शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अडचणींवर मात करत पेटणार तांबाळे साखर कारखान्याचे धुराडे -

By admin | Updated: December 30, 2015 00:29 IST

गुड न्यूज

गारगोटी : अखेर तीन वर्षांनी तांबाळे कारखान्याचे धुराडे पेटणार आहे. सुरुवातीपासून अनेक अडचणींवर मात करीत उभ्या असलेल्या इंदिरा गांधी भारतीय महिला साखर कारखान्यातील संस्थापक अध्यक्ष सौ. विजयमाला देसाई, सर्व संचालक मंडळ यांनी हा कारखाना जिवंत ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि कामगारांनी दिलेली साथ वाखाणण्यासारखी आहे.भारतात १९९६ साली महिला विषयक धोरण जाहीर झाले. या धोरणाला अनुसरुन विजयमाला देसाई यांनी त्यांचे पतिराज बाजीराव देसाई यांच्या मदतीने साखर कारखाना उभारणीकरिता प्रयत्न सुरु केले. त्याचाच परिपाक अथांग प्रयत्नांनी जगातील पहिला महिला साखर कारखाना तांबाळे येथे उभारला गेला. सुरुवातीस प्रायोगिक तत्त्वावर एक लाख मेट्रीक टन उसाचे गाळप करण्यात आले. ते साल होते २00२. या कारखान्याची गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली.पुढे २00३ ते २00४ साली उसावर अस्मानी संकट आले ते म्हणजे लोकरी मावा. या माव्याने उसाची उभी पिके नष्ट झाली. यावेळी कारखाना केंद्र शासनाने केवळ महिलाविषयक धोरण जाहीर केले पण कोणतेही विशेष असे पॅकेज न दिल्याने कारखाना अधिक आर्थिक संकटात सापडत चालला. शेतकऱ्यांची ऊसबिले व कामगारांचे थकीत पगार भागवणे अवघड झाले. म्हणून संचालक मंडळाने २00५ साली हा कारखाना गोदावरी शुगरकडे भाडे तत्त्वावर चालवण्यासाठी दिला. त्यांनी शेतकऱ्यांना इतर कारखान्यांच्या बरोबरीने ऊस दर दिला. त्यामुळे शेतकरी या कारखान्याकडे ऊस स्वत:हून पाठवू लागला. तालुक्यात लाखो टन उभा असणारा ऊस संपवण्यासाठी मे अथवा जून महिना उजाडायचा, पण या कारखान्यामुळे तो मार्च एप्रिल महिन्यात संपू लागला. २00७ अखेर हा कारखाना गोदावरी शुगर्सकडे होता. पण प्रशासन, कामगार व गोदावरी शुगर्सची वाढलेली अरेरावी यामुळे संपूर्ण प्रक्रियेत वितुष्ठ निर्माण झाले. अखेरीस हा कारखाना प्रशासनाने काढून घेतला. २00८ ते २00९ साली हा कारखाना संचालक मंडळाने चालविला. आर्थिक पाठबळ न मिळाल्याने अखेरीस २0१0, ११, १२ सालापर्यंत हा कारखाना पुन्हा सहयोगी तत्त्वावर चालविण्यासाठी आरमुगा शुगर्सकडे देण्यात आला. त्यानंतर हा कारखाना पुन्हा बंद स्थितीत राहिला. हा कारखाना चालू व्हावा, यासाठी अध्यक्ष विजयमाला देसाई यांनी जिवाचे रान केले. तब्बल अडीच वर्षांनी हा कारखाना पुन्हा एकदा मुंबईस्थित एस. एम. प्रोजेक्ट या कंपनीकडे देण्यात आला आहे. योगायोग म्हणजे सौ. देसाई यांचा वाढदिवस ३१ डिसेंबर रोजी आहे. त्याच दिवशी याची अधिकृत घोषणा होईल. गेली अडीच वर्षे २३0 कायम कामगार व १३0 हंगामी कामगार हे पगाराविना कार्यरत आहेत.कारखाना सुरु होेणार असल्याच्या बातमीने शेतकरी व कामगार सुखावला आहे. कामगारांना सुधारित वेतनश्रेणीत पगार मिळेल, तर शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळू शकतो, अशा सर्वांच्याच आशा पल्लवीत झाल्या आहेत.