकारी : १६)उसाचे एकूण क्षेत्र : १ लाख ४६ हजार हेक्टरगाळपासाठी उपलब्ध ऊस : १ कोटी १० लाख टनएकूण साखर कामगार : ३० हजारऊसतोड मजूर : ७५ हजारजिल्ह्यातील कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता : ७५ हजार मे. टन.