शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

‘दो हंसो का जोडा बिछड गया’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 00:36 IST

कोल्हापूर : हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचे जेवढे मल्लविद्येवर प्रेम होते, तितकेच प्रेम त्यांच्या पत्नी सुमित्रा अर्थात माई यांच्यावरही होते. या दोघांचे बंध ५१ वर्षांपूर्वीचे. मार्इंचे भाऊ किशोर हे हिंदकेसरींच्याकडे मोतीबाग तालीम येथे कुस्तीचे धडे गिरवण्यासाठी जात होते त्यातूनच मार्इंची व वस्तादांची ओळख झाली. ओळखीचे प्रेमात अन् सरतेशेवटी लग्नात रूपांतर झाले. ...

कोल्हापूर : हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचे जेवढे मल्लविद्येवर प्रेम होते, तितकेच प्रेम त्यांच्या पत्नी सुमित्रा अर्थात माई यांच्यावरही होते. या दोघांचे बंध ५१ वर्षांपूर्वीचे. मार्इंचे भाऊ किशोर हे हिंदकेसरींच्याकडे मोतीबाग तालीम येथे कुस्तीचे धडे गिरवण्यासाठी जात होते त्यातूनच मार्इंची व वस्तादांची ओळख झाली. ओळखीचे प्रेमात अन् सरतेशेवटी लग्नात रूपांतर झाले. ५१ वर्षांच्या संसारानंतर रविवारी रात्री ज्या हृदयात त्यांनी मार्इंना बसविले होते, तेच बंद पडल्याने मार्इंचा आधार निघून गेला.माई उच्चशिक्षित, तर हिंदकेसरी अक्षरशत्रू होते. सुरुवातीच्या काळात अनेक अडचणींना या दोघांना सामोरे जावे लागले. कोल्हापुरातील भेंडी गल्ली येथे मार्इंचे राहते घर होते. वडील मुंबई येथे रेल्वेत नोकरीस असल्याने त्याही तेथे खासगी कंपनीत नोकरी करीत होत्या. सुटी मिळेल त्याप्रमाणे त्या कोल्हापुरात येत असत. त्यात भाऊ किशोर हे हिंदकेसरी गणपतराव यांच्या मोतीबाग तालमीमध्ये कुस्तीचे धडे गिरवत होते. किशोरसोबत त्यांनी मार्इंना चार-पाचवेळा पाहिले.तेव्हापासून ते मार्इंच्या प्रेमात पडले. भाऊ किशोरही वस्तादांबद्दल खूप काही चांगले सांगत. कालांतराने ओळख वाढली आणि त्यांच्या प्रेमाची चर्चा मोतीबाग तालमीतही पोहोचली. एकेदिवशी किशोरकडूनच मार्इंना लग्नाबाबत मागणी घातली; मात्र त्यास नकार देत किशोर यांनाच त्यांनी फटकारले. त्यात मार्इंची अट होती मुंबईतीलच नवरा करणार. दरम्यानच्या काळात हिंदकेसरींचा कुस्तीतील डंका देशभरात गाजू लागल्याने मार्इंची ही अट मागे पडली आणि त्याचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांच्या घरच्यांचा त्यांच्या लग्नाला प्रथम विरोध होता.हिंदकेसरींनी त्यांची समजूत काढत दोन्ही कुटुंबांना राजी केले. त्यात मार्इंच्या नातेवाइकांनीही सखोल चौकशी करीत, अखेर लग्नाला होकार दिला. ३ जून १९६७ साली केशवराव भोसले नाट्यगृहात मोठ्या थाटामाटात त्यांचा विवाह झाला अन् नलिनी ऊर्फ सुमित्रा राऊतांच्या आंदळकर झाल्या. ५१ वर्षांच्या संसारात अनेक वादळे आली, त्याचा सामना दोघांनीही मिळून केला. वस्तादांच्या अनेक अडचणींमध्ये त्या ढाल बनून राहिल्या.मंगळवार पेठेतील कोळेकर तिकटी परिसरात ते भाड्याने राहू लागले. तेथून नव्वदीच्या काळात न्यू पॅलेस परिसरात त्यांनी स्वमालकीचे घर बांधले. यथावकाश ५१ वर्षांच्या संसारातून ही ‘दो हंसो की जोडी’ फुटली आणि रविवारी सायंकाळी त्यातील एक हंस अर्थात हिंदकेसरी गणपतराव आंदळकर काळाच्या पडद्याआड गेले.