शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

जिल्ह्यातील सव्वा लाख शेतकऱ्यांना बारा तास वीज

By admin | Updated: September 8, 2016 00:30 IST

आजपासून अंमलबजावणी : महावितरणला आदेश

कोल्हापूर : पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी राज्य सरकारने शेतीला बारा तास वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी आज, गुरुवारपासून होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील १ लाख २८ हजार ९३३ कृषिपंपधारकांना त्याचा फायदा होणार आहे.जुलैमध्ये चांगला पाऊस झाला. मात्र, आॅगस्टअखेरपासून पावसाने दडी मारली आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेल्या पिकांना सध्या पाण्याची आवश्यकता आहे. ते लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषिपंपाला बारा तास वीजपुरवठा करण्यासाठी ‘महावितरण’ला वीजपुरवठ्याचे वेळापत्रक बदलण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ‘महावितरण’ने कार्यवाही करीत बारा तास वीजपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. महावितरणकडून सध्या कोल्हापुरात आठवड्यातील तीन दिवस आठ तास वीजपुरवठा हा सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत केला जात होता. तसेच चार दिवस रात्री दहा तास वीजपुरवठा रात्री आठ ते सकाळी आठ या वेळेत करण्यात येत होता. यात क्रमवारीची पद्धत वापरली जात होती. मात्र, सरकारच्या नव्या निर्णयानुसार आता बारा तास वीजपुरवठा केला जाणार आहे. यात रात्री दहा ते सकाळी दहा आणि सकाळी दहा ते रात्री दहा अशा दोन टप्प्यांमध्ये फिडरनिहाय वीजपुरवठा करण्यात येणार आहे. याबाबतची सूचना ‘महावितरण’च्या वरिष्ठ कार्यालयाकडून बुधवारी सायंकाळी कोल्हापूर परिमंडळाला प्राप्त झाली. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांना फायदाबारा तास वीजपुरवठा करण्याच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे ‘महावितरण’च्या कोल्हापूर मंडळाचे कार्यकारी अभियंता (प्रशासन) एस. बी. मारुलकर यांनी सांगितले. चांगला निर्णय जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे सेक्रेटरी मारुती पाटील म्हणाले, सध्या कृषिपंपांना आठ तास मिळणाऱ्या वीजपुरवठ्यामध्ये पाण्याचे फेरे पूर्ण होत नव्हते. कृषिपंपांना किमान दहा तास वीजपुरवठा व्हावा, अशी आम्ही वारंवार मागणी करीत होतो.