शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
2
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
3
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
4
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
5
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
6
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
7
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
8
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
10
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
11
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
12
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
13
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
14
 ...मग पोलिसांची हत्या करावी लागली तरी हरकत नाही, समोर आला तौकीर रजाचा भयानक डाव
15
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
16
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
17
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
18
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
19
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
20
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?

राजापूर बंधारा दुरुस्तीसाठी दोन कोटींचा निधी उपलब्ध

By admin | Updated: March 11, 2016 00:10 IST

गळती थांबणार : नवीन लोखंडी बरगे बसणार, स्थानिक जनतेला दिलासा

संदीप बावचे -- शिरोळ तालुक्याला वरदायिनी ठरलेल्या राजापूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी पाच लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे़ या निधीतून पहिल्या टप्प्यात पाणी गळतीचे काम रोखले जाणार असून, आणखी चार कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे़ किमान बंधारा वाचविण्यासाठी निधी उपलब्ध झाल्यामुळे तालुक्यातील जनतेतून स्वागत होत आहे़ राजापूर बंधारा हा कृष्णा नदीवरील व शिरोळ तालुक्यातील शेवटचा बंधारा आहे़ या बंधाऱ्यातून शेती व पिण्याच्या पाण्यासह इचलकरंजी शहराला पाण्याचा पुरवठा केला जातो़ बंधाऱ्याला एकूण ६५ दरवाजे असून, पाटबंधारे विभागाने लोखंडी व लाकडी बरगे घातलेले आहेत़ मात्र, हे बरगे कमकुवत असल्यामुळे, शिवाय बंधाऱ्याची दुरवस्था झाल्यामुळे सर्वच दरवाजांतून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे़ बंधाऱ्याच्या प्रश्नाबाबत आमदार उल्हास पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात विधानसभा सभापतींना निवेदन दिले होते़ दुष्काळसदृश परिस्थिती असताना या बंधाऱ्यातील गळतीतून लाखो लिटर पाणी वाया जात आहे़ याप्रश्नी लक्ष वेधले होते़ दरम्यान, जलसंपदा विभागाकडून केंद्र शासनाच्या १३ व्या वित्त आयोगाअंतर्गत बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी पाच लाख रुपये निधीची तरतूद केली आहे़ या निधीतून लवकरच डागडुजी केली जाणार असून, गळतीही थांबविली जाणार आहे़ चालू वर्षी दोन कोटी पाच लाख रुपयांच्या निधीतून सिमेंट क्राँक्रिटचे जॅकेटिंग करून लोखंडी बरगे घातले जाणार आहेत़लवकरच कामास सुरुवातबंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी पाच लाखांचा निधी उपलब्ध झाला असून, बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम लवकरच सुरू होणार आहे़ बंधारा कमकुवत बनल्यामुळे आणखी निधीची गरज असून, पुढील वर्षी तो निधी शासनाकडून मिळणे अपेक्षित आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे अधिकारी शिरीष पाटील यांनी दिली़यंदा तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतीबरोबर पिण्याचा पाण्याचा प्रश्न बिकट बनलेला आहे़ यामुळे राजापूर बंधाऱ्यातील गळतीबाबत शासनाचे लक्ष वेधून बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी निधीची मागणी केली होती़ त्यानुसार निधीची तरतूद झाली आहे़ उर्वरित आणखी निधीसाठी पाठपुरावा करणार आहे़- उल्हास पाटील, आमदार.५‘गळतीचा फायदा कर्नाटकला, राजापूर बंधाऱ्यातून लाखो लिटर पाणी वाया’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. गळती बंद करून शिरोळ तालुक्यातील कृष्णाकाठच्या शेतकऱ्यांचा यावर्षी तरी पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ नये यासाठी योग्य नियोजनाची आवश्यकता असल्याचे वृत्त प्रसिद्ध करून लोकप्रतिनिधींसह पाटबंधारे विभागाचे लक्ष वेधले होते़