शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

आत्महत्यांना उद्धव ठाकरेही जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2017 23:07 IST

आत्महत्यांना उद्धव ठाकरेही जबाबदार

लोकमत न्यूज नेटवर्कसावर्डे : सरकार भोंगळ कारभार करीत आहे. कोकणातील शेतकऱ्यांना भाताला हमीभाव नाही. मंत्र्यांचे लिपिक भ्रष्टाचार करीत आहेत. परराज्यातील मत्स्य व्यावसायिकांचा कोकणातील शिरकाव डोकेदुखी ठरत आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. कर्जमाफीची मागणी करणारे उद्धव ठाकरे हेही राज्य सरकारमधील हिस्सेदार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना तेही तेवढेच जबाबदार आहेत, असा आरोप राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झालेल्या संघर्ष यात्रेची जाहीर सभा चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे झाली. त्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री नारायण राणे, पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, रिपब्लिकन पक्षाचे जोगेंद्र कवाडे, भास्कर जाधव यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी उपस्थित होते.काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, समाजवादी पक्ष, शेतकरी संघटना, रिपब्लिकन पक्ष (कवाडे गट) यांच्यावतीने चांद्यापासून बांद्यापर्यंत निघालेली यात्रा बुधवारी दुपारी चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे पोहोचली. यावेळी संघर्ष यात्रेच्या निमित्ताने जाहीर सभा घेण्यात आली. गोविंदरावजी निकम विद्यालयातील भाऊसाहेब महाडिक सभागृहात हजारो शेतकरी आणि कष्टकरी उपस्थित होते.प्रास्ताविकमध्ये आमदार भास्कर जाधव यांनी कोकणातील प्रश्न राज्यातील नेतेमंडळींच्या समोर मांडले. ३० हजार पाचशे कोटी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायला सरकारकडे पैसे नाहीत. बाकी उधळपट्टीसाठी सरकारकडे पैसे आहेत. राज्य सरकार हे शिव्या आणि शाप देणारे सरकार असल्याची टीका प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केली. सात-बारा कोरा करतो म्हणून सांगत मोदींनी देशाला, तर फडणवीसांनी राज्याला देशोधडीला लावले, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.सहावेळा खासदार आणि केंद्रात मंत्री असलेल्यांनी कोकणासाठी काय केले, असा प्रश्न राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला. महामार्गावर दरवर्षी अपघातात चारशे बळी जातात, याला जबाबदार कोण, असा प्रश्नही त्यांनी केला. नारायण राणे म्हणाले...- विधान परिषद सुरू राहावी आणि वैयक्तिक कारणासाठी सुरुवातीला संघर्ष यात्रेत सहभागी झालो नव्हतो.- सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नाही. उलट चेष्टा करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले जाते.- सत्तेसाठी हापापलेली शिवसेना डरपोक आहे.- रामदास कदम यांनी कॉलेजची जमीन बळकावली.- ६२ पैकी ३७ आमदार कुठे आहेत ते उद्धव ठाकरे यांनी शोधावे- कोकणाने वेगळा कोकण कधीच मागितला नाही- अच्छे दिन ऐवजी महागाई वाढली- नोटबंदीमुळे बाजारपेठेतील ४० टक्के व्यवहार ठप्प- मासेमारी ठप्प आहे, कोकणातल्या माणसांची चेष्टा सुरू आहे.- वाळूवर, चिऱ्यावर रॉयल्टी वाढवली, पण शिवसेनेचे चार-चार मंत्री असून काहीच उपयोग नाही, लोणचं घाला या मंत्र्याचं.- सरकारचे खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे.धनंजय मुंडे म्हणाले...- रामदास कदम आणि सेनेला गंभीर घेऊ नका- सेनेनं आता वाघ काढून सरडा चिन्ह लावलं पाहिजे- कॅबिनेटमध्ये निर्णय होताना रामदास कदम झोपले होते का?- निर्णय झाल्यावर तमाशा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार, हे थांबलं पाहिजे, नाहीतर सेनेचा तमाशा झाल्याशिवाय राहणार नाही.