शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
5
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
6
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
7
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
8
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
9
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
10
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
11
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
12
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
13
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
15
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
16
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
17
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
18
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
19
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
20
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या

अडचणींवर मात करत पेटणार तांबाळे साखर कारखान्याचे धुराडे -

By admin | Updated: December 30, 2015 00:29 IST

गुड न्यूज

गारगोटी : अखेर तीन वर्षांनी तांबाळे कारखान्याचे धुराडे पेटणार आहे. सुरुवातीपासून अनेक अडचणींवर मात करीत उभ्या असलेल्या इंदिरा गांधी भारतीय महिला साखर कारखान्यातील संस्थापक अध्यक्ष सौ. विजयमाला देसाई, सर्व संचालक मंडळ यांनी हा कारखाना जिवंत ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि कामगारांनी दिलेली साथ वाखाणण्यासारखी आहे.भारतात १९९६ साली महिला विषयक धोरण जाहीर झाले. या धोरणाला अनुसरुन विजयमाला देसाई यांनी त्यांचे पतिराज बाजीराव देसाई यांच्या मदतीने साखर कारखाना उभारणीकरिता प्रयत्न सुरु केले. त्याचाच परिपाक अथांग प्रयत्नांनी जगातील पहिला महिला साखर कारखाना तांबाळे येथे उभारला गेला. सुरुवातीस प्रायोगिक तत्त्वावर एक लाख मेट्रीक टन उसाचे गाळप करण्यात आले. ते साल होते २00२. या कारखान्याची गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली.पुढे २00३ ते २00४ साली उसावर अस्मानी संकट आले ते म्हणजे लोकरी मावा. या माव्याने उसाची उभी पिके नष्ट झाली. यावेळी कारखाना केंद्र शासनाने केवळ महिलाविषयक धोरण जाहीर केले पण कोणतेही विशेष असे पॅकेज न दिल्याने कारखाना अधिक आर्थिक संकटात सापडत चालला. शेतकऱ्यांची ऊसबिले व कामगारांचे थकीत पगार भागवणे अवघड झाले. म्हणून संचालक मंडळाने २00५ साली हा कारखाना गोदावरी शुगरकडे भाडे तत्त्वावर चालवण्यासाठी दिला. त्यांनी शेतकऱ्यांना इतर कारखान्यांच्या बरोबरीने ऊस दर दिला. त्यामुळे शेतकरी या कारखान्याकडे ऊस स्वत:हून पाठवू लागला. तालुक्यात लाखो टन उभा असणारा ऊस संपवण्यासाठी मे अथवा जून महिना उजाडायचा, पण या कारखान्यामुळे तो मार्च एप्रिल महिन्यात संपू लागला. २00७ अखेर हा कारखाना गोदावरी शुगर्सकडे होता. पण प्रशासन, कामगार व गोदावरी शुगर्सची वाढलेली अरेरावी यामुळे संपूर्ण प्रक्रियेत वितुष्ठ निर्माण झाले. अखेरीस हा कारखाना प्रशासनाने काढून घेतला. २00८ ते २00९ साली हा कारखाना संचालक मंडळाने चालविला. आर्थिक पाठबळ न मिळाल्याने अखेरीस २0१0, ११, १२ सालापर्यंत हा कारखाना पुन्हा सहयोगी तत्त्वावर चालविण्यासाठी आरमुगा शुगर्सकडे देण्यात आला. त्यानंतर हा कारखाना पुन्हा बंद स्थितीत राहिला. हा कारखाना चालू व्हावा, यासाठी अध्यक्ष विजयमाला देसाई यांनी जिवाचे रान केले. तब्बल अडीच वर्षांनी हा कारखाना पुन्हा एकदा मुंबईस्थित एस. एम. प्रोजेक्ट या कंपनीकडे देण्यात आला आहे. योगायोग म्हणजे सौ. देसाई यांचा वाढदिवस ३१ डिसेंबर रोजी आहे. त्याच दिवशी याची अधिकृत घोषणा होईल. गेली अडीच वर्षे २३0 कायम कामगार व १३0 हंगामी कामगार हे पगाराविना कार्यरत आहेत.कारखाना सुरु होेणार असल्याच्या बातमीने शेतकरी व कामगार सुखावला आहे. कामगारांना सुधारित वेतनश्रेणीत पगार मिळेल, तर शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळू शकतो, अशा सर्वांच्याच आशा पल्लवीत झाल्या आहेत.