शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २० वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनात जाणार; मनसे स्थापनेनंतर पहिल्यांदाच 'असं' घडणार
2
नागपुरात भाजपाच्या बंडखोर उमेदवाराला समर्थकांनीच घरात कोंडलं, गावंडे म्हणाले, "पाया पडतो, मला..."
3
“मोहन भागवत हिंदीत बोलतात, मराठीत बोलताना कधी ऐकले आहे का?”; संजय राऊतांची RSSवर टीका
4
भाजपच्या आणखी दोन जागा बिनविरोध; प्रभाग 19 मधून दर्शना भोईर तर प्रभाग 20 मधून अजय बहिरा बिनविरोध
5
धक्कादायक! भारतात महिला कैद्यांच्या संख्येत विक्रमी १६२% वाढ; पुरुष कैद्यांच्या वाढीच्या तुलनेत वेग दुप्पट!
6
काँग्रेसच्या सर्व्हेनेच राहुल गांधींचा दावा खोटा ठरवला! लोकांचा ईव्हीएमवर विश्वास
7
मुलींच्या मेसेजने हैराण झालाय प्रणित मोरे, चाहतीने घातली थेट लग्नाची मागणी, म्हणाला- "तिने मला पत्रिका पाठवली आणि..."
8
बंटी जहागीरदार हत्या: गोळ्या झाडून फरार झालेल्या आरोपींना समृद्धी महामार्गावर अटक, कसे पकडले?
9
'आम्ही तुझ्याबद्दल विचार करतो..', न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांचे उमर खालिदला पत्र
10
मी पाकिस्तानी अन् मुस्लिम यामुळे मला...; गंभीर आरोप करत ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटरने केली निवृत्तीची घोषणा...
11
हृदयद्रावक! आईला शेवटचा कॉल, पत्नीला पाठवलं लोकेशन; SBI मॅनेजरने नदीत मारली उडी अन्...
12
पहिल्याच दिवशी १००% नं वधारला 'हा' शेअर, गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट; IPO ला मिळालेला जोरदार प्रतिसाद
13
डिलिव्हरी बॉय बनून घरात शिरला, चाकूचा धाक दाखवून विद्यार्थिनीला लुटलं अन्... अंधेरीतील थरार!
14
एका चुकीने होत्याचं नव्हतं झालं! शॅम्पेनची ती पेटती बाटली छताला लागली अन्... प्रत्यक्षदर्शीने सांगितला तो थरार!
15
'पागल हो गया है क्या?', अक्षय खन्ना कास्टिंग डायरेक्टरवर चिडलाच; नक्की काय घडलेलं?
16
"देवाने आनंद दिला, पुन्हा हिरावून घेतला"; १० वर्षांनी नवसाने झालेल्या ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू
17
ज्याची भीती होती ती खरी ठरली, इंदूरमधील मृत्यूचे कारण आले समोर
18
25 वर्षांचा विक्रम मोडला! एका कारने बदलले कंपनीचे नशीब; इतक्या गाड्यांची विक्री...
19
'IC-814' हायजॅक आणि मसूद अजहरची सुटका; त्या ७० तासांत नेमकं काय घडलं? कुख्यात दहशतवाद्याचा नवा दावा
20
ITC-Godfrey Phillips India Stocks: सरकारच्या एका निर्णयानं 'या' कंपन्यांना जोरदार झटका, दोन दिग्गज कंपन्यांचे शेअर्स आपटले; ६०००० कोटी बुडाले
Daily Top 2Weekly Top 5

उदगांव ग्रामपंचायत नव्वदीत !

By admin | Updated: April 29, 2017 00:40 IST

उदगांव ग्रामपंचायत नव्वदीत !

वर्धापनदिनाचा लोकप्रतिनिधींना विसर : मासिक सभेत चर्चा नाहीसंतोष बामणे ल्ल उदगांवसांगली-कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर शिरोळ तालुक्यातील उदगांव ग्रामपंचायतीच्या स्थापनेला १ मे रोजी तब्बल ९० वर्षे पूर्ण होत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सत्ता असलेल्या ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना ९० व्या वर्धापन दिनानिमित्त एकाही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले नाही. यामुळे ग्रामस्थांतून नाराजीचा सूर उमटत आहे. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात १ मे १९२७ रोजी सुमारे ३०० कुटुंब असलेल्या उदगांव गावात ग्रामपंचायत स्थापना करण्यात आली. त्यावेळी शाहूकालीन जकात नाका, छत्रपती शाहू महाराज हंगामी निवासस्थान, कलेच्या क्षेत्रातील अग्रेसर म्हणून उदगावची ओळख आहे. २०१० साली सुमारे ३० लाख खर्चून सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यात आले. औद्योगिक वसाहत, नळपाणी, घरफाळा कराच्या माध्यमातून चांगला महसूल ग्रामपंचायतीला मिळतो.१९७४ साली गावाची लोकसंख्या पाच हजारांच्या घरात होती. त्यावेळी उदगावच्या पहिल्या महिला सरपंच चित्राबाई देसाई यांच्या प्रयत्नातून कृष्णा नदीपात्रातून पहिली नळ पाणीपुरवठा योजना सुरू झाली.आजही या पाणीपुरवठ्यातूनच उदगावला पाणीपुरवठा होतो. तर नवीन पेयजल योजना प्रस्तावित आहे. अशा ९० वर्षांचा कालखंड असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना ग्रामपंचायत वर्धापनदिनाचा विसर पडलेला दिसत आहे. सोमवारी १ मे रोजी ९० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने कोणत्याच कार्यक्रमाचे आयोजन नाही. त्यामुळे ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे. प्रबोधनाची गरजशिरोळ तालुक्यातील अग्रेसर म्हणून उदगांवची ओळख आहे. नव्वदी पार करून आणखी दहा वर्षांत शतकमहोत्सवी ग्रामपंचायत म्हणून नामोल्लेख होणार आहे. उदगांव ग्रामपंचायतीतील पदाधिकाऱ्यांची नुकतीच मासिक सभा झाली. यामध्ये वर्धापनदिनाविषयी कोणतीच चर्चा झाली नाही. त्यामुळे सोमवारी (दि.१मे) ग्रामपंचायतीच्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम आयोजन्याची गरज आहे. असे आहे उदगांव... १ मे १९२७ रोजी ग्रामपंचायतीची स्थापना झाली आहे. उदगांवचे कार्यक्षेत्र मोठे असल्याने छत्रपती शाहू महाराजांनी पर्यायी बाजारपेठ म्हणून जयसिंगपूर शहर वसवून नगरपालिका स्थापन केली. उदगांव येथील काळम्मावाडी वसाहतीत स्वतंत्र ग्रामपंचायत प्रस्तावित आहे. त्यामुळे ही ग्रामपंचायत लवकरच होण्याची शक्यता आहे. मात्र, उदगांवच्या विकासाला आजही पूर्ण क्षमतेने चालना मिळाली नाही. सध्याच्या लोकसंख्येच्यादृष्टीने नगरपंचायत किंवा नगरपालिका शासनाच्या नियमानुसार स्थापन होऊ शकते.