शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

मानधन दोनशे रुपये.... प्रतिष्ठेसाठी लाखोंची उधळपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पोर्ले तर्फ ठाणे : लाखो रुपयांची उधळपट्टी करून निवडणूक जिंकणाऱ्या ग्रामपंचायत सदस्याला मानधनापोटी दरमाह मिळतात अवघे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पोर्ले तर्फ ठाणे : लाखो रुपयांची उधळपट्टी करून निवडणूक जिंकणाऱ्या ग्रामपंचायत सदस्याला मानधनापोटी दरमाह मिळतात अवघे दोनशे रुपये, तरीसुध्दा सदस्य होण्यासाठी चढाओढ काही कमी नाही. केवळ प्रतिष्ठा आणि राजकीय ताकद आजमविण्यासाठी लढवल्या जाणाऱ्या निवडणुकीत विकास कामाचा मुद्दा प्रचारासाठीचे तोडसुख असते. त्यामुळे गावभागातील विकासाचे मुद्दे वर्षानुवर्ष तसेच कायम राहिले आहेत. निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणाचा ‘श्री गणेशा’ करणारा कार्यकर्ता स्वत:च्या प्रतिष्ठेसाठी किती मोजेल, याचा काही नेम नाही. ग्रामपंचायतीची निवडणूक प्रतिष्ठेसाठी की विकासकामांसाठी? असा प्रश्न ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून पुढे येत आहे.

ग्रामपंचायतीच्या निवडणुका गावात आणि गटाची ताकद दाखविणाऱ्या असतात. त्यामुळे गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या सर्व नेत्यांचे या निवडणुकीकडे बारकाईने लक्ष असते. अलीकडच्या निवडणुकीत बऱ्यापैकी पैसेवाल्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळते. वारेमाप खर्चामुळे निवडणूक म्हटले की, सामान्य कार्यकर्त्याला धडकी भरते. त्यामुळे गटाला उमेदवार मिळविताना गटनेत्यांचा कस लागतो. गावाभागात विभागलेल्या पाचशे हजारांच्या प्रभागात लाखोंची उधळपट्टी करावी लागते.

गावच्या विकासाचा कणा असणाऱ्या ग्रामपंचायतीवर आपली सत्ता असली की, गटनेत्यांचे राजकारणाबरोबर अर्थकरण साधते. त्यासाठी गटनेते आपली प्रतिष्ठा पणाला लावतात. ग्रामपंचायतीच्या सदस्याने दरमहा हजेरी लाव,ली तर दोनशे रुपये

मानधन मिळते. वरिष्ठ लोकप्रतिनिधींच्या मर्जीने निधी मिळाला, तर गावातील प्रभागाचा विकास, अन्यथा सारा गाव भकास. सरकारी योजनांचा कारभार गटनेत्यांच्या मर्जीतील सदस्याला मिळतात. यासाठी चढाओढ सुरूच असते. यातूनच सदस्यांमध्ये पाच वर्ष कुरबुरी, नाराजी वाढते. त्याचा फटका निवडणुकीत मोजावा लागतो. अनेक सदस्य मासिक सभेची उपस्थिती सोडाच, गावसभेत बोलताना दचकतात. सदस्य म्हणून निवडून आलेला कार्यकर्ता गावात ‘पुढारी’ म्हणून मिरविण्यापुरता उरतो. सत्तेत सहभागी नसणाऱ्या सदस्याची अवस्था म्हणजे ‘असून घोटाळा, नसून खोळंबा’ अशीच असते. म्हणून ती मिळविण्यासाठी वाट्टेल त्या स्तराला जाण्याची प्रवृत्ती अलीकडच्या निवडणुकीत बळावत आहे.

गावातील सत्ता जरूर मिळवा; परंतु ती मिळविण्यासाठी जेवढी ताकद लावता त्याच्या निम्मी ताकद जर आपल्या प्रभागातील प्रश्न, अडचणी सोडविण्यासाठी लावली, तर प्रभागाचा विकास होईलच शिवाय निवडणुकीत होणाऱ्या वारेमाप खर्चाला लगाम बसेल. दोनशे रुपयाच्या मानधनासाठी की स्वत:च्या प्रतिष्ठेसाठी लाखो रुपयांची उधळपट्टी करणाऱ्या उमेदवारांपुढे समाजसेवा करून निवडणूक लढविणारा सामान्य कार्यकर्ता आर्थिक कोंडमाऱ्यामुळे हताश होऊन प्रचार करीत आहे.