शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

उदगांव ग्रामपंचायत नव्वदीत !

By admin | Updated: April 29, 2017 00:40 IST

उदगांव ग्रामपंचायत नव्वदीत !

वर्धापनदिनाचा लोकप्रतिनिधींना विसर : मासिक सभेत चर्चा नाहीसंतोष बामणे ल्ल उदगांवसांगली-कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर शिरोळ तालुक्यातील उदगांव ग्रामपंचायतीच्या स्थापनेला १ मे रोजी तब्बल ९० वर्षे पूर्ण होत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सत्ता असलेल्या ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना ९० व्या वर्धापन दिनानिमित्त एकाही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले नाही. यामुळे ग्रामस्थांतून नाराजीचा सूर उमटत आहे. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात १ मे १९२७ रोजी सुमारे ३०० कुटुंब असलेल्या उदगांव गावात ग्रामपंचायत स्थापना करण्यात आली. त्यावेळी शाहूकालीन जकात नाका, छत्रपती शाहू महाराज हंगामी निवासस्थान, कलेच्या क्षेत्रातील अग्रेसर म्हणून उदगावची ओळख आहे. २०१० साली सुमारे ३० लाख खर्चून सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यात आले. औद्योगिक वसाहत, नळपाणी, घरफाळा कराच्या माध्यमातून चांगला महसूल ग्रामपंचायतीला मिळतो.१९७४ साली गावाची लोकसंख्या पाच हजारांच्या घरात होती. त्यावेळी उदगावच्या पहिल्या महिला सरपंच चित्राबाई देसाई यांच्या प्रयत्नातून कृष्णा नदीपात्रातून पहिली नळ पाणीपुरवठा योजना सुरू झाली.आजही या पाणीपुरवठ्यातूनच उदगावला पाणीपुरवठा होतो. तर नवीन पेयजल योजना प्रस्तावित आहे. अशा ९० वर्षांचा कालखंड असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना ग्रामपंचायत वर्धापनदिनाचा विसर पडलेला दिसत आहे. सोमवारी १ मे रोजी ९० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने कोणत्याच कार्यक्रमाचे आयोजन नाही. त्यामुळे ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे. प्रबोधनाची गरजशिरोळ तालुक्यातील अग्रेसर म्हणून उदगांवची ओळख आहे. नव्वदी पार करून आणखी दहा वर्षांत शतकमहोत्सवी ग्रामपंचायत म्हणून नामोल्लेख होणार आहे. उदगांव ग्रामपंचायतीतील पदाधिकाऱ्यांची नुकतीच मासिक सभा झाली. यामध्ये वर्धापनदिनाविषयी कोणतीच चर्चा झाली नाही. त्यामुळे सोमवारी (दि.१मे) ग्रामपंचायतीच्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम आयोजन्याची गरज आहे. असे आहे उदगांव... १ मे १९२७ रोजी ग्रामपंचायतीची स्थापना झाली आहे. उदगांवचे कार्यक्षेत्र मोठे असल्याने छत्रपती शाहू महाराजांनी पर्यायी बाजारपेठ म्हणून जयसिंगपूर शहर वसवून नगरपालिका स्थापन केली. उदगांव येथील काळम्मावाडी वसाहतीत स्वतंत्र ग्रामपंचायत प्रस्तावित आहे. त्यामुळे ही ग्रामपंचायत लवकरच होण्याची शक्यता आहे. मात्र, उदगांवच्या विकासाला आजही पूर्ण क्षमतेने चालना मिळाली नाही. सध्याच्या लोकसंख्येच्यादृष्टीने नगरपंचायत किंवा नगरपालिका शासनाच्या नियमानुसार स्थापन होऊ शकते.