शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

वीस सायझिंग कारखाने सुरू

By admin | Updated: September 11, 2015 01:03 IST

किमान वेतनासाठी यशस्वी चर्चा : पुढील आठवड्यात वस्त्रनगरी पूर्वपदावर येणे शक्य

इचलकरंजी : सायझिंग कामगारांचा संप मागे घेण्याची अधिकृत घोषणा झाली नसली, तरी शहर व परिसरातील सुमारे वीस सायझिंग कारखाने सुरू झाले आहेत, तर ५० कारखान्यांवर सायझिंगधारक व कामगारांमधील चर्चा यशस्वी झाली असल्याचे सांगण्यात आले. साधारणत: पुढील आठवड्यात कारखाने सुरू होऊन येथील वस्त्रोद्योग पूर्वपदावर येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. यंत्रमाग उद्योगातील कामगारांसाठी शासनाने जाहीर केलेल्या किमान वेतनाची अंमलबजावणी ताबडतोब करण्यात यावी, या मागणीसाठी गेले ५१ दिवस सायझिंग-वार्पिंग कामगारांचा संप सुरू आहे. संपामुळे शहरातील वस्त्रोद्योगाची घडी विस्कळीत झाली होती. मात्र, यंत्रमाग उद्योगात कमालीची मंदी असल्यामुळे त्याची तीव्रता सुरुवातीच्या काळात भासली नाही. मात्र, संप लांबल्यामुळे वस्त्रनगरीमध्ये अस्वस्थता पसरली होती. इचलकरंजी, कोल्हापूर व मुंबई मंत्रालय अशा स्तरावर बैठका होऊनसुद्धा किमान वेतनाचा प्रश्न मार्गी लावला नव्हता. त्याचबरोबर पॉवरलूम असोसिएशन व सायझिंग असोसिएशन यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीवेळी न्यायालयाने किमान वेतनाच्या अंमलबजावणीला तात्पुरती स्थगिती दिली नसल्याने संप लांबत चालला होता. शनिवारी (५ सप्टेंबर) जिल्हाधिकारी अमित सैनी व जिल्हा पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांनी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी ५०० रुपये किमान वेतनवाढीचा तोडगा देऊन कारखाने सुरू करण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यासही यश आले नाही. अखेर मंगळवारी खासदार राजू शेट्टी व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी कामगार नेते ए. बी. पाटील यांच्याशी चर्चा केली. या चर्चेमध्ये कारखाना स्तरावर ५०० रुपयांहून अधिक वाढ देणारे सायझिंग कारखाने सुरू करण्याची मुभा त्यांनी दिली. त्याप्रमाणे गेल्या दोन-तीन दिवसांत चर्चा होऊन सुमारे वीस कारखाने सुरू झाले. त्याचबरोबर बुधवारी व गुरुवारी सुमारे ६० ते ७० सायझिंग कारखान्यांवर चर्चा होऊन हे कारखाने नजीकच्या दोन-तीन दिवसांत सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गेला दीड महिना धूळखात पडलेली सायझिंगची यंत्रसामग्री साफसफाई करण्यासाठी आणखी तीन-चार दिवस लागतील. उर्वरित कारखान्यांवरसुद्धा चर्चेने हा प्रश्न मार्गी लागणार असल्याची चिन्हे असल्याने साधारणत: मंगळवार (१५ सप्टेंबर)नंतर कारखाने पूर्णपणे सुरू होऊन त्यानंतर वस्त्रनगरी पूर्वपदावर येईल.