शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

बांबरवाडीजवळ कोल्हापूरचे दोघे ठार

By admin | Updated: June 18, 2014 00:58 IST

भरधाव चारचाकी गाडी झाडावर आदळली

कोल्हापूर / पन्हाळा : पन्हाळा-कोल्हापूर मार्गावर बांबरवाडी (पिंपळे तर्फ सातवे) येथे चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव चारचाकी गाडी झाडावर आदळून दोन महाविद्यालयीन तरुण ठार झाले, तर दोघे गंभीर जखमी झाले. प्रसाद मुकुंद जाधव (वय २६, रा. कसबेकर पार्क, न्यू पॅलेसजवळ, कोल्हापूर) व अक्षय आप्पासाहेब पाटील (२२, रा. कसबा बावडा) हे ठार झाले. तर लखन बाळासाहेब गवळी (२७) व स्वप्निल धोंडिराम जाधव (२६, दोघेही रा. गवत मंडई, उत्तरेश्वर पेठ) हे गंभीर जखमी झाले. हा अपघात आज, मंगळवारी सायंकाळी सहा वाजता घडला.याबाबत माहिती अशी की, पन्हाळगडावर पर्यटनासाठी हे चौघै टोयोटा (एमएच 0९ डीए १३२३) गाडीतून गेले होते. पन्हाळ्याहून सायंकाळी कोल्हापूरकडे परत येताना पिंपळे तर्फ सातवे (बांबरवाडी) जवळ भरधाव गाडीवरील चालकाचा ताबा सुटून रस्त्याशेजारील झाडावर आदळली. यात प्रसाद मुकुंद जाधव व अक्षय आप्पासाहेब पाटील हे दोघे जागीच ठार झाले, तर लखन गवळी व स्वप्निल जाधव हे गंभीर जखमी झाले. त्यांना कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. यासाठी बांबरवाडी ग्रामस्थांनी मदत केली. घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अंकीत गोयल तसेच पन्हाळ्याचे पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी भेट दिली.