शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

एकरकमी एफआरपीसाठी तीन दिवसात सव्वादोन लाख मिस कॉल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:28 IST

कोल्हापूर: एफआरपीचे तुकडे पाडण्याच्या केंद्र सरकारच्या शिफारशीविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या मिस कॉल मोहिमेला शेतकऱ्यांकडून चांगला ...

कोल्हापूर: एफआरपीचे तुकडे पाडण्याच्या केंद्र सरकारच्या शिफारशीविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या मिस कॉल मोहिमेला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मोहीम सुरू झाल्याच्या तीन दिवसांअखेर सव्वादोन लाख शेतकऱ्यांनी मिस कॉल देऊन एकरकमी एफआरपीचा नारा बुलंद केला आहे.

तीन टप्प्यात एफआरपी देण्याची शिफारस नीती आयोगामार्फत केंद्र सरकारने केली आहे. याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लढ्याचे रणशिंग फुंकले आहे. सर्वोच्च न्यायालयात एकरकमी एफआरपीसाठीची ठाम बाजू मांडण्यासाठी शेतकऱ्यांच्या मागणीचे पुरावे लागणार असल्याने स्वाभिमानीने मिस कॉल मोहीम सुरू केली आहे. सोमवारी दुपारी सुरू झालेली ही मोहीम या महिनाअखेरपर्यंत चालणार आहे. ८४४८१८३७५१ या क्रमांकावर या तीन दिवसात २ लाख २५ हजार जणांनी मिस कॉल देऊन एकरकमीच्या लढ्यात सहभागी असल्याची अनुमतीच दिली आहे.

दरम्यान तीन टप्प्यातील एफआरपीच्या शिफारशीविरोधात शेतकऱ्यांमधून सोशल मीडियावरदेखील संताप व्यक्त केला जात आहे. खते, दुकानातून आणलेले सामान, पेट्रोल, डिझेलची किंमत जर एकाच टप्प्यात दिली जात आहे, तर एफआरपी का तीन टप्प्यात असा सवाल करत शेतकऱ्यांनी लुटीच्या विरोधात आवाज उठवण्याचा निर्धारही केला जात आहे.