शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

उदगाव गुन्हेगारीच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:00 IST

संतोष बामणे ।लोकमत न्यूज नेटवर्कउदगाव : सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले २२ हजार लोकसंख्येचे उदगाव हे गाव आहे. कृष्णा नदीच्या पलीकडे सांगली जिल्हा असून, उदगाव, जयसिंगपूर परिसरातील गुन्हेगारांना सांगली जिल्ह्यात अगदी एक किलोमीटरमध्ये आश्रय मिळतो. त्यामुळे उदगाव गुन्हेगारीच्या विळख्यात अडकले आहे. उदगाव येथे झालेल्या जबरी दरोड्यामुळे गाव भीतीच्या छायेखाली असून, दरोडेखोरांना ...

संतोष बामणे ।लोकमत न्यूज नेटवर्कउदगाव : सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले २२ हजार लोकसंख्येचे उदगाव हे गाव आहे. कृष्णा नदीच्या पलीकडे सांगली जिल्हा असून, उदगाव, जयसिंगपूर परिसरातील गुन्हेगारांना सांगली जिल्ह्यात अगदी एक किलोमीटरमध्ये आश्रय मिळतो. त्यामुळे उदगाव गुन्हेगारीच्या विळख्यात अडकले आहे. उदगाव येथे झालेल्या जबरी दरोड्यामुळे गाव भीतीच्या छायेखाली असून, दरोडेखोरांना गजाआड करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे उदगावमध्ये पोलीस आऊटपोस्ट गरजेचे आहे.कलेचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाºया उदगावमध्ये औद्योगिक वसाहती, सांगली-कोल्हापूर महामार्ग, रेल्वे लोहमार्ग असून, सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांतील आंदोलने, अपघाताचे क्षेत्र, जोगणी यात्रा येथे सातत्याने होत असतात. यामुळे जयसिंगपूर पोलिसांना वारंवार उदगावमध्ये बंदोबस्त ठेवावा लागतो. अशातच रविवारी मध्यरात्री निवृत्त प्रा. बाबूराव निकम यांच्या घरी सशस्त्र दरोडा घालून त्यांची पत्नी अरुणा निकम यांना ठार करून २५ तोळे सोने व ५० हजारांची रोकड लंपास केली होती. या घटनेमुळे उदगाव परिसर भीतीच्या छायेखाली आहे.उदगाव-जयसिंगपूर परिसरात एखादी घटना घडली तर तो गुन्हेगार सांगली जिल्ह्याच्या आश्रयाला जातो. त्यामुळे कोल्हापूर व सांगली पोलिसांना शोधमोहिमेसाठी अडचणीचे ठरते. फक्त एक किलोमीटरवर असलेल्या सांगली जिल्ह्यामुळे गुन्हेगारीला वाव मिळत आहे. यातच उदगावमध्ये वाळू, वीट, माती व्यवसायासह बेकायदा सावकारकी जोमात आहे. अवैध धंद्याचे कनेक्शन उदगावकरांना डोकेदुखी बनले आहे. अशातच येथे गुन्ह्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी या बाबींचा आढावा घेऊन तत्काळ उदगावला पोलीस आऊटपोस्ट मंजूर करावे, अशी मागणी गावातून जोर धरत आहे.कुटुंब धास्तावलेनिकम कुटुंबीय हे सर्वसामान्य जनतेत मिसळून वागणारे आहे. हुपरी येथून बाबूराव निकम हे दोन वर्षांपासून निवृत्त झाल्यापासून ज्येष्ठ सेवासंघ व शेतीमध्ये लक्ष घालून त्यांचा दिनक्रम सुरू होता. अशातच दरोडेखोरांनी रेकी करून निकम यांच्या घरी दरोडा टाकला. यामध्ये अरुणा निकम या जागीच ठार झाल्या, तर बाबूराव निकम यांच्यावर मिरज येथील मिशन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची दोन मुले व मुलगीला जबरी धक्का बसला असून, निकम कुटुंबीय धास्तावले आहेत.