शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

राजापूर बंधारा दुरुस्तीसाठी दोन कोटींचा निधी उपलब्ध

By admin | Updated: March 11, 2016 00:10 IST

गळती थांबणार : नवीन लोखंडी बरगे बसणार, स्थानिक जनतेला दिलासा

संदीप बावचे -- शिरोळ तालुक्याला वरदायिनी ठरलेल्या राजापूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी पाच लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे़ या निधीतून पहिल्या टप्प्यात पाणी गळतीचे काम रोखले जाणार असून, आणखी चार कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे़ किमान बंधारा वाचविण्यासाठी निधी उपलब्ध झाल्यामुळे तालुक्यातील जनतेतून स्वागत होत आहे़ राजापूर बंधारा हा कृष्णा नदीवरील व शिरोळ तालुक्यातील शेवटचा बंधारा आहे़ या बंधाऱ्यातून शेती व पिण्याच्या पाण्यासह इचलकरंजी शहराला पाण्याचा पुरवठा केला जातो़ बंधाऱ्याला एकूण ६५ दरवाजे असून, पाटबंधारे विभागाने लोखंडी व लाकडी बरगे घातलेले आहेत़ मात्र, हे बरगे कमकुवत असल्यामुळे, शिवाय बंधाऱ्याची दुरवस्था झाल्यामुळे सर्वच दरवाजांतून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे़ बंधाऱ्याच्या प्रश्नाबाबत आमदार उल्हास पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात विधानसभा सभापतींना निवेदन दिले होते़ दुष्काळसदृश परिस्थिती असताना या बंधाऱ्यातील गळतीतून लाखो लिटर पाणी वाया जात आहे़ याप्रश्नी लक्ष वेधले होते़ दरम्यान, जलसंपदा विभागाकडून केंद्र शासनाच्या १३ व्या वित्त आयोगाअंतर्गत बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी पाच लाख रुपये निधीची तरतूद केली आहे़ या निधीतून लवकरच डागडुजी केली जाणार असून, गळतीही थांबविली जाणार आहे़ चालू वर्षी दोन कोटी पाच लाख रुपयांच्या निधीतून सिमेंट क्राँक्रिटचे जॅकेटिंग करून लोखंडी बरगे घातले जाणार आहेत़लवकरच कामास सुरुवातबंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी पाच लाखांचा निधी उपलब्ध झाला असून, बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम लवकरच सुरू होणार आहे़ बंधारा कमकुवत बनल्यामुळे आणखी निधीची गरज असून, पुढील वर्षी तो निधी शासनाकडून मिळणे अपेक्षित आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे अधिकारी शिरीष पाटील यांनी दिली़यंदा तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतीबरोबर पिण्याचा पाण्याचा प्रश्न बिकट बनलेला आहे़ यामुळे राजापूर बंधाऱ्यातील गळतीबाबत शासनाचे लक्ष वेधून बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी निधीची मागणी केली होती़ त्यानुसार निधीची तरतूद झाली आहे़ उर्वरित आणखी निधीसाठी पाठपुरावा करणार आहे़- उल्हास पाटील, आमदार.५‘गळतीचा फायदा कर्नाटकला, राजापूर बंधाऱ्यातून लाखो लिटर पाणी वाया’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. गळती बंद करून शिरोळ तालुक्यातील कृष्णाकाठच्या शेतकऱ्यांचा यावर्षी तरी पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ नये यासाठी योग्य नियोजनाची आवश्यकता असल्याचे वृत्त प्रसिद्ध करून लोकप्रतिनिधींसह पाटबंधारे विभागाचे लक्ष वेधले होते़