शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
IND W vs ENG W : इंग्लंडच्या मैदानात टीम इंडियानं रचला इतिहास; इथं पहिल्यांदाच जिंकली T20I मालिका
3
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
4
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
5
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
6
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
7
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
8
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
9
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
10
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
12
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
13
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
14
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
15
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
16
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
17
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
18
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
19
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
20
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?

अडचणींवर मात करत पेटणार तांबाळे साखर कारखान्याचे धुराडे -

By admin | Updated: December 30, 2015 00:29 IST

गुड न्यूज

गारगोटी : अखेर तीन वर्षांनी तांबाळे कारखान्याचे धुराडे पेटणार आहे. सुरुवातीपासून अनेक अडचणींवर मात करीत उभ्या असलेल्या इंदिरा गांधी भारतीय महिला साखर कारखान्यातील संस्थापक अध्यक्ष सौ. विजयमाला देसाई, सर्व संचालक मंडळ यांनी हा कारखाना जिवंत ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि कामगारांनी दिलेली साथ वाखाणण्यासारखी आहे.भारतात १९९६ साली महिला विषयक धोरण जाहीर झाले. या धोरणाला अनुसरुन विजयमाला देसाई यांनी त्यांचे पतिराज बाजीराव देसाई यांच्या मदतीने साखर कारखाना उभारणीकरिता प्रयत्न सुरु केले. त्याचाच परिपाक अथांग प्रयत्नांनी जगातील पहिला महिला साखर कारखाना तांबाळे येथे उभारला गेला. सुरुवातीस प्रायोगिक तत्त्वावर एक लाख मेट्रीक टन उसाचे गाळप करण्यात आले. ते साल होते २00२. या कारखान्याची गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली.पुढे २00३ ते २00४ साली उसावर अस्मानी संकट आले ते म्हणजे लोकरी मावा. या माव्याने उसाची उभी पिके नष्ट झाली. यावेळी कारखाना केंद्र शासनाने केवळ महिलाविषयक धोरण जाहीर केले पण कोणतेही विशेष असे पॅकेज न दिल्याने कारखाना अधिक आर्थिक संकटात सापडत चालला. शेतकऱ्यांची ऊसबिले व कामगारांचे थकीत पगार भागवणे अवघड झाले. म्हणून संचालक मंडळाने २00५ साली हा कारखाना गोदावरी शुगरकडे भाडे तत्त्वावर चालवण्यासाठी दिला. त्यांनी शेतकऱ्यांना इतर कारखान्यांच्या बरोबरीने ऊस दर दिला. त्यामुळे शेतकरी या कारखान्याकडे ऊस स्वत:हून पाठवू लागला. तालुक्यात लाखो टन उभा असणारा ऊस संपवण्यासाठी मे अथवा जून महिना उजाडायचा, पण या कारखान्यामुळे तो मार्च एप्रिल महिन्यात संपू लागला. २00७ अखेर हा कारखाना गोदावरी शुगर्सकडे होता. पण प्रशासन, कामगार व गोदावरी शुगर्सची वाढलेली अरेरावी यामुळे संपूर्ण प्रक्रियेत वितुष्ठ निर्माण झाले. अखेरीस हा कारखाना प्रशासनाने काढून घेतला. २00८ ते २00९ साली हा कारखाना संचालक मंडळाने चालविला. आर्थिक पाठबळ न मिळाल्याने अखेरीस २0१0, ११, १२ सालापर्यंत हा कारखाना पुन्हा सहयोगी तत्त्वावर चालविण्यासाठी आरमुगा शुगर्सकडे देण्यात आला. त्यानंतर हा कारखाना पुन्हा बंद स्थितीत राहिला. हा कारखाना चालू व्हावा, यासाठी अध्यक्ष विजयमाला देसाई यांनी जिवाचे रान केले. तब्बल अडीच वर्षांनी हा कारखाना पुन्हा एकदा मुंबईस्थित एस. एम. प्रोजेक्ट या कंपनीकडे देण्यात आला आहे. योगायोग म्हणजे सौ. देसाई यांचा वाढदिवस ३१ डिसेंबर रोजी आहे. त्याच दिवशी याची अधिकृत घोषणा होईल. गेली अडीच वर्षे २३0 कायम कामगार व १३0 हंगामी कामगार हे पगाराविना कार्यरत आहेत.कारखाना सुरु होेणार असल्याच्या बातमीने शेतकरी व कामगार सुखावला आहे. कामगारांना सुधारित वेतनश्रेणीत पगार मिळेल, तर शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळू शकतो, अशा सर्वांच्याच आशा पल्लवीत झाल्या आहेत.