शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील सव्वा लाख शेतकऱ्यांना बारा तास वीज

By admin | Updated: September 8, 2016 00:30 IST

आजपासून अंमलबजावणी : महावितरणला आदेश

कोल्हापूर : पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी राज्य सरकारने शेतीला बारा तास वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी आज, गुरुवारपासून होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील १ लाख २८ हजार ९३३ कृषिपंपधारकांना त्याचा फायदा होणार आहे.जुलैमध्ये चांगला पाऊस झाला. मात्र, आॅगस्टअखेरपासून पावसाने दडी मारली आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेल्या पिकांना सध्या पाण्याची आवश्यकता आहे. ते लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषिपंपाला बारा तास वीजपुरवठा करण्यासाठी ‘महावितरण’ला वीजपुरवठ्याचे वेळापत्रक बदलण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ‘महावितरण’ने कार्यवाही करीत बारा तास वीजपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. महावितरणकडून सध्या कोल्हापुरात आठवड्यातील तीन दिवस आठ तास वीजपुरवठा हा सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत केला जात होता. तसेच चार दिवस रात्री दहा तास वीजपुरवठा रात्री आठ ते सकाळी आठ या वेळेत करण्यात येत होता. यात क्रमवारीची पद्धत वापरली जात होती. मात्र, सरकारच्या नव्या निर्णयानुसार आता बारा तास वीजपुरवठा केला जाणार आहे. यात रात्री दहा ते सकाळी दहा आणि सकाळी दहा ते रात्री दहा अशा दोन टप्प्यांमध्ये फिडरनिहाय वीजपुरवठा करण्यात येणार आहे. याबाबतची सूचना ‘महावितरण’च्या वरिष्ठ कार्यालयाकडून बुधवारी सायंकाळी कोल्हापूर परिमंडळाला प्राप्त झाली. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांना फायदाबारा तास वीजपुरवठा करण्याच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे ‘महावितरण’च्या कोल्हापूर मंडळाचे कार्यकारी अभियंता (प्रशासन) एस. बी. मारुलकर यांनी सांगितले. चांगला निर्णय जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे सेक्रेटरी मारुती पाटील म्हणाले, सध्या कृषिपंपांना आठ तास मिळणाऱ्या वीजपुरवठ्यामध्ये पाण्याचे फेरे पूर्ण होत नव्हते. कृषिपंपांना किमान दहा तास वीजपुरवठा व्हावा, अशी आम्ही वारंवार मागणी करीत होतो.