शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

‘रविकिरण’च्या ‘त्या’ बारा कामगारांनी कामावर रुजू व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:41 IST

चंदगड : हलकर्णी (ता. चंदगड) येथील औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू असलेल्या रविकिरण पेपर्स मिल्स प्रा. लिमिटेड या कंपनीमधील ...

चंदगड : हलकर्णी (ता. चंदगड) येथील औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू असलेल्या रविकिरण पेपर्स मिल्स प्रा. लिमिटेड या कंपनीमधील आंदोलनात सहभागी झालेल्या बारा कामगारांनी कामावर रुजू व्हावे, असे आवाहन कंपनी व्यवस्थापनाने केले आहे. कंपनीने नेमलेल्या सर्व कायम कामगारांना किमान वेतन कायद्याप्रमाणे पगार, प्रॉव्हिडंट फंड, कामगार आरोग्य विमा योजना याचे लाभ दिले जात आहेत. कंपनीकडील ठेकेदार यांच्याकडूनही कामगारांना सर्व कायदेशीर लाभ दिले जात होते.

कंपनीतील १८ कामगारांनी दिनांक ८ सप्टेंबर २०२० पासून युनियनच्या सल्ल्याने कंपनीमध्ये बेकायदेशीरपणे संपास सुरुवात केली आहे. कंपनीतील या कामगारांनी याकरिता केवळ कायद्याप्रमाणे जाहीर होणाऱ्या ''''महागाई भत्ता'''' फरकाची मागणी केलेली आहे.

याबाबत कंपनीतर्फे पहिल्यापासून सर्व कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार पगार देत असल्याचे सांगण्यात आले आहे. कामगारांचा महागाई भत्ता फरक त्यातच समाविष्ट असल्याने पुन्हा नव्याने देणे कायदेशीररीत्या बंधनकारक नाही, असे कळविले आहे. ‘युनियन’च्यावतीने कायदेशीर बाब समजावून घेतली नाही.

कंपनीतर्फे देण्यात येणाऱ्या भत्त्यात कायदेशीर मतभेद असल्यास न्यायालयात दाद मागावी. न्यायालयाने जर कामगारांच्या मागणीनुसार सर्व लाभ द्यावे असे सुचविल्यास कंपनी देण्यात तयार आहे. कामगारांवर जर कंपनीने अन्याय केल्यास दाद मागायला कायदेशीर मार्ग उपलब्ध असताना चुकीच्या मार्गाने व आडमुठेपणाची भूमिका घेऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपासारखे टोकाचे हत्यार उपसून कामगारांना व कंपनीस ८ सप्टेंबर २०२० पासून वेठीस धरले आहे.

कंपनीतील संपात सध्या सहभागी असलेल्या १२ कामगारांना वारंवार आवाहन करूनही आजतागायत ते कामावर हजर झालेले नाहीत. युनियनने कायदेशीर मार्गाचा अवलंब न करता कामगारांची दिशाभूल करून जाणीवपूर्वक चुकीच्या मार्गाने आंदोलन करून कंपनीची बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही व्यवस्थापनाने सांगितले.