शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बारावी निकालाचा पेच; अकरावी रेस्ट इयर समजलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:17 IST

बारावीच्या परीक्षेसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील एकूण १ लाख १७ हजार ७५१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या ...

बारावीच्या परीक्षेसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील एकूण १ लाख १७ हजार ७५१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी पाठोपाठ बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय दि. ३ जून रोजी जाहीर केला. राज्य शिक्षण मंडळाकडून बारावीचे मूल्यमापन हे दहावी, अकरावी वार्षिक गुण आणि बारावीच्या अंतर्गत परीक्षांतील गुणांच्या आधारे करण्याचा विचार सुरू आहे. मात्र, गेल्यावर्षी कोरोनामुळे अकरावीची वार्षिक परीक्षा झाली नाही. यंदा बहुतांश विद्यार्थ्यांच्या बारावीतील अंतर्गत परीक्षा देखील झालेल्या नाहीत. मूल्यमापनाचे सूत्रही अद्याप निश्चित झालेले नाही. अधिकतर विद्यार्थी हे अकरावीला रेस्ट इयर मानतात. मूल्यमापनात या इयत्तेतील ४० टक्के गुणांचा विचार झाल्यास विद्यार्थ्यांच्या गुणदानावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

पॉईंटर

कोल्हापूर विभागातील बारावीतील विद्यार्थी

कला : ३४०९३

वाणिज्य : २७६७३

विज्ञान : ५००७६

एमसीव्हीसी : ५८४१

टेक्निकल : ६८

चौकट

बारावीसाठी असे गुणदान होण्याची शक्यता

सीबीएसईने बारावीच्या मूल्यमापनासाठी ३० : ३० : ४० (दहावी : अकरावी : बारावीचे गुण) असे सूत्र निश्चित केले आहे. त्यानुसार राज्य शिक्षण मंडळाने निर्णय घ्यावा, अशी काही पालक संघटनांकडून मागणी होत आहे. राज्य शिक्षण मंडळाकडून २०:४०:४० (दहावी : अकरावी : बारावीचे गुण) या सूत्राचा विचार केला जात आहे. हे सूत्र निश्चित झाल्यास त्यानुसार गुणदान होण्याची शक्यता आहे.

चौकट

गेल्यावर्षी अकरावीची वार्षिक परीक्षाच झाली नाही

इयत्ता अकरावीचा निकाल दोनशे गुणांच्या आधारे लावण्यात येतो. त्यात दोन घटक चाचणीचे प्रत्येकी २५ गुण, सहामाही परीक्षेतील ५० गुण, वार्षिक परीक्षेच्या १०० गुणांचा समावेश असतो. गेल्यावर्षी यातील केवळ वार्षिक परीक्षा झालेली नाही. त्यामुळे दोन घटक चाचणी आणि सहामाही परीक्षेच्या आधारे अकरावीचे मूल्यमापन झाले.

चौकट

बारावीला अंतर्गत गुण कोठे असतात?

इयत्ता बारावीतील कला, वाणिज्य विद्याशाखेमध्ये तोंडी परीक्षा अथवा प्रकल्पांना २० गुण असतात. विज्ञान विद्याशाखेमध्ये प्रात्यक्षिक परीक्षेला ३० गुण असतात.

चौकट

अकरावी तर ‘रेस्ट इयर’

महाविद्यालयीन शिक्षणातील प्रवेशाचा पहिला टप्पा असणाऱ्या दहावीमध्ये वर्षभर अभ्यासाचा तणाव सहन करून विद्यार्थी इयत्ता अकरावीमध्ये येतात. पुढे उच्च शिक्षणाच्यादृष्टीने बारावीचे वर्ष महत्त्वाचे असल्याने बहुतांश विद्यार्थी हे अकरावीकडे ‘रेस्ट इयर’ म्हणून पाहतात. केवळ अकरावी उत्तीर्ण होण्याला ते महत्त्व देतात.

प्राचार्यांच्या प्रतिक्रिया

दहावीला मेरिटमध्ये असणारे विद्यार्थी शक्यतो अकरावीकडे दुर्लक्ष करत नाही. त्यांची संख्या कमी असते. मात्र, बहुतांश विद्यार्थी अकरावीकडे फक्त उत्तीर्ण होण्याच्यादृष्टीने पाहतात. अशा विद्यार्थ्यांच्या गुणदान प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

-डॉ. व्ही. एम. पाटील, प्राचार्य, न्यू कॉलेज.

बारावीतील विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी दहावी, अकरावीच्या गुणांचा विचार होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास अकरावीत कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना थोडा फटका बसण्याची शक्यता आहे.

-पी. एस. जाधव, उपप्राचार्य, कमला कॉलेज.

विद्यार्थ्यांना भविष्याची चिंता

बारावीसाठी आमचे मूल्यमापन करण्यात दहावीचे २०, अकरावीचे ४० आणि बारावीतील ४० गुणांचा आधार घेणे हे सूत्र मला योग्य वाटते. शिक्षण मंडळाने या सूत्राचा विचार करणे आवश्यक आहे.

-प्रतीक पाटील, सुळे.

आमची परीक्षा रद्द करून आता महिना होत आला आहे. आमच्या पुढील शैक्षणिक भवितव्याचा विचार करून राज्य शासनाने लवकर मूल्यमापनाचे सूत्र निश्चित करून निकाल जाहीर करावा.

-पल्लवी संकपाळ, कंदलगाव.

010721\01kol_6_01072021_5.jpg

डमी (०१०७२०२१-कोल-स्टार ८७२ डमी)