शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
5
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
6
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
7
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
8
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
9
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
10
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
11
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
12
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
14
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
15
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
16
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
17
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
18
ऐरोली, घणसोलीत होणार खारफुटी उद्याने; वनविभागाकडून वास्तुविशारदांची नियुक्ती
19
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
20
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे

सोळापेक्षा जास्त उमेदवार असल्यास दोन मतपत्रिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 01:04 IST

प्रवीण देसाई । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी एका मतदारसंघात सोळापेक्षा जादा उमेदवार रिंगणात राहिल्यास मतदान केंद्रामध्ये ...

प्रवीण देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी एका मतदारसंघात सोळापेक्षा जादा उमेदवार रिंगणात राहिल्यास मतदान केंद्रामध्ये दोन मतपत्रिका ठेवाव्या लागणारआहेत. ‘कोल्हापूर’मधून २२ व ‘हातकणंगले’मधून २० उमेदवारांचे अर्ज आहेत. यातील किती उमेदवार माघार घेतात याकडे निवडणूक विभागाच्याही नजरा लागून राहिल्या आहेत; कारण माघारीनंतरही सोळापेक्षा जास्त उमेदवार रिंगणात राहिल्यास दोन मतपत्रिका कराव्या लागणार आहेत. त्यानुसार निवडणूक विभागाने तयारी सुरू केली आहे.कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघांतून मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत. माघारीनंतर सोळापेक्षा जादा अर्ज राहिल्यास निवडणूक विभागाला (ईव्हीएम) दोन मतपत्रिका कराव्या लागणार आहेत. हे चित्र आज, सोमवारी माघारीनंतर स्पष्ट होणार आहे, असे असले तरी निवडणूक विभागाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. माघारीनंतर १६ पेक्षा कमी उमेदवार रिंगणात राहिले, तर एक (ईव्हीएम) मतपत्रिका तयार करावी लागणार आहे. तसे न होता जादा उमेदवार रिंगणात राहिल्यास मतदान केंद्रामध्ये दोन ‘ईव्हीएम’ची बॅलेट युनिट बसवावी लागणार आहेत.कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात २१३२ व हातकणंगले मतदारसंघात १८०७ असे मिळून ३९३९ मतदान केंद्रे आहेत. प्रत्येक केंद्रावर एक मशीन या प्रमाणे ३९३९ ‘ईव्हीएम’ उपलब्ध असून, राखीव कोट्यात जवळपास तीन हजार मशीन ठेवण्यात आल्या आहेत. तरीही सोळापेक्षा जास्त उमेदवार रिंगणात राहिल्यास आणखी काही ‘ईव्हीएम’ची आवश्यकता भासणार आहे; त्यामुळे या मशीन भारत निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन घेऊन इतर जिल्ह्यातील घेण्याची तयारी निवडणूक विभागाने ठेवली आहे. माघारीनंतर सोळापेक्षा कमी उमेदवार रिंगणात राहिल्यास एकाच मतपत्रिकेवर (ईव्हीएम)काम भागणार आहे. किती उमेदवार रिंगणात राहतात यावरच पुढील दिशा ठरविली जाणार असल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले.मतपत्रिकेवर पंधराअधिक एक ‘नोटा’निवडणुकीसाठी एका मतपत्रिकेवर (ईव्हीएम) १५ उमेदवार अधिक एक ‘नोटा’ अशी रचना आहे. जर १६ उमेदवारांपेक्षा अधिक उमेदवार रिंगणात राहिल्यास दुसरी मतपत्रिका तयार करावी लागणार आहे.