शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

तुळशी धरण चोरीला जातंय !

By admin | Updated: April 26, 2016 00:42 IST

अधिकाऱ्यांच्या बाबतीत कुंपणच शेत खात असल्याच्या प्रतिक्रिया\धरण परिसरातच अतिक्रमण

श्रीकांत ऱ्हायकर--धामोड  --राधानगरी तालुक्याच्या पश्चिमेस असणाऱ्या ‘तुळशी’जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात परिसरातील धनदांडग्या शेतकऱ्यांनी आपल्या राजकीय पाठबळाच्या जोरावर व आधिकाऱ्यांच्या संगनमताने अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. याचा परिणाम धरणाच्या पाणीसाठ्यावर होणार असून भविष्यात पाणी प्रश्न गंभीर बनणार आहे.या पाणलोट क्षेत्राच्या जमिनीवर आपलाच हक्क असल्याच्या अविर्भावात हे धनदांडगे शेतकरी असून अशा शेतकऱ्यांना इथला अधिकारीवर्गच पाठीशी घालत असल्याच्या चर्चा काही शेतकऱ्यांकडून ऐकावयास मिळत आहेत. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांच्या बाबतीत कुंपणच शेत खात असल्याच्या बोलक्या प्रतिक्रिया उमटत आहेत. या गोष्टीची वेळीच शहानिशा होऊन संबंधितावर योग्य ती कारवाई न केल्यास काही दिवसांत धरणच चोरीला जाणार यात शंका नाही व त्यामुळे धरणातील पाणीसाठाही कमी होणार आहे.धरण उभारणीच्या अगोदरच्या काळात या परिसरातील लोकांना पिण्याचे पाणी मिळवणे म्हणजे तारेवरची कसरतच होती. येथील लोकांचा हा पाणी प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठीच महाराष्ट्र्र शासनाने १९७०-७२च्या दरम्यान तुळशी नदीच्या पात्रावर ३.४७ टी.एम.सी.इतका पाणीसाठा करणाऱ्या ‘तुळशी’ जलाशयाच्या उभारणीला सुरुवात केली. अल्पावधीतच धरणाचे काम पूर्ण होऊन येथील लोकांचा पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघाला. दरम्यान, या तलावाच्या उभारणीत ज्या लोकांच्या जमिनी गेल्या अशा शेतकऱ्यांना शेतीकाठावर उपलब्धते- नुसार जमीन दिली. परिणामी इथला शेतकरी सुखी झाला.गेल्या कित्येक वर्षांपासून तलावातील या पाण्याच्या जोरावर शेतकऱ्यांनी आपल्या शेतात हरितक्रांती घडवून आणली. तोच शेतकरी तलावातील पाणीसाठवण क्षमतेचा विचार न करता धरण पाणलोट क्षेत्रातच अतिक्रमण करत आहे. ९८.२८ द.ल.घ. पाणी साठवण क्षमता, ३ वक्र दरवाजे, एक भुयारी दरवाजा, ३ अंतर्गत दरवाजे व ३४.९२ चौरस किलोमीटर पाणलोट क्षेत्र अशी वैशिष्ट्ये घेऊन उभारलेल्या या तुळशी तलावाने गेल्या ४० ते ५० वर्षांत अनेकांचे संसार फु लवले आहेत, पण असे असले तरी तलावाच्या अस्तित्वाबाबत व इथल्या समस्यांबाबत ना इथला अधिकारीवर्ग कार्यतत्पर आहे ना शेतकरीवर्ग. परिणामी येत्या काही दिवसांत धरणच चोरीला गेले, तर त्याबद्दल कुणालाच नवल वाटायला नको. आता वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांनी भविष्याचा विचार करून येणारी आव्हाने पेलण्यासाठी तुळशी तलावाच्या वेगवेगळया समस्यांबाबत ठोस निर्णय घेणे गरजेचे बनले आहे, अन्यथा धरणाच्या सुरक्षिततेचा, अस्तित्वाचा, पर्यायाने पाण्याचा प्रश्न गंभीर बनेल, यात कोणतीच शंका नाही. सपाटीकरण सुरू : धनदांडग्यांचे कृ त्यहजारो शेतकऱ्यांना वरदान ठरलेला हा तुळशी तलाव शासनाच्या दुर्लक्षतेमुळे वनअधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. सध्या तर या जलाशयाच्या काठावर ाहरातील धनदांडग्या व्यावसायिकांनी अत्यल्प दराने जमिनी खरेदी क रून सपाटीकरणाच्या कामाला सुरुवात केली आहे. मोहितेवाडी, पिपरेवाडी, खामकरवाडी आदी गावांतील शेतकऱ्यांनीही अशाच पद्धतीने या तुळशी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात १०० ते २०० फु टापर्यंत आतमध्ये दगडी बांध घालून अतिक्रमण के ले आहे. अशा प्रकारांना या परिसरात चांगलाच ऊत आल्याने भविष्यात पाणीसाठ्यावर याचा परिणाम होणार आहे.