शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

बारा तासांची वीज आता आठ तासांवर

By admin | Updated: November 18, 2016 23:09 IST

शेतकरी अडचणीत : गरज असलेल्या काळात चार तास वीज कपात

प्रकाश पाटील -- कोपार्डे सलग १२ तास वीज देण्याची मुदतवाढ नसल्याने आता शेती पंपासाठी पुन्हा बारा तासांऐवजी आठ तासच वीजपुरवठा करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. सध्याच्या उन्हाच्या तडाख्यात ऊस पिकांना पाण्याची आवश्यकता असताना वीजकपातीचा निर्णय चुकीचा असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहेत.आॅक्टोबर महिन्यात राज्य शासनाने रब्बी हंगामाकरिता सलग १२ तास वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार रात्री १० ते सकाळी १०, तर दिवसा सकाळी १० ते रात्री १० अशी वीज शेतीपंपाना देण्यात येत होती. काही ठिकाणी अनेक अडचणींवर मात करून सुरळीत वीजपुरवठाही सुरू होता. ही मुदत १५ नोव्हेंबरपर्यंत होती. त्यानंतर पुन्हा १२ तासांऐवजी वीजपुरवठा आठ तास करण्यात येत आहे. ही मुदत वाढविण्याबाबत शासनाकडून विद्युत वितरण कंपनीला कोणताच आदेश आला नसल्याने मंडळाने आठ तासच वीज देण्याची अंमलबजावणी सुरू केली आहे.काही ठिकाणी अवकाळी किंवा परतीच्या पावसाने दांडी मारली असून, पिकांना पाण्याची मोठी गरज आहे. विशेष करून दुष्काळी पट्ट्यात अजिबातच पाऊस झाला नव्हता. तेथे परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने विहीर, नद्या, धरणे, तलावात आता पाण्याची उपलब्धता आहे. हे पाणी वेळेवर रब्बी पिकांना मिळाले तर उत्पादनात वाढ होणार आहे. मात्र, यासाठी शेतीपंपासाठी किमान १२ तास वीज पुरवठा पूर्वीप्रमाणे व्हावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.सहवीज प्रकल्पातून वीज खरेदी करावीअलीकडे सहवीज प्रकल्पातून तयार झालेली वीज महाग पडत असल्याने महावितरणने ती खरेदी करण्यास नकार दिला आहे. मात्र, ही वीज खरेदी करून कमी पडणारी वीज उपलब्ध होईल. साखर कारखान्यांना त्यातून जादा उत्पन्न मिळेल व उसाला जादा दर देण्यासाठी त्याचा उपयोग होईल. म्हणून सहवीज प्रकल्पातून उत्पादित होणारी वीज खरेदी करावी, अशी मागणी होत आहे. शेतीसाठी पाण्याची गरज डिसेंबरनंतरच जास्त लागते. शेतीपंपांना वीज योग्य प्रमाणात दिल्यास पिकाला पाणी देऊन उत्पन्न वाढण्यास मदत होईल. मागील वर्षी पाण्याच्या कमतरतेमुळे उपसाबंदी लागू झाली. यामुळे पिकाच्या उत्पन्नात मोठी घट झाली होती. यावर्षी पाऊस भरपूर झाला असून, पाणी भरपूर आहे. पण वीज नसल्यास शेतकऱ्यांचे हात मोडल्यासारखे होईल. यामुळे पूर्वीप्रमाणे १२ तास वीजपुरवठा व्हावा.- संजय जोतिराम पाटील, शेतकरी, वाकरे, ता. करवीर