शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

वसंत मुळीक यांचा तेवीस वर्षे लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 00:38 IST

कोल्हापूर : ज्या काळात मराठा समाजाच्या प्रश्नांबद्दल फारशी जागृती नव्हती तेव्हापासून या समाजासाठी निष्ठेने झगडणाऱ्या वसंत मुळीक यांचा आरक्षणाचा ...

कोल्हापूर : ज्या काळात मराठा समाजाच्या प्रश्नांबद्दल फारशी जागृती नव्हती तेव्हापासून या समाजासाठी निष्ठेने झगडणाऱ्या वसंत मुळीक यांचा आरक्षणाचा निर्णय झाल्यावर आनंदाने ऊर भरून आला. गेली २३ वर्षे ते मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी आंदोलनाच्या माध्यमातून सक्रिय आहेत.कॉलेज जीवन संपल्यावर एकदा आण्णासाहेब पाटील यांच्या मराठा लाख मेळाव्यास उपस्थित राहण्याची संधी त्यांना मिळाली. त्यातून भारावून जाऊन त्यांनी मराठा समाजासाठी काम करण्याचे ठरविले. पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून त्यांनी एमएसईबीमध्ये नोकरी केली; परंतु हे करतच अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जिल्ह्यात २५० गावांत शाखा सुरू केल्या. वधूवर मेळावे, गरीब मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप यांतून सुरू झालेले काम मराठा आरक्षणाच्या चळवळीपर्यंत आले. या कामात त्यांना वसंतराव घाटगे, चंद्रकांत चव्हाण, प्रकाश पाटील, कसबा बावडा येथील बी. जी. पाटील, शंकरराव शेळके यांचे सहकार्य लाभले.कोल्हापूर जिल्ह्यात अलीकडील काही वर्षांत मराठा महासंघ म्हटले की, वसंत मुळीक हा त्याला समानार्थी शब्द झाला होता. इतके ते या कामाशी एकरूप झाले होते. मुळात स्वभाव मनमिळावू व सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती यामुळे ते मराठा आरक्षणाच्या चळवळीतही सेतू म्हणून काम करू शकले. या कामात त्यांना तरुण इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचा मोठा आधार राहिला. मराठा समाज समुद्रासारखा आहे. त्याचे संघटन करणे खूप अवघड होते. आम्ही मेळावा घेतला तर एकेकाळी ५ माणसेही जमत नव्हती; परंतु तेच आरक्षणाच्या मोर्चावेळी मात्र लाखोंने लोक रस्त्यावर आले. आरक्षणाबरोबरच या समाजातील चुकीच्या चालीरीती याबाबत प्रबोधन करणार असल्याचे ते म्हणाले.