शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

तुळशी धरण चोरीला जातंय !

By admin | Updated: April 26, 2016 00:42 IST

अधिकाऱ्यांच्या बाबतीत कुंपणच शेत खात असल्याच्या प्रतिक्रिया\धरण परिसरातच अतिक्रमण

श्रीकांत ऱ्हायकर--धामोड  --राधानगरी तालुक्याच्या पश्चिमेस असणाऱ्या ‘तुळशी’जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात परिसरातील धनदांडग्या शेतकऱ्यांनी आपल्या राजकीय पाठबळाच्या जोरावर व आधिकाऱ्यांच्या संगनमताने अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. याचा परिणाम धरणाच्या पाणीसाठ्यावर होणार असून भविष्यात पाणी प्रश्न गंभीर बनणार आहे.या पाणलोट क्षेत्राच्या जमिनीवर आपलाच हक्क असल्याच्या अविर्भावात हे धनदांडगे शेतकरी असून अशा शेतकऱ्यांना इथला अधिकारीवर्गच पाठीशी घालत असल्याच्या चर्चा काही शेतकऱ्यांकडून ऐकावयास मिळत आहेत. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांच्या बाबतीत कुंपणच शेत खात असल्याच्या बोलक्या प्रतिक्रिया उमटत आहेत. या गोष्टीची वेळीच शहानिशा होऊन संबंधितावर योग्य ती कारवाई न केल्यास काही दिवसांत धरणच चोरीला जाणार यात शंका नाही व त्यामुळे धरणातील पाणीसाठाही कमी होणार आहे.धरण उभारणीच्या अगोदरच्या काळात या परिसरातील लोकांना पिण्याचे पाणी मिळवणे म्हणजे तारेवरची कसरतच होती. येथील लोकांचा हा पाणी प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठीच महाराष्ट्र्र शासनाने १९७०-७२च्या दरम्यान तुळशी नदीच्या पात्रावर ३.४७ टी.एम.सी.इतका पाणीसाठा करणाऱ्या ‘तुळशी’ जलाशयाच्या उभारणीला सुरुवात केली. अल्पावधीतच धरणाचे काम पूर्ण होऊन येथील लोकांचा पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघाला. दरम्यान, या तलावाच्या उभारणीत ज्या लोकांच्या जमिनी गेल्या अशा शेतकऱ्यांना शेतीकाठावर उपलब्धते- नुसार जमीन दिली. परिणामी इथला शेतकरी सुखी झाला.गेल्या कित्येक वर्षांपासून तलावातील या पाण्याच्या जोरावर शेतकऱ्यांनी आपल्या शेतात हरितक्रांती घडवून आणली. तोच शेतकरी तलावातील पाणीसाठवण क्षमतेचा विचार न करता धरण पाणलोट क्षेत्रातच अतिक्रमण करत आहे. ९८.२८ द.ल.घ. पाणी साठवण क्षमता, ३ वक्र दरवाजे, एक भुयारी दरवाजा, ३ अंतर्गत दरवाजे व ३४.९२ चौरस किलोमीटर पाणलोट क्षेत्र अशी वैशिष्ट्ये घेऊन उभारलेल्या या तुळशी तलावाने गेल्या ४० ते ५० वर्षांत अनेकांचे संसार फु लवले आहेत, पण असे असले तरी तलावाच्या अस्तित्वाबाबत व इथल्या समस्यांबाबत ना इथला अधिकारीवर्ग कार्यतत्पर आहे ना शेतकरीवर्ग. परिणामी येत्या काही दिवसांत धरणच चोरीला गेले, तर त्याबद्दल कुणालाच नवल वाटायला नको. आता वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांनी भविष्याचा विचार करून येणारी आव्हाने पेलण्यासाठी तुळशी तलावाच्या वेगवेगळया समस्यांबाबत ठोस निर्णय घेणे गरजेचे बनले आहे, अन्यथा धरणाच्या सुरक्षिततेचा, अस्तित्वाचा, पर्यायाने पाण्याचा प्रश्न गंभीर बनेल, यात कोणतीच शंका नाही. सपाटीकरण सुरू : धनदांडग्यांचे कृ त्यहजारो शेतकऱ्यांना वरदान ठरलेला हा तुळशी तलाव शासनाच्या दुर्लक्षतेमुळे वनअधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. सध्या तर या जलाशयाच्या काठावर ाहरातील धनदांडग्या व्यावसायिकांनी अत्यल्प दराने जमिनी खरेदी क रून सपाटीकरणाच्या कामाला सुरुवात केली आहे. मोहितेवाडी, पिपरेवाडी, खामकरवाडी आदी गावांतील शेतकऱ्यांनीही अशाच पद्धतीने या तुळशी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात १०० ते २०० फु टापर्यंत आतमध्ये दगडी बांध घालून अतिक्रमण के ले आहे. अशा प्रकारांना या परिसरात चांगलाच ऊत आल्याने भविष्यात पाणीसाठ्यावर याचा परिणाम होणार आहे.