शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

तुळशी धरण चोरीला जातंय !

By admin | Updated: April 26, 2016 00:42 IST

अधिकाऱ्यांच्या बाबतीत कुंपणच शेत खात असल्याच्या प्रतिक्रिया\धरण परिसरातच अतिक्रमण

श्रीकांत ऱ्हायकर--धामोड  --राधानगरी तालुक्याच्या पश्चिमेस असणाऱ्या ‘तुळशी’जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात परिसरातील धनदांडग्या शेतकऱ्यांनी आपल्या राजकीय पाठबळाच्या जोरावर व आधिकाऱ्यांच्या संगनमताने अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. याचा परिणाम धरणाच्या पाणीसाठ्यावर होणार असून भविष्यात पाणी प्रश्न गंभीर बनणार आहे.या पाणलोट क्षेत्राच्या जमिनीवर आपलाच हक्क असल्याच्या अविर्भावात हे धनदांडगे शेतकरी असून अशा शेतकऱ्यांना इथला अधिकारीवर्गच पाठीशी घालत असल्याच्या चर्चा काही शेतकऱ्यांकडून ऐकावयास मिळत आहेत. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांच्या बाबतीत कुंपणच शेत खात असल्याच्या बोलक्या प्रतिक्रिया उमटत आहेत. या गोष्टीची वेळीच शहानिशा होऊन संबंधितावर योग्य ती कारवाई न केल्यास काही दिवसांत धरणच चोरीला जाणार यात शंका नाही व त्यामुळे धरणातील पाणीसाठाही कमी होणार आहे.धरण उभारणीच्या अगोदरच्या काळात या परिसरातील लोकांना पिण्याचे पाणी मिळवणे म्हणजे तारेवरची कसरतच होती. येथील लोकांचा हा पाणी प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठीच महाराष्ट्र्र शासनाने १९७०-७२च्या दरम्यान तुळशी नदीच्या पात्रावर ३.४७ टी.एम.सी.इतका पाणीसाठा करणाऱ्या ‘तुळशी’ जलाशयाच्या उभारणीला सुरुवात केली. अल्पावधीतच धरणाचे काम पूर्ण होऊन येथील लोकांचा पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघाला. दरम्यान, या तलावाच्या उभारणीत ज्या लोकांच्या जमिनी गेल्या अशा शेतकऱ्यांना शेतीकाठावर उपलब्धते- नुसार जमीन दिली. परिणामी इथला शेतकरी सुखी झाला.गेल्या कित्येक वर्षांपासून तलावातील या पाण्याच्या जोरावर शेतकऱ्यांनी आपल्या शेतात हरितक्रांती घडवून आणली. तोच शेतकरी तलावातील पाणीसाठवण क्षमतेचा विचार न करता धरण पाणलोट क्षेत्रातच अतिक्रमण करत आहे. ९८.२८ द.ल.घ. पाणी साठवण क्षमता, ३ वक्र दरवाजे, एक भुयारी दरवाजा, ३ अंतर्गत दरवाजे व ३४.९२ चौरस किलोमीटर पाणलोट क्षेत्र अशी वैशिष्ट्ये घेऊन उभारलेल्या या तुळशी तलावाने गेल्या ४० ते ५० वर्षांत अनेकांचे संसार फु लवले आहेत, पण असे असले तरी तलावाच्या अस्तित्वाबाबत व इथल्या समस्यांबाबत ना इथला अधिकारीवर्ग कार्यतत्पर आहे ना शेतकरीवर्ग. परिणामी येत्या काही दिवसांत धरणच चोरीला गेले, तर त्याबद्दल कुणालाच नवल वाटायला नको. आता वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांनी भविष्याचा विचार करून येणारी आव्हाने पेलण्यासाठी तुळशी तलावाच्या वेगवेगळया समस्यांबाबत ठोस निर्णय घेणे गरजेचे बनले आहे, अन्यथा धरणाच्या सुरक्षिततेचा, अस्तित्वाचा, पर्यायाने पाण्याचा प्रश्न गंभीर बनेल, यात कोणतीच शंका नाही. सपाटीकरण सुरू : धनदांडग्यांचे कृ त्यहजारो शेतकऱ्यांना वरदान ठरलेला हा तुळशी तलाव शासनाच्या दुर्लक्षतेमुळे वनअधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. सध्या तर या जलाशयाच्या काठावर ाहरातील धनदांडग्या व्यावसायिकांनी अत्यल्प दराने जमिनी खरेदी क रून सपाटीकरणाच्या कामाला सुरुवात केली आहे. मोहितेवाडी, पिपरेवाडी, खामकरवाडी आदी गावांतील शेतकऱ्यांनीही अशाच पद्धतीने या तुळशी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात १०० ते २०० फु टापर्यंत आतमध्ये दगडी बांध घालून अतिक्रमण के ले आहे. अशा प्रकारांना या परिसरात चांगलाच ऊत आल्याने भविष्यात पाणीसाठ्यावर याचा परिणाम होणार आहे.