शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘एव्हीएच’ कामगारांची दोन वाहने पेटविली

By admin | Updated: June 3, 2015 01:11 IST

१५ कामगार जखमी : अज्ञात हल्लेखोरांकडून हल्ला

चंदगड : हलकर्णी (ता. चंदगड) येथील ‘एव्हीएच’ प्रकल्पात काम करणाऱ्या कामगारांना बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यावरील सुपे फाट्यानजीक अज्ञात हल्लेखोरांनी वाहने अडवून बेदम मारहाण केली व गाड्यांवर दगडफेक करून दोन वाहने पेटविली. हल्लेखोरांनी तोंडावर मास्क करून ट्रॅकसूट घातली होती. वाहन पेटवून हल्लेखोर उसातून पसार झाले. ही घटना मंगळवारी सायंकाळी सात वाजता घडली.सात मार्च रोजी आंदोलकांनी एव्हीएच कंपनीची जाळपोळ केली होती. जनभावनेचा आदर करून राज्य शासनाने कंपनीच्या उत्पादनाला स्थगिती दिली. पण, गेल्या आठ-दहा दिवसांपासून जाळपोळीत नुकसान झालेल्या मशिनरींची दुरुस्ती करण्यात येत होती. यासाठी बेळगावहून पोलीस बंदोबस्तात कामगारांना आणणे व सोडण्याचा दिनक्रम सुरू होता. मंगळवारी सायंकाळी सात वाजता काम आटोपल्यानंतर कामगारांना घेऊन तीन गाड्या बेळगावला जात होत्या. यासोबत पोलीस गाडीही होती. सुपे आरटीओ नाक्यानजीक या कामगारांच्या गाड्यांना सोडून राहिलेल्या कामगारांना आणण्यासाठी पोलीस गाडी परत गेली. याचा फायदा घेऊन दोन वाहनांवर दगडफेक केली. तिसऱ्या वाहनधारकाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गाडी परतून लावली. या वाहनातील कामगारांना हल्लेखोरांनी बाहेर काढून मारहाण केली. काही कामगार हल्लेखोरांचे मोबाईलवर फोटो घेण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी हल्लेखोरांनी कामगारांचे मोबाईल काढून घेऊन पुन्हा मारहाण केली. त्यामुळे भयभीत कामगार वाट मिळेल त्या दिशेने पळत सुटले. १० मिनिटांतच पोलीस दाखल झाले. परंतु हल्लेखोरांनी पलायन केले. बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यावर वाहने पेटत असल्याने या मार्गावरील २ तास वाहतूक ठप्प झाली. जखमींची नावे रात्री उशिरापर्यंत समजली नाहीत. हल्लेखोरांनी फक्त दहा मिनिटांतच दोन वाहने पेटवल्याने या हल्ला पूर्वनियोजित असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तपास पोलीस निरीक्षक अंगद जाधवर, पोलीस उपनिरीक्षक शरद माळी करीत आहेत. (प्रतिनिधी)आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न : बाभूळकरकोल्हापूर येथे मागील आठवड्यातच मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांच्यासमवेत एव्हीएच संदर्भात बैठक झाली होती. या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय समिती नेमून एव्हीएच कंपनीची चौकशी करणार असून, त्याचा अहवाल येईपर्यंत कंपनीला दिलेली स्थगिती उठविणार नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते. त्यामुळे समितीचा अहवाल येईपर्यंत कोणतेही आंदोलन करणार नसल्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे मंगळवारी झालेली घटना आमच्या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी सांगितले.कोल्हापुरातील बैठकीत कृती समितीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी निरीची उच्चस्तरीय समिती नेमून एव्हीएच कंपनीची चौकशी करणार असल्याचे आश्वासन दिले होते. समितीचा अहवाल येईपर्यंत आंदोलन करणार नाही, असे कृती समितीमध्ये ठरले. लोकशाही मार्गाने आंदोलन करत असतानाच ही घटना आंदोलनाला गालबोट लावणारी आहे. हा पूर्वनियोजित कट का असू नये, असे सांगून या घटनेचा निषेध करत असल्याचे कृती समितीचे अ‍ॅड. संतोष मळवीकर यांनी सांगितले.घटनाक्रम २५ जानेवारी २०१३ - कंपनीची जाळपोळ २७ मे २०१३ - जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलकांचा हल्ला ७ मार्च २०१५ - कंपनीची पुन्हा जाळपोळ९ मार्च २०१५ - सुपेनजीक एका वाहनाची जाळपोळ २ जून २०१५ - सुपेनजीक दोन वाहनांची जाळपोळ व कामगारांना मारहाण