शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

आॅटोलूममुळे साधे यंत्रमाग अडचणीत

By admin | Updated: August 9, 2016 23:52 IST

वस्त्रोद्योगामध्ये आर्थिक मंदी : इचलकरंजीत कापड उत्पादनातील स्पर्धा घातक

इचलकरंजी : शहरामध्ये विविध प्रकारचे कापड साध्या यंत्रमागावर आणि आॅटोलूमवर विणले जाते. सध्या वस्त्रोद्योगात असलेली आर्थिक मंदी साध्या यंत्रमागाबरोबरच आॅटोलूम कारखानदारांना सुद्धा सतावते आहे. अशा परिस्थितीमध्ये एखाद्या कापड प्रकाराच्या दरामध्ये थोडी सुधारणा झाल्यास हे कापड यंत्रमागाबरोबरच आॅटोलूमवर सुद्धा उत्पादित होत असल्याने साधे यंत्रमाग कारखानदार मात्र अडचणीत आले आहेत.गेल्या वर्षाहून अधिक काळ वस्त्रोद्योगामध्ये कमालीची आर्थिक मंदी आहे. कोणत्याही प्रकारच्या कापडाला मागणी नाही, तर कापसाचे दर वाढल्यामुळे सुताच्या दरामध्ये वाढ झाली आहे. त्याचबरोबर अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील विजेचे दर अधिक आहेत. साहजिकच राज्यातील कापडाच्या उत्पादनाला अन्य राज्यांच्या तुलनेत अधिक खर्च येत आहे. उत्पादन खर्चाएवढा कापडास भाव मिळत नसल्याने यंत्रमागासह आॅटोलूम कारखानदारांना नुकसान सोसावे लागत आहे.साध्या यंत्रमागावर पॉपलीन आणि मलमल हे कापड उत्पादित होत होते. गेल्या काही महिन्यांपासून दोन्हीही कापडाच्या प्रकारामध्ये मागणी नसल्याने यंत्रमागधारकांना नुकसान होऊ लागले. त्यामुळे बहुतांश यंत्रमागधारकांनी या कापडाचे उत्पादन कमी केले, तर काही कारखाने बंद राहिले. आता पॉपलीन या कापड प्रकारासाठी चांगला भाव मिळू लागला आहे. याचा फायदा आॅटोलूम कारखानदार उचलू लागले आहेत. साध्या मागावर एका दिवसात सुमारे ८० ते १०० मीटर कापड निघते. त्याला जॉबवर्क पद्धतीने सहा पैसे प्रतिमीटर मजुरी मिळते, तर आॅटोलूमला डबल पन्ह्याचे कापड निघते. त्याला आपोआपच १२ पैसे प्रतिमीटर मजुरी मिळते. आॅटोलूमवर दिवसभरात ६०० मीटर कापड उत्पादित होते. म्हणजे सुमारे १२ यंत्रमागांवर उत्पादित होणारे कापड दोनच आॅटोलूमवर उत्पादित होते.अशा परिस्थितीचा लाभ सध्या आॅटोलूमचे कारखानदार घेऊ लागले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर स्पर्धा निर्माण होऊन यंत्रमाग कारखान्यांना मात्र त्याचा फटका बसू लागला आहे. अशा पार्श्वभूमीवर साधे यंत्रमाग विरुद्ध आॅटोलूम अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे यंत्रमाग कारखानदार मात्र आणखीन अडचणीत आले आहेत. (प्रतिनिधी)घातक कापड उत्पादनाचा संघटित विचार व्हावाशहरामध्ये असलेल्या यंत्रमागधारकांच्या चारही संघटनांनी आयोजित केलेल्या आजी-माजी आमदार व आजी-माजी खासदार यांच्या व्यापक बैठकीमध्ये वस्त्रोद्योगातील आर्थिक मंदीबाबत सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचे ठरले. काही कापड प्रकार उत्पादन करण्यामध्ये निर्माण झालेली यंत्रमाग व आॅटोलूम यांच्यातील स्पर्धा यंत्रमागासाठी घातक ठरत आहे. त्याबाबतचा सांगोपांग विचार या आजी-माजी आमदार व खासदारांच्या समितीने करावा, अशी मागणी यंत्रमागधारकांतून होत आहे.