शहरं
Join us  
Trending Stories
1
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
2
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
3
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
4
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
5
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
6
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
7
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
8
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
9
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
10
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
11
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
12
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
13
केवळ आयएसआयच दहशतवादी हल्ले रोखू शकतो; बिलावल भुट्टोंनी युएनमध्येच भारताचे आरोप केले मान्य 
14
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
15
जातीय जनगणना कधी सुरू होणार? केंद्र सरकारने जाहीर केली तारीख, जाणून घ्या...
16
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
17
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
18
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष
19
Astrology: निर्जला एकादशीला या वर्षातला सर्वात मोठा राजयोग, पाच राशींना घसघशीत लाभ!
20
विराटसह टीम बसमधून प्रवास करताना अनुष्कानं शूट केला खास सीन; इथं पाहा व्हायरल व्हिडिओ

राजापूर बंधारा दुरुस्तीसाठी दोन कोटींचा निधी उपलब्ध

By admin | Updated: March 11, 2016 00:10 IST

गळती थांबणार : नवीन लोखंडी बरगे बसणार, स्थानिक जनतेला दिलासा

संदीप बावचे -- शिरोळ तालुक्याला वरदायिनी ठरलेल्या राजापूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी पाच लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे़ या निधीतून पहिल्या टप्प्यात पाणी गळतीचे काम रोखले जाणार असून, आणखी चार कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे़ किमान बंधारा वाचविण्यासाठी निधी उपलब्ध झाल्यामुळे तालुक्यातील जनतेतून स्वागत होत आहे़ राजापूर बंधारा हा कृष्णा नदीवरील व शिरोळ तालुक्यातील शेवटचा बंधारा आहे़ या बंधाऱ्यातून शेती व पिण्याच्या पाण्यासह इचलकरंजी शहराला पाण्याचा पुरवठा केला जातो़ बंधाऱ्याला एकूण ६५ दरवाजे असून, पाटबंधारे विभागाने लोखंडी व लाकडी बरगे घातलेले आहेत़ मात्र, हे बरगे कमकुवत असल्यामुळे, शिवाय बंधाऱ्याची दुरवस्था झाल्यामुळे सर्वच दरवाजांतून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे़ बंधाऱ्याच्या प्रश्नाबाबत आमदार उल्हास पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात विधानसभा सभापतींना निवेदन दिले होते़ दुष्काळसदृश परिस्थिती असताना या बंधाऱ्यातील गळतीतून लाखो लिटर पाणी वाया जात आहे़ याप्रश्नी लक्ष वेधले होते़ दरम्यान, जलसंपदा विभागाकडून केंद्र शासनाच्या १३ व्या वित्त आयोगाअंतर्गत बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी पाच लाख रुपये निधीची तरतूद केली आहे़ या निधीतून लवकरच डागडुजी केली जाणार असून, गळतीही थांबविली जाणार आहे़ चालू वर्षी दोन कोटी पाच लाख रुपयांच्या निधीतून सिमेंट क्राँक्रिटचे जॅकेटिंग करून लोखंडी बरगे घातले जाणार आहेत़लवकरच कामास सुरुवातबंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी पाच लाखांचा निधी उपलब्ध झाला असून, बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम लवकरच सुरू होणार आहे़ बंधारा कमकुवत बनल्यामुळे आणखी निधीची गरज असून, पुढील वर्षी तो निधी शासनाकडून मिळणे अपेक्षित आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे अधिकारी शिरीष पाटील यांनी दिली़यंदा तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतीबरोबर पिण्याचा पाण्याचा प्रश्न बिकट बनलेला आहे़ यामुळे राजापूर बंधाऱ्यातील गळतीबाबत शासनाचे लक्ष वेधून बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी निधीची मागणी केली होती़ त्यानुसार निधीची तरतूद झाली आहे़ उर्वरित आणखी निधीसाठी पाठपुरावा करणार आहे़- उल्हास पाटील, आमदार.५‘गळतीचा फायदा कर्नाटकला, राजापूर बंधाऱ्यातून लाखो लिटर पाणी वाया’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. गळती बंद करून शिरोळ तालुक्यातील कृष्णाकाठच्या शेतकऱ्यांचा यावर्षी तरी पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ नये यासाठी योग्य नियोजनाची आवश्यकता असल्याचे वृत्त प्रसिद्ध करून लोकप्रतिनिधींसह पाटबंधारे विभागाचे लक्ष वेधले होते़