शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

उदगाव चौक बनला अपघाताचे केंद्र

By admin | Updated: September 15, 2015 01:11 IST

सातत्याने अपघातसत्र : दिशादर्शक फलकांची गरज; अतिक्रमणे काढण्याची मागणी

जयसिंगपूर : अनेक आंदोलनानंतर सांगली-कोल्हापूर चौपदरीकरण रस्ता मंजूर झाला. तरीही रखडलेल्या व जयसिंगपुरातून जाणाऱ्या तमदलगे-उदगाव या दुपदरीकरण रस्त्यावर अपघातांच्या घटना घडतच आहेत. यामध्ये प्रामुख्याने उदगाव हे अपघाताचे केंद्र बनत आहे. सांगलीकडे वळण घेणारा हा रस्ता अपघातास निमंत्रण देत असून, या मार्गावरील अतिक्रमणे काढण्याबरोबरच दिशादर्शक फलक लावण्याची गरज आहे. खबरदारीचे योग्य नियोजन झाले, तरच अपघात टळणार आहेत. सांगली-कोल्हापूर महामार्गावर असलेले उदगाव हे मोठे गाव आहे. येथून शिरोळ, नृसिंहवाडी, चिंचवाड, अर्जुनवाड, जयसिंगपूर रेल्वे स्टेशन, सांगली, जयसिंगपूरकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. उदगावमधील बसस्थानक चौकात लहान-मोठे असे अनेक अपघात घडत आहेत. या अपघातांत गेल्या वर्षभरात १५-२० जणांचा बळी गेला आहे. उदगाव येथे सांगली-कोल्हापूर मार्गावरील खोत पेट्रोल पंपाजवळचे बाह्यवळण, उदगाव-शिरोळ रस्ता, तसेच रेल्वेब्रीज, अंकली टोलनाका हे अपघातांचे केंद्र बनले आहेत. सध्या सांगली-कोल्हापूर महामार्गाचे काम सुरू असून, उदगावमार्गे जाणारा रस्ता दुपदरी होणार आहे. मात्र, रस्ता अरुंदच राहिल्यामुळे पुन्हा अपघाताची शक्यता आहे. पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन रस्ता पार करावा लागतो. उदगाव येथील बसस्थानक चौकामध्ये रस्ता अरुंद आहे. तसेच परिसरात अतिक्रमणाचा विळखा मोठ्या प्रमाणात असून, अतिक्रमण हटविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. महामार्गालगतच प्राथमिक शाळा आहे. ही शाळा माळावरील शाळेत भरविण्याची गरज निर्माण झाली आहे. येथील बसथांब्यावर प्रवासी वर्गाला जीव मुठीत घेऊन थांबावे लागते. रस्त्यावर वाहनांची वर्दळ असल्यामुळे बस थांबल्यानंतर वाहतूक कोंडी होते. यामुळे बसस्थानक दुसरीकडे हलविण्याची गरज असून, ग्रामपंचायतीकडे त्यासाठी जागाही उपलब्ध आहे. या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. महामार्गावरच्या बाह्य वळणावर पथदिवे, गतिरोधक, दिशादर्शक फलक लावण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे. (प्रतिनिधी)