शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मामाला भेटून परत येताना मांजरेचे दोन युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:30 IST

मलकापूर : करंजपेण - येळवण जुगाई मार्गावरील मोसम गावच्या हद्दीतील रस्त्यात थांबलेल्या डंपरला धडकून झालेल्या अपघातात मांजरे, ता. ...

मलकापूर : करंजपेण - येळवण जुगाई मार्गावरील मोसम गावच्या हद्दीतील रस्त्यात थांबलेल्या डंपरला धडकून झालेल्या अपघातात मांजरे, ता. शाहूवाडी येथील दोन युवक जागीच ठार झाले. मृत झालेल्या युवकाची नावे अशी, बाळासाहेब लहू भातडे (वय २०), सचिन बाळकृष्ण शेलार (वय २२). ही घटना रात्री ७.३० वाजता घडली असून, याची नोंद शाहूवाडी पोलिसांत झाली आहे.

अपघाताबाबत शाहूवाडी पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, बाळासाहेब भातडे व सचिन शेलार हे दोघे करंजपेण या गावी बाळासाहेबाच्या मामाला भेटण्यासाठी मोटारसायकल क्रमांक (एम एच ०९ - ए - ३६२४) वरून गेले होते. बाळासाहेब स्वत: मोटारसायकल चालवित होते. मामाला भेटून झाल्यानंतर हे दोघे करंजपेण - येळवण जुगाई रस्त्यावरून मांजरे गावाकडे येत होते. मोटारसायकल मोसम गावच्या हद्दीत आल्यावर मोसम गावात रस्त्याकडेला बंद असलेल्या डंपर क्रमांक (एम एच १० - सी. आर. ९७७२) वर मोटारसायकल जोरात धडकली. यामध्ये बाळासाहेब व सचिन या दोघांचा जागीच मृत्यू झाला. दोघांच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. अपघाताची माहिती मांजरे गावात समजताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. मृत बाळासाहेब व सचिन या दोघांचे मृतदेह मलकापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले होते. वैद्यकीय अधिकारी यांनी मृतदेहांचे शवविच्छेदन केल्यावर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. रात्री उशिरा दोघांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बाबासाहेब यांचे शिक्षण पदवीपर्यंत झाले होते, तर सचिन हा हॉटेल कामगार होता. सचिन आई-वडिलांना एकुलता एक होता. या दोन युवकांच्या मृत्यूने मांजरे गावावर शोककळा पसरली आहे.

॥ हेल्मेट असते तर जीव वाचला असता ॥

बाळासाहेब व त्याचा मित्र सचिन हे दोघे बाळासाहेबांच्या मामाला भेटायला गेले होते. बाबासाहेब मोटारसायकल चालवित होते. दोघांच्याही डोक्यावर हेल्मेट नव्हते, जर हेल्मेट असते तर जीव वाचला असता.

फोटो

बाळासाहेब भातडे

सचिन शेलार