शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

उमेश कत्तीना मंत्रिपद, विकासाच्या आशा पल्लवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क निपाणी : कर्नाटकात भाजपचे सरकार आल्यानंतर आठ वेळा विधानसभेवर निवडून आलेले आमदार उमेश कत्ती व माजी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

निपाणी : कर्नाटकात भाजपचे सरकार आल्यानंतर आठ वेळा विधानसभेवर निवडून आलेले आमदार उमेश कत्ती व माजी खासदार रमेश कत्ती यांना डावलण्याची भूमिका भाजप नेत्यांनी घेतली होती. पण बुधवारी १३ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात उमेश कत्ती यांची वर्णी लागली आहे. यामुळे कत्ती बंधू यांची नाराजी दूर करण्यात यश आले असले तरी काही आमदार मात्र नाराज आहेत. दरम्याऩ, बेळगाव जिल्ह्यात एकाच वेळी पाच मंत्रिपदे यावेळी मिळाली आहेत.

कर्नाटकच्या राजकीय इतिहासात बेळगावला पहिल्यांदाच बेंगलोर नंतर सर्वाधिक मंत्रिपदे मिळाली आहेत. त्यातच उपमुख्यमंत्रिपद व पाटबंधारेसारखे वजनदार मंत्रिपदही बेळगाव जिल्ह्यातच असल्याने जिल्ह्याचा राजकीय आलेख वरचढ ठरला आहे. मुळात कर्नाटकात भाजप सरकार सत्तेवर येण्यासाठी बेळगाव जिल्हा महत्त्वाचा ठरला असल्याने यावेळी जिल्ह्याला मंत्रिपदाच्या बाबतीत अधिक प्राथमिकता मिळाली आहे. उमेश कत्ती हे हुक्केरी मतदार संघातून आठ वेळा निवडून आले आहेत. २००८ साली कर्नाटकात भाजप सत्तेवर येण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यामुळे त्यावेळी त्यांना कृषिमंत्री पद देण्यात आले होते. २०१८ मधील निवडणुकीत त्यांनी परत बाजी मारली. पण भाजपने धक्कादायकरित्या उमेश यांना मंत्रिपदापासून लांब ठेवले होते.

यानंतर झालेल्या लोकसभेतही उमेश यांचे भाऊ माजी खासदार रमेश कत्ती यांना लोकसभेची उमेदवारी नाकारून पुन्हा पक्षाने धक्का दिला होता. यानंतर मात्र कत्ती गटामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. भविष्यातील कत्ती बंधूंच्या राजकीय हालचालींचा अंदाज घेऊन भाजपने मंत्रिपद त्यांच्या पारड्यात टाकले आहे.

सध्या बेळगाव जिल्ह्यात पाच मंत्रिपदे असून ही सर्व मंत्रिपदे महत्त्वाची आहेत. अजून खाते वाटप झालेले नसले तरी रमेश जारकीहोळी यांच्याकडे पाटबंधारे, श्रीमंत पाटील यांच्याकडे वस्त्रोद्योग तर शशिकला जोल्ले यांच्याकडे महिला व बालकल्याण ही महत्त्वाची खाती आहेत. लक्ष्मण सवदी हे उपमुख्यमंत्री असून आता कत्ती ही कॅबिनेट मंत्री झाले आहेत.

विकासाच्या आशा पल्लवित

चार मंत्रिपदे जिल्ह्याला मिळाल्याने चिक्कोडी जिल्हा घोषणा, कराड निपाणी रेल्वे मार्ग, पाणी योजना अशा कामांची पूर्तता होईल अशी आशा जिल्ह्यातील जनतेला लागली आहे. उमेश कत्ती यांनी स्वतंत्र उत्तर कर्नाटकाची मध्यंतरी भूमिका घेतली होती. उत्तर कर्नाटकाकडे विकासाच्या बाबतीत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. आता मंत्रिपद मिळाल्याने त्यांच्याकडून उत्तर कर्नाटकात कोणती विकासकामे राबवली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

फोटो

मंत्री उमेश कत्ती