शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
6
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
7
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
8
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
9
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
10
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
11
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
12
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
13
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
14
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
15
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
16
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
17
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
18
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
19
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
20
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ

उदगाव चौक बनला अपघाताचे केंद्र

By admin | Updated: September 15, 2015 01:11 IST

सातत्याने अपघातसत्र : दिशादर्शक फलकांची गरज; अतिक्रमणे काढण्याची मागणी

जयसिंगपूर : अनेक आंदोलनानंतर सांगली-कोल्हापूर चौपदरीकरण रस्ता मंजूर झाला. तरीही रखडलेल्या व जयसिंगपुरातून जाणाऱ्या तमदलगे-उदगाव या दुपदरीकरण रस्त्यावर अपघातांच्या घटना घडतच आहेत. यामध्ये प्रामुख्याने उदगाव हे अपघाताचे केंद्र बनत आहे. सांगलीकडे वळण घेणारा हा रस्ता अपघातास निमंत्रण देत असून, या मार्गावरील अतिक्रमणे काढण्याबरोबरच दिशादर्शक फलक लावण्याची गरज आहे. खबरदारीचे योग्य नियोजन झाले, तरच अपघात टळणार आहेत. सांगली-कोल्हापूर महामार्गावर असलेले उदगाव हे मोठे गाव आहे. येथून शिरोळ, नृसिंहवाडी, चिंचवाड, अर्जुनवाड, जयसिंगपूर रेल्वे स्टेशन, सांगली, जयसिंगपूरकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. उदगावमधील बसस्थानक चौकात लहान-मोठे असे अनेक अपघात घडत आहेत. या अपघातांत गेल्या वर्षभरात १५-२० जणांचा बळी गेला आहे. उदगाव येथे सांगली-कोल्हापूर मार्गावरील खोत पेट्रोल पंपाजवळचे बाह्यवळण, उदगाव-शिरोळ रस्ता, तसेच रेल्वेब्रीज, अंकली टोलनाका हे अपघातांचे केंद्र बनले आहेत. सध्या सांगली-कोल्हापूर महामार्गाचे काम सुरू असून, उदगावमार्गे जाणारा रस्ता दुपदरी होणार आहे. मात्र, रस्ता अरुंदच राहिल्यामुळे पुन्हा अपघाताची शक्यता आहे. पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन रस्ता पार करावा लागतो. उदगाव येथील बसस्थानक चौकामध्ये रस्ता अरुंद आहे. तसेच परिसरात अतिक्रमणाचा विळखा मोठ्या प्रमाणात असून, अतिक्रमण हटविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. महामार्गालगतच प्राथमिक शाळा आहे. ही शाळा माळावरील शाळेत भरविण्याची गरज निर्माण झाली आहे. येथील बसथांब्यावर प्रवासी वर्गाला जीव मुठीत घेऊन थांबावे लागते. रस्त्यावर वाहनांची वर्दळ असल्यामुळे बस थांबल्यानंतर वाहतूक कोंडी होते. यामुळे बसस्थानक दुसरीकडे हलविण्याची गरज असून, ग्रामपंचायतीकडे त्यासाठी जागाही उपलब्ध आहे. या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. महामार्गावरच्या बाह्य वळणावर पथदिवे, गतिरोधक, दिशादर्शक फलक लावण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे. (प्रतिनिधी)