शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दोन कोटींची उलाढाल ठप्प

By admin | Updated: July 26, 2016 00:19 IST

मुद्रांक विक्रेत्यांचा बंद : तहसील कार्यालय, शनिवार पेठ परिसरात शुकशुकाट

कोल्हापूर : विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुद्रांक विक्रेते (स्टॅम्प व्हेंडर्स) व दस्तलेखनिकांनी महासंघाच्या नेतृत्वाखाली सोमवारी ‘लेखणी बंद’ आंदोलन केले. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे दोन कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. कमिशनमध्ये दहा टक्क्यांपर्यंत वाढ करावी, ३० हजार रुपयांपर्यंतच्या मुद्रांक विक्रीची परवानगी पूर्ववत करावी, या मागण्यांसाठी मुद्रांक, दस्तलेखनिक महासंघातर्फे सोमवारी ‘लेखणी बंद’ आंदोलन करण्यात आले. त्यात कोल्हापूर शहरासह इचलकरंजी, हातकणंगले, गडहिंग्लज, पन्हाळा, करवीर आदी तालुक्यांतील एकूण अडीचशे विक्रेते, लेखनिक सहभागी झाले. नेहमी गजबजलेल्या असणाऱ्या करवीर तहसील कार्यालय परिसर, शनिवार पेठ, भाऊसिंगजी रोड परिसरात या बंदमुळे शुकशुकाट पसरला होता. आठवड्याचा पहिला दिवस असल्याने सोमवारी मिळकतींच्या खरेदी-विक्री, करार आदी स्वरूपांतील व्यवहार पूर्ण करण्यासाठी बहुतांश नागरिकांनी तयारी केली होती; पण मुद्रांक विक्रेते, दस्तलेखनिकांच्या बंदमुळे त्यांना काहीच करता आले नाही. ज्या नागरिकांना बंदची माहिती नव्हती, त्यांचा मात्र, मुद्रांक न मिळाल्याने अडचण झाली. दरम्यान, महासंघातर्फे मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात आले.त्यात कोल्हापुरातील चंद्रकांत भोसले, नितीन बिदरे, राहुल पाटील, रमेश खुटाळे, शंकर यादव आदी विक्रेते सहभागी झाले. तीस हजार रुपयांपर्यंतची मुद्रांक विक्रीची परवानगी कमी करून ती एक हजारपर्यंत केल्याने मुद्रांक विक्रेते व दस्तलेखनिकांचा व्यवसाय मंदावला आहे शिवाय मुद्रांक विक्रीतील कमिशन कमी झाल्याने पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याने संबंधित व्यवसाय करणे जिकिरीचे बनले आहे. त्यामुळे आम्हा विक्रेते व दस्तलेखनिकांना उदरनिर्वाह योग्य पद्धतीने करता यावा, यासाठी कमिशन वाढवावे आणि तीस हजार रुपयांपर्यंतच्या मुद्रांक विक्रीला पूर्ववत परवानगी देणे आवश्यक आहे. त्यामुळे या मागणीसाठी आंदोलन केले असल्याचे, मुद्रांक विक्रेते सुनील देशमुख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)‘लेखणी बंद’ला शिरोळमधून प्रतिसादशिरोळ : विविध मागण्यांप्रश्नी पुकारलेल्या मुद्रांक विक्रेते व दस्तलेखनिक यांच्या लेखणी बंद आंदोलनाला शिरोळमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सोमवारी येथील तहसील कचेरी परिसरात शुकशुकाट होता. या बंदमुळे पक्षकारांची मोठी गैरसोय झाली. एक हजार आणि त्यावर मुद्रांक विक्रीचे अधिकार असूनदेखील गेल्या वर्षभरापासून नाकारलेली परवानगी ई-चलन अथवा ईसबीटीआरसाठी शंभर ते दोनशे रुपयांचा बसणारा आर्थिक भुर्दंड याप्रश्नी शिरोळ तालुका दस्तलेखनिक संघटनेच्या वतीने लेखणी बंद आंदोलन करण्यात आले. सोमवार आठवड्याचा पहिला दिवस असल्याने विविध शासकीय कामांसाठी तालुक्यातून आलेल्या पक्षकारांची गैरसोय झाली. महासंघाच्या निर्णयानुसार पुढील दिशाआमच्या मागण्या रास्त व योग्य आहे. त्यांच्या पूर्ततेसाठी महासंघाने शासनाशी वारंवार पत्र, निवेदनाद्वारे पाठपुरावा केला. मात्र, काहीच झाले नाही. त्यामुळे अखेर आमच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महासंघाच्या नेतृत्वाखाली राज्यभर हे आंदोलन करण्यात आले असल्याची माहिती करवीर तालुका स्टॅम्प व्हेंडर संघटनेचे अध्यक्ष नितीन शेळके यांनी दिली. ते म्हणाले, ‘लेखणी बंद’ आंदोलन जिल्ह्यातील सर्व मुद्रांक विक्रेते, दस्तलेखनिक सहभागी झाले. एकदिवसीय बंदमुळे सुमारे दोन कोटींची उलाढाल ठप्प झाली. महासंघाच्या निर्णयानुसार आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे.