शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील शुगर लॉबीत अस्वस्थता

By admin | Updated: November 3, 2014 23:32 IST

साखर उद्योगापुढे संकट : ऊसदर, ऊसतोड मजुरांसह साखर कामगारांचा संप

प्रकाश पाटील - कोपार्डे -साखर कारखानदारीतील सत्तेच्या जिवावर जिल्ह्यात राजकीय क्षेत्रावरही वर्चस्व निर्माण करणाऱ्या कारखानदारांना विधानसभा निवडणुकीत जनतेने साफ नाकारल्याने कारखानदारांत नाराजी असतानाच ऊसदर, ऊसतोड मजुरांबरोबर साखर कामगारांच्या संपाच्या एल्गाराने जिल्ह्यातील शुगर लॉबीत अस्वस्थता पसरली आहे. कारखाने वेळेत सुरू झाले नाहीत, तर त्याचा आर्थिक भुर्दंड कारखान्यांबरोबर शेतकऱ्यांनाही बसणार आहे.जिल्ह्यात २१ साखर कारखाने आहेत. यावर्षी यामध्ये नव्या दोन साखर कारखान्यांची भर पडली. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कारखानदारांशी संबंधित असणारे आठ उमेदवार विधानसभेच्या रिंंगणात होते. मात्र, यापैकी आमदार चंद्रदीप नरके वगळता सर्वच कारखानदारांना अपयश आल्याने कारखानदारीच्या क्षेत्रात नाराजीचा प्रवाह सुरू असतानाच कारखान्याचे बॉयलर प्रदीपन करून गाळप हंगामासाठी तयारी सुरू केली आहे.गाळप हंगामाची तयारी सुरू झाली असली तरी ऊसदरावरून शासन, कारखानदार व शेतकरी संघटनांत समेट घडणार का? हा महत्त्वाचा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे. संघटनेच्या भूमिकेवरच हंगामासाठी कारखान्याची चाके फिरू शकतात, अन्यथा ऊसदराचा निर्णय ताणला गेला, तर गाळप हंगाम सुरू होण्याबाबत अनिश्चितता निर्माण होणार आहे. जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी हंगाम सुरू करण्यासाठी पूर्ण नियोजन केले असून, जर वेळेवर हंगाम सुरू झाला नाही, तर मोठा आर्थिक फटका कारखान्यांना सोसावा लागणार आहे.ऊसतोड मजूर व साखर कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी संपाचे हत्यार उपसल्याने कारखानदारांसमोर नवे संकट निर्माण झाले आहे.शुगरलॉबीवर वर्चस्व असणारे काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार बाजूला झाल्याने व साखर उद्योगातील विविध प्रश्नांची जाण असणारे भाजपमधील गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे नेतृत्व नसल्याने अशा विविध प्रश्नांवर सध्याचे भाजप सरकार काय तोडगा काढणार, याकडे साखर उद्योगाचे लक्ष लागून राहिले आहे.जिल्ह्यातील साखर उद्योगाची परिस्थितीसाखर कारखाने : २३ (खासगी : ७, सहकारी : १६)उसाचे एकूण क्षेत्र : १ लाख ४६ हजार हेक्टरगाळपासाठी उपलब्ध ऊस : १ कोटी १० लाख टनएकूण साखर कामगार : ३० हजारऊसतोड मजूर : ७५ हजारजिल्ह्यातील कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता : ७५ हजार मे. टन.