शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सोळापेक्षा जास्त उमेदवार असल्यास दोन मतपत्रिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 01:04 IST

प्रवीण देसाई । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी एका मतदारसंघात सोळापेक्षा जादा उमेदवार रिंगणात राहिल्यास मतदान केंद्रामध्ये ...

प्रवीण देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी एका मतदारसंघात सोळापेक्षा जादा उमेदवार रिंगणात राहिल्यास मतदान केंद्रामध्ये दोन मतपत्रिका ठेवाव्या लागणारआहेत. ‘कोल्हापूर’मधून २२ व ‘हातकणंगले’मधून २० उमेदवारांचे अर्ज आहेत. यातील किती उमेदवार माघार घेतात याकडे निवडणूक विभागाच्याही नजरा लागून राहिल्या आहेत; कारण माघारीनंतरही सोळापेक्षा जास्त उमेदवार रिंगणात राहिल्यास दोन मतपत्रिका कराव्या लागणार आहेत. त्यानुसार निवडणूक विभागाने तयारी सुरू केली आहे.कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघांतून मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत. माघारीनंतर सोळापेक्षा जादा अर्ज राहिल्यास निवडणूक विभागाला (ईव्हीएम) दोन मतपत्रिका कराव्या लागणार आहेत. हे चित्र आज, सोमवारी माघारीनंतर स्पष्ट होणार आहे, असे असले तरी निवडणूक विभागाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. माघारीनंतर १६ पेक्षा कमी उमेदवार रिंगणात राहिले, तर एक (ईव्हीएम) मतपत्रिका तयार करावी लागणार आहे. तसे न होता जादा उमेदवार रिंगणात राहिल्यास मतदान केंद्रामध्ये दोन ‘ईव्हीएम’ची बॅलेट युनिट बसवावी लागणार आहेत.कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात २१३२ व हातकणंगले मतदारसंघात १८०७ असे मिळून ३९३९ मतदान केंद्रे आहेत. प्रत्येक केंद्रावर एक मशीन या प्रमाणे ३९३९ ‘ईव्हीएम’ उपलब्ध असून, राखीव कोट्यात जवळपास तीन हजार मशीन ठेवण्यात आल्या आहेत. तरीही सोळापेक्षा जास्त उमेदवार रिंगणात राहिल्यास आणखी काही ‘ईव्हीएम’ची आवश्यकता भासणार आहे; त्यामुळे या मशीन भारत निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन घेऊन इतर जिल्ह्यातील घेण्याची तयारी निवडणूक विभागाने ठेवली आहे. माघारीनंतर सोळापेक्षा कमी उमेदवार रिंगणात राहिल्यास एकाच मतपत्रिकेवर (ईव्हीएम)काम भागणार आहे. किती उमेदवार रिंगणात राहतात यावरच पुढील दिशा ठरविली जाणार असल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले.मतपत्रिकेवर पंधराअधिक एक ‘नोटा’निवडणुकीसाठी एका मतपत्रिकेवर (ईव्हीएम) १५ उमेदवार अधिक एक ‘नोटा’ अशी रचना आहे. जर १६ उमेदवारांपेक्षा अधिक उमेदवार रिंगणात राहिल्यास दुसरी मतपत्रिका तयार करावी लागणार आहे.