शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

जिल्ह्यातील सव्वा लाख शेतकऱ्यांना बारा तास वीज

By admin | Updated: September 8, 2016 00:30 IST

आजपासून अंमलबजावणी : महावितरणला आदेश

कोल्हापूर : पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी राज्य सरकारने शेतीला बारा तास वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी आज, गुरुवारपासून होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील १ लाख २८ हजार ९३३ कृषिपंपधारकांना त्याचा फायदा होणार आहे.जुलैमध्ये चांगला पाऊस झाला. मात्र, आॅगस्टअखेरपासून पावसाने दडी मारली आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेल्या पिकांना सध्या पाण्याची आवश्यकता आहे. ते लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषिपंपाला बारा तास वीजपुरवठा करण्यासाठी ‘महावितरण’ला वीजपुरवठ्याचे वेळापत्रक बदलण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ‘महावितरण’ने कार्यवाही करीत बारा तास वीजपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. महावितरणकडून सध्या कोल्हापुरात आठवड्यातील तीन दिवस आठ तास वीजपुरवठा हा सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत केला जात होता. तसेच चार दिवस रात्री दहा तास वीजपुरवठा रात्री आठ ते सकाळी आठ या वेळेत करण्यात येत होता. यात क्रमवारीची पद्धत वापरली जात होती. मात्र, सरकारच्या नव्या निर्णयानुसार आता बारा तास वीजपुरवठा केला जाणार आहे. यात रात्री दहा ते सकाळी दहा आणि सकाळी दहा ते रात्री दहा अशा दोन टप्प्यांमध्ये फिडरनिहाय वीजपुरवठा करण्यात येणार आहे. याबाबतची सूचना ‘महावितरण’च्या वरिष्ठ कार्यालयाकडून बुधवारी सायंकाळी कोल्हापूर परिमंडळाला प्राप्त झाली. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांना फायदाबारा तास वीजपुरवठा करण्याच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे ‘महावितरण’च्या कोल्हापूर मंडळाचे कार्यकारी अभियंता (प्रशासन) एस. बी. मारुलकर यांनी सांगितले. चांगला निर्णय जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे सेक्रेटरी मारुती पाटील म्हणाले, सध्या कृषिपंपांना आठ तास मिळणाऱ्या वीजपुरवठ्यामध्ये पाण्याचे फेरे पूर्ण होत नव्हते. कृषिपंपांना किमान दहा तास वीजपुरवठा व्हावा, अशी आम्ही वारंवार मागणी करीत होतो.