शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

रंकाळा शुद्धिकरणासाठी दोन कोटींचा निधी

By admin | Updated: June 27, 2016 00:36 IST

तावडे यांची घोषणा : रंकाळा खणीची केली पाहणी; संशोधनाची घेतली माहिती

कोल्हापूर : रंकाळा तलावातील प्रदूषित पाणी स्वच्छ झाले पाहिजे, या भूमिकेतून मुंबईच्या रसायन तंत्रज्ञान संस्थेने हाती घेतलेल्या संशोधनास मदत म्हणून राज्य सरकार दोन कोटींचा निधी उपलब्ध करून देईल, अशी घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी येथे केली. मुंबई उपनगर परिसरातील तलाव शुद्धिकरणाची मोहीमही या संस्थेने हाती घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. रसायन तंत्रज्ञान संस्थेने सुरू केलेल्या रंकाळा तलाव प्रदूषणमुक्त प्रक्रिया तंत्रकार्याच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ मंत्री तावडे यांच्या हस्ते झाला. यावेळी तावडे यांनी संस्थेच्या संशोधनाची माहिती घेतली. तसेच रंकाळा तलावाजवळील खणीची त्यांनी पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. शोध अनेक लागतात; पण ते प्रयोगशाळेत राहतात किंवा शोधनिबंधातच राहतात. त्याला काहीच अर्थ राहात नाही. त्याचा समाजाला काही उपयोग होत नाही. परंतु, रंकाळा शुद्धिकरणाचा प्रयोग हा सर्वसामान्य जनतेसाठी केला जात असून, तो प्रत्यक्षात यशस्वी झाला आहे. ज्यावेळी प्रयोग यशस्वी होतात, तेव्हा लोकसहभाग वाढतो. म्हणूनच रंकाळा तलाव शुद्धिकरणाच्या पुढील प्रयोगास राज्य सरकार नगरविकास, शिक्षण विभाग किंवा जिल्हा नियोजन मंडळातून दोन कोटी रुपयांचा निधी देईल. याबाबत मी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याबरोबर लवकरच बोलणार आहे, असे मंत्री तावडे म्हणाले. संस्थेने शाहूंच्या काळात होते तसे रूप रंकाळा तलावास मिळवून द्यावे. सरकार म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे सांगत तलाव स्वच्छ होईल. परंतु, आता यापुढे तलावात मिसळणारे सांडपाणी थांबविण्याची जबाबदारी महानगरपालिकेने स्वीकारावी, असेही तावडे म्हणाले.यावेळी विजय कुंभार, प्रभाकर तांबट यांनी तलावातील पाण्यावर सुरू असलेल्या संशोधनाबद्दल समाधान व्यक्त केले. अमर जाधव यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर, के. एस. चौगुले, महेश जाधव, नेताजी पवार, प्रसाद मंत्री, आर्किटेक्ट असो.चे राजेंद्र सावंत, मदन चव्हाण, सुहास इंगवले, पांडुरंग इंगवले, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)संस्थेचे कुलगुरू डॉ. जी. डी. यादव यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती सांगितली. रंकाळा तलाव, पंचगंगा नदी शुद्धिकरण करण्यास केंद्र सरकारकडून निधी मिळेल. परंतु, निधीपेक्षा इच्छाशक्ती पाहिजे. आम्ही रंकाळा तलाव शुद्धिकरणाची भूमिका याच इच्छाशक्तीच्या जोरावर घेतली आणि त्यास निधीही मिळाला, असे सांगत आमच्या या संशोधनास महानगरपालिकेने सहकार्य करावे, असे आवाहन यादव यांनी केले.