शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

ऊर्जामंत्र्यांचा सल्ला जबाबदारी झटकण्याचा प्रकार

By admin | Updated: March 19, 2015 00:10 IST

वीजदर सवलत प्रकरण : वस्त्रोद्योगातील उद्योजकांचा नाराजीचा सूर

राजराम पाटील - इचलकरंजी ऊर्जा नियामक आयोगाकडे वाढीव वीजदराबाबत यंत्रमागधारकांच्या संघटनांनी वारंवार म्हणणे मांडले असले, तरी दरवाढ रद्द झालेली नाही. तसेच गेल्या दहा वर्षांत स्वतंत्र वर्गवारी मिळाली नाही, अशा पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा आयोगाकडे जाण्याचा सल्ला म्हणजे शासनाने हात झटकण्याचाच प्रकार आहे. परिणामी वस्त्रोद्योगात नाराजीचा सूर आहे.दहा वर्षांपूर्वी वीज कायदा अस्तित्वात आला. वीजदर निश्चिती आणि विजेबाबत निर्माण होणाऱ्या वाद-तक्रारींचे निवारण करण्याचे अधिकार महाराष्ट्र ऊर्जा नियामक आयोगाकडे गेले. वीज दरवाढ किंवा तत्सम प्रकरणांच्या सुनावण्या दरवर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यांत आयोगासमोर चालतात. त्याप्रमाणे यंत्रमागधारक व वीज ग्राहक संघटना यंत्रमागासाठी स्वतंत्र वर्गवारीची मागणी वारंवार करते; पण आयोगाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.त्याचबरोबर वीज दरवाढीच्या महावितरण कंपनीच्या प्रस्तावावर आयोगासमोर अनेक सुनावण्या झाल्या. प्रत्येक सुनावणीवेळी वीज निर्मितीतील भ्रष्टाचार, गळतीच्या नावाखाली लपलेली वीजचोरी, पूर्ण क्षमतेत न होणारे वीज उत्पादन, आदी मुद्दे ग्राहक संघटनांनी आयोगासमोर मांडले; पण शेवटी वीज दरवाढीला मंजुरी दिली गेली, असे कटू अनुभव वीज ग्राहकांना नेहमीच येतात. त्याच आयोगाकडे पुन्हा जाण्याचा सल्ला ऊर्जामंत्र्यांनी दिल्याने यंत्रमागधारकांना आश्चर्य वाटत आहे. (उत्तरार्ध)ऊर्जामंत्र्यांच्या दालनात सोमवारी (१६ मार्च) झालेली बैठक म्हणजे मॅच फिक्सिंग होती. यंत्रमागाला स्वतंत्र वर्गवारी देऊन शासनाने यंत्रमाग उद्योगाला विजेच्या दरात सवलत द्यावी. विजेचे दर किमान पाच वर्षे स्थिर ठेवावेत.- गोरखनाथ सावंत, अध्यक्ष - इचलकरंजी शटललेस लूम ओनर्स असोसिएशन.यंत्रमागासाठी स्वतंत्र वर्गवारी व वीजदर सवलत देण्यास शासनाची अनुकूलता आहे; पण वर्गवारी ठरविण्याचे अधिकार ऊर्जा नियामक आयोगाला आहेत, असे ऊर्जामंत्र्यांचे म्हणणे आहे. वीजदराची सवलत स्थिर असावी. - दीपक राशिनकर, अध्यक्ष - कोल्हापूर जिल्हा पॉवरलूम असोसिएशन.यंत्रमागासाठी कृषीपंपाप्रमाणे स्वतंत्र वर्गवारी असलीच पाहिजे. ऊर्जा आयोगाकडे तशी मागणी सातत्याची आहे. पूर्वीचाच सवलतीचा वीजदर मिळावा. याचा निर्णय शासनानेच केला पाहिजे.- सतीश कोष्टी, अध्यक्ष - इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स असोसिएशन.