शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

धामणी खोऱ्यातील दोन गावं ‘गावपळण’साठी वेशीबाहेर ॥

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कसबा तारळे : ग्रामीण भागात पूर्वापार चालत आलेल्या रूढी, परंपरा व ग्रामदैवतेवरील श्रद्धेपोटी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कसबा तारळे : ग्रामीण भागात पूर्वापार चालत आलेल्या रूढी, परंपरा व ग्रामदैवतेवरील श्रद्धेपोटी गाव पळणची प्रथा आजही कायम आहे. राधानगरी तालुक्याचे शेवटचे टोक असणाऱ्या धामणी खोऱ्यातील चौके व मानबेट या दोन गावांतील ग्रामस्थ कुटुंबकबिल्यासह ‘गावपळण’साठी रविवार (दि. २८)पासून पुढील पाच दिवस गावच्या वेशीपासून दूर राहणार आहेत. दर तीन वर्षांनंतर ही गावपळण होते.

पाच दिवसांनंतर ग्रामदैवत रासाईदेवीचा कौल घेऊन मगच गावात गावकरी परतणार आहेत. कदाचित कौल झाला नाही, तर मुक्काम वाढण्याचीही शक्यता आहे. गावपळणच्या काळात वरील दोन गावांत लाईट बंद असून चूल किंवा दिवाबत्तीचा उजेडही केला जात नाही. इतकेच नव्हे तर घराच्या दरवाजांना कडीकोंयडा लावत नाहीत. गावच्या वेशीच्या आत किंवा हद्दीतील असणाऱ्या शेती शिवारातही ग्रामस्थ फिरकत नाहीत. या पाच दिवसांच्या काळात गावात नीरव शांतताच पाहावयास मिळते.

कुणीही या प्रथेबद्दल ठोस माहिती देत नसली तरीही वयोवृद्ध मंडळींच्या माहितीनुसार, चार पिढ्यांपासून ही प्रथा वरील दोन गावांत सुरू आहे. या प्रथेला कोणी विरोध केला तर गावात काहीतरी अघटित घडण्याची भीतीही व्यक्त होत आहे. गावापासून दूर गेल्याने ही मंडळी मोकळ्या जागेत किंवा माळरानावर पाल किंवा झोपडी मारून समुदायाने राहतात. शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या, गुरेढोरे यांचीही सोय एकत्रित केलेली असते. गावात असताना आपापसातील भांडण-तंटे या काळात येथे पाहावयास मिळत नाहीत. याउलट ही गावपळण म्हणजे एक प्रकारचा उत्सव समजून नोकरी-धंद्यानिमित्त बाहेर असणारी या दोन्ही गावांतील मंडळी या निमित्ताने वेळ काढून कुटुंबासह या गावपळणमध्ये सहभागी होतात.

एकंदरीत गावपळणच्या निमित्तानं गावच्या वेशीपासून दूर राहणाऱ्या दोन गावांतील नागरिकांसह या काळातील त्यांच्या जीवनशैलीचे अप्रूप तालुक्यासह जिल्ह्याला वाटत आहे.

कोट --

गावपळणची प्रथा माझ्या आजा-पंजा-वडिलापासून सुरू आहे. हल्लीची तरुण पिढी याबद्दल नाक मुरडते. जे चांगलं आहे ते पाळायला काय हरकत आहे आणि त्यापासून काय त्रास नाही.

चंद्राप्पा विठ्ठल पाटील

(पंचाहत्तर वर्षीय, चौके ग्रामस्थ )

-

फोटो कॅप्शन-- गावपळणच्या निमित्ताने गावाबाहेर ग्रामस्थांनी उभा केलेले मांडव व झोपड्या.

२,३,संपूर्ण गावच स्थलांतरित झाल्याने गावात अशाच शुकशुकाट दिसत आहे.

( छायाचित्र/ रमेश साबळे )