शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

उदगांव ग्रामपंचायत नव्वदीत !

By admin | Updated: April 29, 2017 00:40 IST

उदगांव ग्रामपंचायत नव्वदीत !

वर्धापनदिनाचा लोकप्रतिनिधींना विसर : मासिक सभेत चर्चा नाहीसंतोष बामणे ल्ल उदगांवसांगली-कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर शिरोळ तालुक्यातील उदगांव ग्रामपंचायतीच्या स्थापनेला १ मे रोजी तब्बल ९० वर्षे पूर्ण होत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सत्ता असलेल्या ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना ९० व्या वर्धापन दिनानिमित्त एकाही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले नाही. यामुळे ग्रामस्थांतून नाराजीचा सूर उमटत आहे. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात १ मे १९२७ रोजी सुमारे ३०० कुटुंब असलेल्या उदगांव गावात ग्रामपंचायत स्थापना करण्यात आली. त्यावेळी शाहूकालीन जकात नाका, छत्रपती शाहू महाराज हंगामी निवासस्थान, कलेच्या क्षेत्रातील अग्रेसर म्हणून उदगावची ओळख आहे. २०१० साली सुमारे ३० लाख खर्चून सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यात आले. औद्योगिक वसाहत, नळपाणी, घरफाळा कराच्या माध्यमातून चांगला महसूल ग्रामपंचायतीला मिळतो.१९७४ साली गावाची लोकसंख्या पाच हजारांच्या घरात होती. त्यावेळी उदगावच्या पहिल्या महिला सरपंच चित्राबाई देसाई यांच्या प्रयत्नातून कृष्णा नदीपात्रातून पहिली नळ पाणीपुरवठा योजना सुरू झाली.आजही या पाणीपुरवठ्यातूनच उदगावला पाणीपुरवठा होतो. तर नवीन पेयजल योजना प्रस्तावित आहे. अशा ९० वर्षांचा कालखंड असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना ग्रामपंचायत वर्धापनदिनाचा विसर पडलेला दिसत आहे. सोमवारी १ मे रोजी ९० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने कोणत्याच कार्यक्रमाचे आयोजन नाही. त्यामुळे ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे. प्रबोधनाची गरजशिरोळ तालुक्यातील अग्रेसर म्हणून उदगांवची ओळख आहे. नव्वदी पार करून आणखी दहा वर्षांत शतकमहोत्सवी ग्रामपंचायत म्हणून नामोल्लेख होणार आहे. उदगांव ग्रामपंचायतीतील पदाधिकाऱ्यांची नुकतीच मासिक सभा झाली. यामध्ये वर्धापनदिनाविषयी कोणतीच चर्चा झाली नाही. त्यामुळे सोमवारी (दि.१मे) ग्रामपंचायतीच्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम आयोजन्याची गरज आहे. असे आहे उदगांव... १ मे १९२७ रोजी ग्रामपंचायतीची स्थापना झाली आहे. उदगांवचे कार्यक्षेत्र मोठे असल्याने छत्रपती शाहू महाराजांनी पर्यायी बाजारपेठ म्हणून जयसिंगपूर शहर वसवून नगरपालिका स्थापन केली. उदगांव येथील काळम्मावाडी वसाहतीत स्वतंत्र ग्रामपंचायत प्रस्तावित आहे. त्यामुळे ही ग्रामपंचायत लवकरच होण्याची शक्यता आहे. मात्र, उदगांवच्या विकासाला आजही पूर्ण क्षमतेने चालना मिळाली नाही. सध्याच्या लोकसंख्येच्यादृष्टीने नगरपंचायत किंवा नगरपालिका शासनाच्या नियमानुसार स्थापन होऊ शकते.