शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

‘एव्हीएच’ कामगारांची दोन वाहने पेटविली

By admin | Updated: June 3, 2015 01:11 IST

१५ कामगार जखमी : अज्ञात हल्लेखोरांकडून हल्ला

चंदगड : हलकर्णी (ता. चंदगड) येथील ‘एव्हीएच’ प्रकल्पात काम करणाऱ्या कामगारांना बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यावरील सुपे फाट्यानजीक अज्ञात हल्लेखोरांनी वाहने अडवून बेदम मारहाण केली व गाड्यांवर दगडफेक करून दोन वाहने पेटविली. हल्लेखोरांनी तोंडावर मास्क करून ट्रॅकसूट घातली होती. वाहन पेटवून हल्लेखोर उसातून पसार झाले. ही घटना मंगळवारी सायंकाळी सात वाजता घडली.सात मार्च रोजी आंदोलकांनी एव्हीएच कंपनीची जाळपोळ केली होती. जनभावनेचा आदर करून राज्य शासनाने कंपनीच्या उत्पादनाला स्थगिती दिली. पण, गेल्या आठ-दहा दिवसांपासून जाळपोळीत नुकसान झालेल्या मशिनरींची दुरुस्ती करण्यात येत होती. यासाठी बेळगावहून पोलीस बंदोबस्तात कामगारांना आणणे व सोडण्याचा दिनक्रम सुरू होता. मंगळवारी सायंकाळी सात वाजता काम आटोपल्यानंतर कामगारांना घेऊन तीन गाड्या बेळगावला जात होत्या. यासोबत पोलीस गाडीही होती. सुपे आरटीओ नाक्यानजीक या कामगारांच्या गाड्यांना सोडून राहिलेल्या कामगारांना आणण्यासाठी पोलीस गाडी परत गेली. याचा फायदा घेऊन दोन वाहनांवर दगडफेक केली. तिसऱ्या वाहनधारकाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गाडी परतून लावली. या वाहनातील कामगारांना हल्लेखोरांनी बाहेर काढून मारहाण केली. काही कामगार हल्लेखोरांचे मोबाईलवर फोटो घेण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी हल्लेखोरांनी कामगारांचे मोबाईल काढून घेऊन पुन्हा मारहाण केली. त्यामुळे भयभीत कामगार वाट मिळेल त्या दिशेने पळत सुटले. १० मिनिटांतच पोलीस दाखल झाले. परंतु हल्लेखोरांनी पलायन केले. बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यावर वाहने पेटत असल्याने या मार्गावरील २ तास वाहतूक ठप्प झाली. जखमींची नावे रात्री उशिरापर्यंत समजली नाहीत. हल्लेखोरांनी फक्त दहा मिनिटांतच दोन वाहने पेटवल्याने या हल्ला पूर्वनियोजित असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तपास पोलीस निरीक्षक अंगद जाधवर, पोलीस उपनिरीक्षक शरद माळी करीत आहेत. (प्रतिनिधी)आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न : बाभूळकरकोल्हापूर येथे मागील आठवड्यातच मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांच्यासमवेत एव्हीएच संदर्भात बैठक झाली होती. या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय समिती नेमून एव्हीएच कंपनीची चौकशी करणार असून, त्याचा अहवाल येईपर्यंत कंपनीला दिलेली स्थगिती उठविणार नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते. त्यामुळे समितीचा अहवाल येईपर्यंत कोणतेही आंदोलन करणार नसल्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे मंगळवारी झालेली घटना आमच्या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी सांगितले.कोल्हापुरातील बैठकीत कृती समितीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी निरीची उच्चस्तरीय समिती नेमून एव्हीएच कंपनीची चौकशी करणार असल्याचे आश्वासन दिले होते. समितीचा अहवाल येईपर्यंत आंदोलन करणार नाही, असे कृती समितीमध्ये ठरले. लोकशाही मार्गाने आंदोलन करत असतानाच ही घटना आंदोलनाला गालबोट लावणारी आहे. हा पूर्वनियोजित कट का असू नये, असे सांगून या घटनेचा निषेध करत असल्याचे कृती समितीचे अ‍ॅड. संतोष मळवीकर यांनी सांगितले.घटनाक्रम २५ जानेवारी २०१३ - कंपनीची जाळपोळ २७ मे २०१३ - जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलकांचा हल्ला ७ मार्च २०१५ - कंपनीची पुन्हा जाळपोळ९ मार्च २०१५ - सुपेनजीक एका वाहनाची जाळपोळ २ जून २०१५ - सुपेनजीक दोन वाहनांची जाळपोळ व कामगारांना मारहाण