शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

उदगाव चौक बनला अपघाताचे केंद्र

By admin | Updated: September 15, 2015 01:11 IST

सातत्याने अपघातसत्र : दिशादर्शक फलकांची गरज; अतिक्रमणे काढण्याची मागणी

जयसिंगपूर : अनेक आंदोलनानंतर सांगली-कोल्हापूर चौपदरीकरण रस्ता मंजूर झाला. तरीही रखडलेल्या व जयसिंगपुरातून जाणाऱ्या तमदलगे-उदगाव या दुपदरीकरण रस्त्यावर अपघातांच्या घटना घडतच आहेत. यामध्ये प्रामुख्याने उदगाव हे अपघाताचे केंद्र बनत आहे. सांगलीकडे वळण घेणारा हा रस्ता अपघातास निमंत्रण देत असून, या मार्गावरील अतिक्रमणे काढण्याबरोबरच दिशादर्शक फलक लावण्याची गरज आहे. खबरदारीचे योग्य नियोजन झाले, तरच अपघात टळणार आहेत. सांगली-कोल्हापूर महामार्गावर असलेले उदगाव हे मोठे गाव आहे. येथून शिरोळ, नृसिंहवाडी, चिंचवाड, अर्जुनवाड, जयसिंगपूर रेल्वे स्टेशन, सांगली, जयसिंगपूरकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. उदगावमधील बसस्थानक चौकात लहान-मोठे असे अनेक अपघात घडत आहेत. या अपघातांत गेल्या वर्षभरात १५-२० जणांचा बळी गेला आहे. उदगाव येथे सांगली-कोल्हापूर मार्गावरील खोत पेट्रोल पंपाजवळचे बाह्यवळण, उदगाव-शिरोळ रस्ता, तसेच रेल्वेब्रीज, अंकली टोलनाका हे अपघातांचे केंद्र बनले आहेत. सध्या सांगली-कोल्हापूर महामार्गाचे काम सुरू असून, उदगावमार्गे जाणारा रस्ता दुपदरी होणार आहे. मात्र, रस्ता अरुंदच राहिल्यामुळे पुन्हा अपघाताची शक्यता आहे. पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन रस्ता पार करावा लागतो. उदगाव येथील बसस्थानक चौकामध्ये रस्ता अरुंद आहे. तसेच परिसरात अतिक्रमणाचा विळखा मोठ्या प्रमाणात असून, अतिक्रमण हटविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. महामार्गालगतच प्राथमिक शाळा आहे. ही शाळा माळावरील शाळेत भरविण्याची गरज निर्माण झाली आहे. येथील बसथांब्यावर प्रवासी वर्गाला जीव मुठीत घेऊन थांबावे लागते. रस्त्यावर वाहनांची वर्दळ असल्यामुळे बस थांबल्यानंतर वाहतूक कोंडी होते. यामुळे बसस्थानक दुसरीकडे हलविण्याची गरज असून, ग्रामपंचायतीकडे त्यासाठी जागाही उपलब्ध आहे. या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. महामार्गावरच्या बाह्य वळणावर पथदिवे, गतिरोधक, दिशादर्शक फलक लावण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे. (प्रतिनिधी)