शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

साळशीच्या जीवन विद्यामंदिरचे नाबाद शतक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 00:35 IST

आर. डी. पाटील। लोकमत न्यूज नेटवर्क बांबवडे : शिक्षणाची गंगा खेडोपाडी पोहोचावी, भविष्यात घडणारी पिढीही सुसंस्कृत, शिक्षित असावी या ...

आर. डी. पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कबांबवडे : शिक्षणाची गंगा खेडोपाडी पोहोचावी, भविष्यात घडणारी पिढीही सुसंस्कृत, शिक्षित असावी या हेतूने इंग्रज सत्तेच्या काळात काही खेड्यांमध्ये शाळा सुरू केल्या. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा जपत शाळा, शिक्षणाची ज्योत तेवत ठेवत संस्कारक्षम विद्यार्थी घडवत नावारूपाला आल्या. अशा एका शाळांपैकी एक शाळा म्हणजे साळशीची जीवन शिक्षण विद्यामंदिर. दि. १ एप्रिल १९१८ रोजी शाळेची स्थापना झाली. शाहूवाडी तालुक्याची शाळा, शतकोत्तर वाटचालीनंतर शिक्षणाची जीवनज्योत म्हणून ओळखली जात आहे.सुरुवातीला मारूती मंदिर परिसरात पहिली ते चौथीचे वर्ग भरत होते. काही वर्षांनंतर पाचवी ते सातवीचे वर्ग जोडले गेले. वेगवेगळ्या ठिकाणी पत्र्यांच्या खोल्यात शाळेने अनेक दशके ज्ञानदानाचे काम केले.सन १९८१ ते ८९ च्या दरम्यान तत्कालीन शिक्षण व अर्थ समितीचे सभापती महादेवराव पाटील यांनी गावाच्या दक्षिणेस बिरोबाच्या माळावर गावकऱ्यांच्या सहकार्यातून शाळेची प्रशस्त इमारत उभी केली. दरम्यानच्या काळात शाळेने अनेक विद्यार्थी घडविले. त्यांनी काहीजणांनी शाळेचे नाव उज्ज्वल केले.विशेष उल्लेख करायचा झाल्यास ‘शिक्षकाचे गाव’ म्हणून साळशी गावची ओळख याच काळात झाली. या काळात या शाळेने ५५ ते ६० शिक्षक घडवले. तर पुढे यात वाढ होऊन ही संख्या ८० पेक्षा जास्त झाली होती. राजकारणी, नेते घडवणारी शाळा म्हणूनही या शाळेकडे पाहिले जाते.या शाळेचे दोन माजी विद्यार्थी जि. प. सदस्य, एक पंचायत समिती सदस्य झाले. यामध्ये महादेव ज्ञानदेव पाटील, विजय गंगाधर बोरगे, जि. प. सदस्य झाले, तर महादेव श्रीपती पाटील, पं. स. सदस्य व उपसभापती झाले. याच शाळेचे विद्यार्थी दिनकर अण्णा पाटील हे जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे अध्यक्ष झाले. गुणवत्तेच्या बाबतीत ही शाळा कुठेही मागे नाही. स्कॉलरशिप परीक्षेचे केंद्र म्हणून या शाळेकडे पाहिले जाते. या शाळेने शिष्यवृत्ती परीक्षेत ३३ हून अधिक विद्यार्थी आणण्याचा विक्रम केला आहे आणि या विक्रमाचे वाटेकरी होते, याच शाळेचे विद्यार्थी विक्रम पाटील आता ही परंपरा पुढे जपण्याचे काम संजय पाटील, सुरेश पाटील, विष्णू पाटील, जयश्री मगदूम, संजय शिंदे जोमाने पुढे चालवत आहेत.शाहूवाडीसारख्या दुर्गम भागात सुसज्ज करण्यासाठी जि. प. सदस्य विजय बोरगे यांनी विशेष प्रयत्न केले. मैदान सपाटीकरण, सुसज्ज स्वतंत्र खोल्यांसह अद्ययावत प्रयोगशाळा, डिजिटल लर्निंगची सोय, शालेय परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसवण्यास त्यांनी सहकार्य केले तर विद्यमान सरपंच संदीप पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी मुला-मुलींसाठी स्वतंत्र भोजनकक्ष, चार अँड्रॉईड टीव्ही संच शाळेसाठी उपलब्ध करून दिले. यासाठी शाळेचे माजी विद्यार्थी अभियंता राजेंद्र पाटील यांचेही योगदान मिळाले.1981-89च्या दरम्यान तत्कालीन शिक्षण व अर्थ समितीचे सभापती महादेवराव पाटील यांनी गावाच्या दक्षिणेस बिरोबाच्या माळावर गावकºयांच्या सहकार्यातून प्रशस्त इमारत उभी केली, याच काळात या शाळेने अनेक दिग्गज घडविले.गुणवत्तेचे माहेरघरगुणवत्तेच्या बाबतीत ही शाळा कुठेही मागे नाही. स्कॉलरशीप परीक्षेच्या गुणवत्तेचे माहेरघर म्हणून या शाळेकडे पाहिले जाते. या शाळेने स्कॉलरशीपमध्ये ३३ हून अधिक विद्यार्थी आणण्याचा विक्रम केला आहे.