शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

साखर कामगारांना बारा टक्के पगारवाढीचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:30 IST

एप्रिल २०१९ पासून अंमलबजावणी साखर कामगारांना बाप्पा पावला यड्राव: राज्यातील साखर कामगारांना बारा टक्के वेतनवाढीसह विविध भत्त्यांमध्ये वाढ देऊन ...

एप्रिल २०१९ पासून अंमलबजावणी

साखर कामगारांना बाप्पा पावला

यड्राव: राज्यातील साखर कामगारांना बारा टक्के वेतनवाढीसह विविध भत्त्यांमध्ये वाढ देऊन त्याची अंमलबजावणी एप्रिल २०१९ पासून करण्याचा निर्णय त्रिपक्षीय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. समितीचे अध्यक्ष व साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घोषणा करण्यात आली. साखर संकुल पुणे येथे बैठक पार पडली. या अंतरिम पगारवाढ ऐवजी थेट पगारवाढीच्या निर्णयामुळे राज्यातील दीड लाख साखर कामगारांना गणपती बाप्पा पावला आहे.

मार्च २०१९ च्या मूळ पगार, महागाई भत्त्यासह स्थिर भत्त्यावर १२ टक्के वेतनवाढ, व इतर भत्त्यांवर १२ टक्केप्रमाणे वाढ देण्यात आली आहे, महागाई भत्ता निर्देशांक २.७० वरून २.९० करण्यात आला आहे. सहा वर्षं सेवा झालेल्यांना एक वार्षिक वेतनवाढ तर १३ वर्षाला दोन व २० वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना तीन वार्षिक वेतन वाढ मिळणार आहेत. अकुशल कामगारांना २,४५० ते सुपरवायझरी कामगारांना २,७५० पर्यंत वाढ मिळणार आहे.

राज्यातील साखर कामगारांचा वेतन करार ३१ मार्च २०१९ रोजी संपला होता. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळासह विविध कामगार संघटनांच्या आंदोलनाचा पवित्र्यामुळे शासनाला त्रिपक्षीय समिती नेमली. दरम्यानच्या काळात कोरोनाचे संकट व संचारबंदीमुळे निर्णय प्रक्रियेला विलंब लागला. यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी समन्वय साधून तोडगा काढल्याने साखर कामगारांच्या पगारवाढीचा मार्ग मोकळा झाला.

या बैठकीस साखर आयुक्त शेखर गायकवाड, कामगार उपायुक्त रविराज इळवे, हर्षवर्धन पाटील, प्रकाश आवाडे, चंद्रदीप नरके, तात्यासो काळे, शंकरराव भोसले, राऊसाहेब पाटील, रावसाहेब भोसले, प्रदीप बणगे, संजय मोरबाळे यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते.

थेट पगार वाढ

साखर कामगारांचे वेतन करार संपल्यावर त्रिपक्षीय समिती अंतरिम वाढ देऊन नंतर पगारवाढीचा निर्णय घेत होती. परंतु यावेळी अंतरिम पगारवाढीऐवजी थेट पगार वाढ होत असल्याने चांगली पगारवाढ झाली आहे. लेट असेना पण थेट पगारवाढ व्हावी यासाठी आमचा आग्रह होता तो पूर्ण झाला. राऊसाहेब पाटील सदस्य त्रिपक्षीय समिती सदस्य.

शरद पवारांचाच निर्णय

साखर कामगारांच्या वेतनवाढी प्रश्नी १९९८ ते २००२ शरद पवार निवडा, त्यानंतर एप्रिल २००५ ते मार्च २००९, एप्रिल २००९ ते मार्च २०१४, एप्रिल २०१४ ते मार्च २०१९ या चार वेतनवाढीचे निर्णय शरद पवारांच्या तोडग्यामुळेच साखर कामगारांना पगार वाढ झाली आणि यावेळी ऑगस्ट महिन्यात साखर कारखानदार व कामगार प्रतिनिधीच्या बैठकीत शरद पवार यांनी तोडगा काढल्याने हा पगारवाढीचा निर्णयावर शिक्कामोर्तब झाला.