शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शिराळे वारुण येथे तुळशी पूजन

By admin | Updated: November 28, 2015 00:12 IST

स्त्रीत्वाला सलाम करणारी प्रथा : तीन वर्षांपासून तुळशी विवाहास फाटा

 शित्तूर वारुण : तुळशी विवाहाऐवजी तुळशी पूजन करण्याची सभ्य, सुसंस्कृत आणि स्त्रीत्वाला सलाम करणारी प्रथा शाहूवाडी तालुक्यामधील शिराळे वारुण हे गाव गेल्या तीन वर्षांपासून निष्ठेने पाळत आहे.वैदिक धर्म ग्रंथामधील कथेनुसार प्रजाहित दक्ष राजा जालंदर आणि त्याची पत्नी वृंदा अर्थात तुलसी ही चारित्र्यसंपन्न होती. त्यांच्या राज्यामध्ये प्रजा सुखी आणि समृद्ध होती. विष्णूने वृंदाचे (तुलसी) पतिव्रत्य खंडन केले. त्यामुळे वृंदाने आत्महत्या केली. जालंदरने वृंदाच्या स्मृतिप्रीत्यर्थ तिचा अंत्यविधी करण्याअगोदर तुलसीचे रोप लावले आणि स्वत: आत्महत्या केली. ज्या विष्णूने वृंदाचे पतिव्रत्य भंग केले त्याच्याशीच विवाह लावण्याची प्रथा रूढ झाली.आपल्या आई-वडिलांचे लग्न एकदाच होते. मग तुलसीचे लग्न वारंवार का? आणि चारित्र्यहनन करणाऱ्या विष्णुशीच का? ही वृंदाची अर्थात तुलसीची विटंबना नसून समस्त महिलावर्गांचीच विटंबना आहे, असं मानून गेल्या तीन वर्षांपासून या गावामधील विवेकशील तरुणांनी ठिकठिकाणी बैठका घेऊन प्रबोधन फेरी काढली. दरम्यान, घरोघरी जाणीव-जागृतीसाठी पत्रके वाटली. गावच्या सज्ञान आजी-माजी सरपंचांनी यावेळी निर्णायक सहभाग नोंदवला. गावातील विविध सण, उत्सव साजरा करणाऱ्या तरुण मंडळांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.तुळशीचे आयुर्वेदिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळस ही दिवसा आणि रात्रीही आॅक्सिजन (प्राणवायू) सोडते. ताप, खोकला आणि नायटासारख्या त्वचारोगावरही औषधी वनस्पती म्हणून तुळशीचा उपयोग होतो. विवेकाला घायाळ करणाऱ्या कथेमध्ये वृंदा अर्थात तुलसी ही चारित्र्यसंपन्न असून, तिचा वारंवार विवाह लावण्याच्या अनिष्ट प्रथेला फाटा देत या गावामध्ये सन्मानाने हळदी, कुंकू लावून पुष्प अर्पण करून तुलसीचे पूजन करण्यात आले.‘तुलसी विवाह’ ही कथा समस्त महिलावर्गाची बदनामी करणारी आहे, असं मानून आम्ही सामुदायिकरीत्या ‘तुलसी पूजन’ हा उत्सव संपूर्ण गावामध्ये साजरा करतो. यासाठी लोकांना ‘तुलसी पूजन’ करण्याचे या निमित्ताने विनंती आणि आवाहन करण्यात आले होते.संजय यादव : (स्थानिक नागरिक)