शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
6
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
7
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
8
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
9
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
10
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
11
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
12
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
13
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
14
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
15
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
16
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
17
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
18
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
19
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
20
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
Daily Top 2Weekly Top 5

बारा तासांची वीज आता आठ तासांवर

By admin | Updated: November 18, 2016 23:09 IST

शेतकरी अडचणीत : गरज असलेल्या काळात चार तास वीज कपात

प्रकाश पाटील -- कोपार्डे सलग १२ तास वीज देण्याची मुदतवाढ नसल्याने आता शेती पंपासाठी पुन्हा बारा तासांऐवजी आठ तासच वीजपुरवठा करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. सध्याच्या उन्हाच्या तडाख्यात ऊस पिकांना पाण्याची आवश्यकता असताना वीजकपातीचा निर्णय चुकीचा असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहेत.आॅक्टोबर महिन्यात राज्य शासनाने रब्बी हंगामाकरिता सलग १२ तास वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार रात्री १० ते सकाळी १०, तर दिवसा सकाळी १० ते रात्री १० अशी वीज शेतीपंपाना देण्यात येत होती. काही ठिकाणी अनेक अडचणींवर मात करून सुरळीत वीजपुरवठाही सुरू होता. ही मुदत १५ नोव्हेंबरपर्यंत होती. त्यानंतर पुन्हा १२ तासांऐवजी वीजपुरवठा आठ तास करण्यात येत आहे. ही मुदत वाढविण्याबाबत शासनाकडून विद्युत वितरण कंपनीला कोणताच आदेश आला नसल्याने मंडळाने आठ तासच वीज देण्याची अंमलबजावणी सुरू केली आहे.काही ठिकाणी अवकाळी किंवा परतीच्या पावसाने दांडी मारली असून, पिकांना पाण्याची मोठी गरज आहे. विशेष करून दुष्काळी पट्ट्यात अजिबातच पाऊस झाला नव्हता. तेथे परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने विहीर, नद्या, धरणे, तलावात आता पाण्याची उपलब्धता आहे. हे पाणी वेळेवर रब्बी पिकांना मिळाले तर उत्पादनात वाढ होणार आहे. मात्र, यासाठी शेतीपंपासाठी किमान १२ तास वीज पुरवठा पूर्वीप्रमाणे व्हावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.सहवीज प्रकल्पातून वीज खरेदी करावीअलीकडे सहवीज प्रकल्पातून तयार झालेली वीज महाग पडत असल्याने महावितरणने ती खरेदी करण्यास नकार दिला आहे. मात्र, ही वीज खरेदी करून कमी पडणारी वीज उपलब्ध होईल. साखर कारखान्यांना त्यातून जादा उत्पन्न मिळेल व उसाला जादा दर देण्यासाठी त्याचा उपयोग होईल. म्हणून सहवीज प्रकल्पातून उत्पादित होणारी वीज खरेदी करावी, अशी मागणी होत आहे. शेतीसाठी पाण्याची गरज डिसेंबरनंतरच जास्त लागते. शेतीपंपांना वीज योग्य प्रमाणात दिल्यास पिकाला पाणी देऊन उत्पन्न वाढण्यास मदत होईल. मागील वर्षी पाण्याच्या कमतरतेमुळे उपसाबंदी लागू झाली. यामुळे पिकाच्या उत्पन्नात मोठी घट झाली होती. यावर्षी पाऊस भरपूर झाला असून, पाणी भरपूर आहे. पण वीज नसल्यास शेतकऱ्यांचे हात मोडल्यासारखे होईल. यामुळे पूर्वीप्रमाणे १२ तास वीजपुरवठा व्हावा.- संजय जोतिराम पाटील, शेतकरी, वाकरे, ता. करवीर