शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

बारा तासांची वीज आता आठ तासांवर

By admin | Updated: November 18, 2016 23:09 IST

शेतकरी अडचणीत : गरज असलेल्या काळात चार तास वीज कपात

प्रकाश पाटील -- कोपार्डे सलग १२ तास वीज देण्याची मुदतवाढ नसल्याने आता शेती पंपासाठी पुन्हा बारा तासांऐवजी आठ तासच वीजपुरवठा करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. सध्याच्या उन्हाच्या तडाख्यात ऊस पिकांना पाण्याची आवश्यकता असताना वीजकपातीचा निर्णय चुकीचा असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहेत.आॅक्टोबर महिन्यात राज्य शासनाने रब्बी हंगामाकरिता सलग १२ तास वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार रात्री १० ते सकाळी १०, तर दिवसा सकाळी १० ते रात्री १० अशी वीज शेतीपंपाना देण्यात येत होती. काही ठिकाणी अनेक अडचणींवर मात करून सुरळीत वीजपुरवठाही सुरू होता. ही मुदत १५ नोव्हेंबरपर्यंत होती. त्यानंतर पुन्हा १२ तासांऐवजी वीजपुरवठा आठ तास करण्यात येत आहे. ही मुदत वाढविण्याबाबत शासनाकडून विद्युत वितरण कंपनीला कोणताच आदेश आला नसल्याने मंडळाने आठ तासच वीज देण्याची अंमलबजावणी सुरू केली आहे.काही ठिकाणी अवकाळी किंवा परतीच्या पावसाने दांडी मारली असून, पिकांना पाण्याची मोठी गरज आहे. विशेष करून दुष्काळी पट्ट्यात अजिबातच पाऊस झाला नव्हता. तेथे परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने विहीर, नद्या, धरणे, तलावात आता पाण्याची उपलब्धता आहे. हे पाणी वेळेवर रब्बी पिकांना मिळाले तर उत्पादनात वाढ होणार आहे. मात्र, यासाठी शेतीपंपासाठी किमान १२ तास वीज पुरवठा पूर्वीप्रमाणे व्हावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.सहवीज प्रकल्पातून वीज खरेदी करावीअलीकडे सहवीज प्रकल्पातून तयार झालेली वीज महाग पडत असल्याने महावितरणने ती खरेदी करण्यास नकार दिला आहे. मात्र, ही वीज खरेदी करून कमी पडणारी वीज उपलब्ध होईल. साखर कारखान्यांना त्यातून जादा उत्पन्न मिळेल व उसाला जादा दर देण्यासाठी त्याचा उपयोग होईल. म्हणून सहवीज प्रकल्पातून उत्पादित होणारी वीज खरेदी करावी, अशी मागणी होत आहे. शेतीसाठी पाण्याची गरज डिसेंबरनंतरच जास्त लागते. शेतीपंपांना वीज योग्य प्रमाणात दिल्यास पिकाला पाणी देऊन उत्पन्न वाढण्यास मदत होईल. मागील वर्षी पाण्याच्या कमतरतेमुळे उपसाबंदी लागू झाली. यामुळे पिकाच्या उत्पन्नात मोठी घट झाली होती. यावर्षी पाऊस भरपूर झाला असून, पाणी भरपूर आहे. पण वीज नसल्यास शेतकऱ्यांचे हात मोडल्यासारखे होईल. यामुळे पूर्वीप्रमाणे १२ तास वीजपुरवठा व्हावा.- संजय जोतिराम पाटील, शेतकरी, वाकरे, ता. करवीर