शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
2
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
3
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
4
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
5
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
6
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
7
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
8
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
9
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
10
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
11
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
12
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
13
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
14
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
15
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
16
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
17
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
18
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

‘दो हंसो का जोडा बिछड गया’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 00:36 IST

कोल्हापूर : हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचे जेवढे मल्लविद्येवर प्रेम होते, तितकेच प्रेम त्यांच्या पत्नी सुमित्रा अर्थात माई यांच्यावरही होते. या दोघांचे बंध ५१ वर्षांपूर्वीचे. मार्इंचे भाऊ किशोर हे हिंदकेसरींच्याकडे मोतीबाग तालीम येथे कुस्तीचे धडे गिरवण्यासाठी जात होते त्यातूनच मार्इंची व वस्तादांची ओळख झाली. ओळखीचे प्रेमात अन् सरतेशेवटी लग्नात रूपांतर झाले. ...

कोल्हापूर : हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचे जेवढे मल्लविद्येवर प्रेम होते, तितकेच प्रेम त्यांच्या पत्नी सुमित्रा अर्थात माई यांच्यावरही होते. या दोघांचे बंध ५१ वर्षांपूर्वीचे. मार्इंचे भाऊ किशोर हे हिंदकेसरींच्याकडे मोतीबाग तालीम येथे कुस्तीचे धडे गिरवण्यासाठी जात होते त्यातूनच मार्इंची व वस्तादांची ओळख झाली. ओळखीचे प्रेमात अन् सरतेशेवटी लग्नात रूपांतर झाले. ५१ वर्षांच्या संसारानंतर रविवारी रात्री ज्या हृदयात त्यांनी मार्इंना बसविले होते, तेच बंद पडल्याने मार्इंचा आधार निघून गेला.माई उच्चशिक्षित, तर हिंदकेसरी अक्षरशत्रू होते. सुरुवातीच्या काळात अनेक अडचणींना या दोघांना सामोरे जावे लागले. कोल्हापुरातील भेंडी गल्ली येथे मार्इंचे राहते घर होते. वडील मुंबई येथे रेल्वेत नोकरीस असल्याने त्याही तेथे खासगी कंपनीत नोकरी करीत होत्या. सुटी मिळेल त्याप्रमाणे त्या कोल्हापुरात येत असत. त्यात भाऊ किशोर हे हिंदकेसरी गणपतराव यांच्या मोतीबाग तालमीमध्ये कुस्तीचे धडे गिरवत होते. किशोरसोबत त्यांनी मार्इंना चार-पाचवेळा पाहिले.तेव्हापासून ते मार्इंच्या प्रेमात पडले. भाऊ किशोरही वस्तादांबद्दल खूप काही चांगले सांगत. कालांतराने ओळख वाढली आणि त्यांच्या प्रेमाची चर्चा मोतीबाग तालमीतही पोहोचली. एकेदिवशी किशोरकडूनच मार्इंना लग्नाबाबत मागणी घातली; मात्र त्यास नकार देत किशोर यांनाच त्यांनी फटकारले. त्यात मार्इंची अट होती मुंबईतीलच नवरा करणार. दरम्यानच्या काळात हिंदकेसरींचा कुस्तीतील डंका देशभरात गाजू लागल्याने मार्इंची ही अट मागे पडली आणि त्याचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांच्या घरच्यांचा त्यांच्या लग्नाला प्रथम विरोध होता.हिंदकेसरींनी त्यांची समजूत काढत दोन्ही कुटुंबांना राजी केले. त्यात मार्इंच्या नातेवाइकांनीही सखोल चौकशी करीत, अखेर लग्नाला होकार दिला. ३ जून १९६७ साली केशवराव भोसले नाट्यगृहात मोठ्या थाटामाटात त्यांचा विवाह झाला अन् नलिनी ऊर्फ सुमित्रा राऊतांच्या आंदळकर झाल्या. ५१ वर्षांच्या संसारात अनेक वादळे आली, त्याचा सामना दोघांनीही मिळून केला. वस्तादांच्या अनेक अडचणींमध्ये त्या ढाल बनून राहिल्या.मंगळवार पेठेतील कोळेकर तिकटी परिसरात ते भाड्याने राहू लागले. तेथून नव्वदीच्या काळात न्यू पॅलेस परिसरात त्यांनी स्वमालकीचे घर बांधले. यथावकाश ५१ वर्षांच्या संसारातून ही ‘दो हंसो की जोडी’ फुटली आणि रविवारी सायंकाळी त्यातील एक हंस अर्थात हिंदकेसरी गणपतराव आंदळकर काळाच्या पडद्याआड गेले.