शहरं
Join us  
Trending Stories
1
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
2
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
3
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
4
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
5
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
6
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
7
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
8
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
9
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
10
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
11
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
12
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
13
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
14
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
15
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
16
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
17
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
18
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान
19
RCB समोर पंजाबी शेर ढेर! रडत खडत शंभरी गाठली; पण PBKS च्या नावे झाला हा लाजिरवाणा विक्रम
20
"पाकिस्तानच्या गोळीबारामुळे बाधित पूंछ आणि इतर भागांसाठी मदत पॅकेज...", राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र

हंगामापूर्वीच मिरचीने गाठला दोनशेचा टप्पा

By admin | Updated: February 8, 2016 00:59 IST

द्राक्षे, कलिंगडांच्या मागणीत वाढ : भाजीपाल्यात चढ-उतार ; डाळींचे दर मात्र स्थीर

कोल्हापूर : मिरचीचा हंगाम सुरू होण्यास अजून महिन्याभराचा कालावधी असतानाच मिरचीने दोनशे रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. यंदा मिरची सामान्य माणसाच्या जिभेला चांगलाच चटका देणार हे नक्की आहे. फळबाजारात द्राक्षे, कलिंगडांची आवक वाढली असली तरी उठावही त्या प्रमाणात होत आहे. भाजीपाला बाजारात मात्र चढ-उतार दिसत आहे. प्रत्येक वर्षी मार्चनंतर मिरचीचा हंगाम सुरू होता. मार्च ते मे या तीन महिन्यांत मिरचीपूड तयार करून ठेवली जाते; पण पावसाने सगळीकडेच झटका दिल्याने मिरचीचे उत्पादन कमी झाले आहे. परिणामी बाजारात मिरचीची आवक घटली आहे. कोल्हापुरात साधारणत: कर्नाटकातून मिरचीची मोठ्या प्रमाणात आवक होते. डिसेंबर व जानेवारी महिन्यांत १५० रुपये किलोपर्यंत असणाऱ्या मिरचीने फेबु्रवारीतच दोनशे रुपयांचा टप्पा गाठला आहे. मार्च, एप्रिलमध्ये तर चारशे रुपयांपर्यंत मिरचीचा दर जाईल, असे व्यापाऱ्यांचे मत आहे. साखरेवरील करात शंभर रुपयांची वाढ झाल्याने किरकोळ बाजारातील साखरेचा दर वाढला आहे. किरकोळ बाजारात सरासरी तो ३५ रुपये प्रतिकिलो राहिला आहे. हरभराडाळ प्रतिकिलो ६५, तूरडाळ १५०, तर सरकी तेल ७२ रुपयांवर स्थिर आहे. फळबाजारात सध्या कलिंगडे, द्राक्षांची रेलचेल आहे. काळ्या पाठीच्या ‘किरण’ व ‘मधू’चा दर घाऊक बाजारात ५० ते ४५० रुपये डझन असा राहिला आहे. हिरव्या पट्ट्याचा दर मात्र ५० ते ८५० रुपयांपर्यंत आहे. कोबी, वांगी, ढबू, ओला वाटाणा, भेंडी या भाज्यांच्या दरांत वाढ झाली असून टोमॅटो, गवार, वरण्याच्या दरांत काही प्रमाणात घसरण झाली आहे. यंदा ‘हापूस’ गोड लागणार यंदा आंबा पिकाला पोषक असेच हवामान राहिले आहे. थंडीमुळे आंब्यात चांगला रस तयार होतो, तर कडक उन्हामुळे त्याचा आकार मोठा होण्यास मदत होते. यंदा चांगले हवामान असल्याने फेब्रुवारी महिन्यातच आंब्याची आवक सुरू झाली आहे. गुळाच्या दरात घसरण गुळाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, प्रतिक्विंटलच्या दरात शंभर रुपयांची घसरण झालेली आहे; पण एक किलो बॉक्सच्या गुळाला मागणी असल्याने त्याचे दर मात्र स्थिर आहेत. डाळींचे दर पूर्ववत झाले नसले तरी स्थिर आहेत; पण मिरचीने फेबु्रवारी महिन्यातच दोनशे रुपयांचा टप्पा पार केल्याने आगामी तीन महिन्यांत मिरची ग्राहकांच्या आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता आहे. - संजय नाकील ( व्यापारी)