शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
5
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
6
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
7
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
8
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
9
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
10
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
11
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
12
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
13
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
14
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
15
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
16
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
17
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
18
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
19
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
20
पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना

सोळापेक्षा जास्त उमेदवार असल्यास दोन मतपत्रिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 01:04 IST

प्रवीण देसाई । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी एका मतदारसंघात सोळापेक्षा जादा उमेदवार रिंगणात राहिल्यास मतदान केंद्रामध्ये ...

प्रवीण देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी एका मतदारसंघात सोळापेक्षा जादा उमेदवार रिंगणात राहिल्यास मतदान केंद्रामध्ये दोन मतपत्रिका ठेवाव्या लागणारआहेत. ‘कोल्हापूर’मधून २२ व ‘हातकणंगले’मधून २० उमेदवारांचे अर्ज आहेत. यातील किती उमेदवार माघार घेतात याकडे निवडणूक विभागाच्याही नजरा लागून राहिल्या आहेत; कारण माघारीनंतरही सोळापेक्षा जास्त उमेदवार रिंगणात राहिल्यास दोन मतपत्रिका कराव्या लागणार आहेत. त्यानुसार निवडणूक विभागाने तयारी सुरू केली आहे.कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघांतून मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत. माघारीनंतर सोळापेक्षा जादा अर्ज राहिल्यास निवडणूक विभागाला (ईव्हीएम) दोन मतपत्रिका कराव्या लागणार आहेत. हे चित्र आज, सोमवारी माघारीनंतर स्पष्ट होणार आहे, असे असले तरी निवडणूक विभागाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. माघारीनंतर १६ पेक्षा कमी उमेदवार रिंगणात राहिले, तर एक (ईव्हीएम) मतपत्रिका तयार करावी लागणार आहे. तसे न होता जादा उमेदवार रिंगणात राहिल्यास मतदान केंद्रामध्ये दोन ‘ईव्हीएम’ची बॅलेट युनिट बसवावी लागणार आहेत.कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात २१३२ व हातकणंगले मतदारसंघात १८०७ असे मिळून ३९३९ मतदान केंद्रे आहेत. प्रत्येक केंद्रावर एक मशीन या प्रमाणे ३९३९ ‘ईव्हीएम’ उपलब्ध असून, राखीव कोट्यात जवळपास तीन हजार मशीन ठेवण्यात आल्या आहेत. तरीही सोळापेक्षा जास्त उमेदवार रिंगणात राहिल्यास आणखी काही ‘ईव्हीएम’ची आवश्यकता भासणार आहे; त्यामुळे या मशीन भारत निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन घेऊन इतर जिल्ह्यातील घेण्याची तयारी निवडणूक विभागाने ठेवली आहे. माघारीनंतर सोळापेक्षा कमी उमेदवार रिंगणात राहिल्यास एकाच मतपत्रिकेवर (ईव्हीएम)काम भागणार आहे. किती उमेदवार रिंगणात राहतात यावरच पुढील दिशा ठरविली जाणार असल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले.मतपत्रिकेवर पंधराअधिक एक ‘नोटा’निवडणुकीसाठी एका मतपत्रिकेवर (ईव्हीएम) १५ उमेदवार अधिक एक ‘नोटा’ अशी रचना आहे. जर १६ उमेदवारांपेक्षा अधिक उमेदवार रिंगणात राहिल्यास दुसरी मतपत्रिका तयार करावी लागणार आहे.