शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
3
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
4
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
5
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
6
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
7
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
8
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
9
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
10
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
11
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
12
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
13
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
14
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
15
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
16
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
17
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
18
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
19
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
20
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान

उमेश आपटे : ‘सदृढ बालक-सदृढ समाज’ अभियान उद्यापासून

By admin | Updated: August 13, 2014 23:39 IST

सासूला ‘अगं आई’ म्हणा !

कोल्हापूर : १५ आॅगस्ट ते १५ आक्टोबर या कालावधीत ‘सदृढ बालक-सदृढ समाज’ हे अभियान राबवून कोल्हापूर जिल्हा कुपोषणमुक्त करणार, अशी घोषणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उमेश आपटे यांनी केली. महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने आज, बुधवारी शाहू स्मारक भवन येथे आयोजित ‘आदर्श अंगणवाडी सेविका ’ पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार होते. यावेळी अध्यक्ष आपटे म्हणाले, कोल्हापूरसारख्या सधन जिल्ह्यात कुपोषणाचा डाग आहे. कुपोषणाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी १५ आॅगस्टपासून दोन महिन्यांचे नावीन्यपूर्ण अभियान जिल्हा परिषद राबवित आहे. या पथदर्शी अभियानाची सुरुवात हातकणंगले तालुक्यातून करीत आहे. आजरा तालुक्यात साडेचारशे बालके कमी वजनाची आहेत. त्यांना सदृढ करण्यासाठी नऊ लाख रुपयांचा निधी लागणार आहे. यापैकी ६२ बालके ही उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघातील असून, त्यांची जबाबदारी आपण घेत आहे. तालुक्यातील उर्वरित बालकांसाठी स्वयंसेवी संस्थांकडून मदत घेतली जाणार आहे. स्वत:चा तालुका ज्यावेळी कुपोषण मुक्त होईल, त्यावेळी इतरांना सांगण्याचे नैतिक अधिष्ठान येईल, असे आपटे यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे योगदान कोणीही विसरू शकत नाही. त्यांच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक भूमिका घेत आहे. कुपोषण मुक्तीच्या अभियानात या कर्मचाऱ्यांचे सहकार्य मोलाचे असणार आहे. चार-पाच अंगणवाडीतील कुपोषित बालकांना एकत्र करण्यासाठी आरोग्य पोषण केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. त्यांना औषध व चांगला आहार दिला जाणार आहे. दरम्यान, ‘महिला साहस’ या संस्थेच्या वतीने जिल्ह्यातील सातशे अंगणवाडींना मोफत पाण्याचे फिल्टर वाटप व महिलांना खिचडी प्रशिक्षण देण्यात आले. त्याचबरोबर ‘महिला विषयक कायदा’ व ‘लेक वाचवा’ या भित्तीपत्राचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. ४८ आदर्श अंगणवाडी सेविकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उपमुख्यकार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील यांनी स्वागत केले. महिला व बालकल्याण सभापती भाग्यश्री गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. समाजकल्याण सभापती शशिकला रोटे, ‘महिला साहस’चे प्रीतम शहा यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा परिषदेचे सदस्य अर्जुन आबिटकर, बाजीराव पाटील, एस. आर. पाटील, विमल पाटील, मंगल वळकुंजे, रोहिणी सुभेदार, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)यांचा गौरव...रत्नप्रभा गजरे (जाधेवाडी), सरस्वती गुरव (टिक्केवाडी), बेबीताई पाटील (तांबूळवाडी), सुनीता जाधव (कसबा नूल), मंगल खाडे (तिसंगीपैकी टेकवाडी), वंदना कागवाडे (वाठार तर्फ उदगाव), वैशाली कांबळे ( इंगळी), सुलोचना खाडे (सडोली खालसा), कल्पना खांडेकर (कसबा बीड), अलका देवमाने (रणदेवीवाडी), संगीता गायकवाड (तामगाव), अश्विनी कुलकर्णी (कोडोली), कमल सादळे (बनाचीवाडी), संगीता किटे (चरण), सुगंधा चौगुले (चिंचवाड), दीपा औंधकर (नांदणी), सुमती माडभगत (आल्याचीवाडी), आशा बोरनाक (बामणे), वंदना खामकर (सत्तेवाडी), मुमताज कदिम (नेसरी), वर्षा पांगळे (रामेश्वर मंदिर, गगनबावडा), भारती कोले (दुर्गेवाडी), संध्या पोवार (कबनूर), मंगल पाटील (सावर्डे दुमाला), दीपाली वरपे (साबळेवाडी), सुनीता सुतार (सुरूपली), सुजाता कुंभार (सांगवडे), गीता मोरे (पोहोळे तर्फ आळते), मनीषा कुलकर्णी (राशिवडे बुदु्रक), अंजली माने (नांदगाव पैकी खराडेवाडी), धनश्री ठोमके (चिंचवाड), सुवर्णा ऐनापुरे (नांदणी), संगीता गडदराम (लाकूडवाडी), चंद्रभागा भंडारी (वेंगरूळ), इंदुताई सुतार (चिंचणे), सुप्रिया खटावकर (नेसरी), पूनम वरेकर (सांगशी), माधुरी भानुसे (घुणकी), वंदना चौगुले (तळंदगे), भारती बोलायकर (हळदी), भारती बाटे (विठ्ठलाईवाडी), सुमन पाटील (नंद्याळ), कांचन शिंदे (शिरोली पुलाची), अनिता मेडगुळे (कळे), लता कदम (लाडवाडी), प्रतिभा सुतार (ठाणेवाडी), रेखा ठोमके (उदगाव), पुष्पलता वाळके (अकिवाट). सासूला ‘अगं आई’ म्हणा !अलीकडील सुशिक्षित मुली सासूचे मन जिंकण्यासाठी त्यांना ‘अहो आई’ म्हणून हाक मारतात; पण, त्यातून ममत्व निर्माण होत नाही. ज्यावेळी सासूला ‘अगं आई’ अशी हाक माराल, त्याच वेळी सासू-सुनेमधील पारंपरिक नातं संपेल, असा आशावाद अध्यक्ष आपटे यांनी बोलून दाखविला.