शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
2
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
3
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
4
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
5
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
6
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
7
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
8
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
10
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
11
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
12
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
13
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
14
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
15
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
16
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
17
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
18
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
19
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
20
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम

वसुलीचा तगादा बेततोय बळिराजाच्या जिवावर

By admin | Updated: March 28, 2016 00:20 IST

ग्रामीण भागात सावकारकी जोमात : अनेक शेतकरी आत्महत्येच्या मार्गावर

गणपती कोळी -- कुरुंदवाड --सावकाराच्या वसुलीच्या तगाद्याने शिरढोण (ता़ शिरोळ) येथील प्रकाश रामू कोरे या शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केली़ यातून ग्रामीण भागातील वास्तव स्पष्ट होत आहे़ दुष्काळसदृश परिस्थितीमुळे पाण्याअभावी वाळत असलेले उभे पीक, घसरलेला उसाचा दर, यातून सोसायटी, बँकेची कर्जे फिटण्याची शक्यता नाही़ अशातच खासगी सावकार वसुलीचा तगादा लावत असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवरील खासगी सावकाराचा फास आवळत आहे़ त्यामुळे यावर वेळीच उपाय करण्याची गरज आहे़ बारमाही वाहणाऱ्या नद्या, सुपीक जमीन, उत्पादित मालाला मिळणारी बाजारपेठ त्यामुळे येथील शेतकऱ्यांची उलाढालही मोठी असते़ मुख्य पीक ऊस असले तरी भाजीपाला, कडधान्ये, फळभाजी पिकविण्यात येथील शेतकरी माहीर आहेत़ ऊस पिकाला सेवा सोसायटी, बँकांतून कर्ज दिले जाते़ सोसायटीकडून एकरी ३५ ते ४० हजार रुपये, तर बँकेकडून ६० हजार रुपये कर्ज दिले जाते़ उत्पादन खर्च, मजुरी यासह इतर खर्च वाढल्याने शेतकऱ्याचा कर्जरूपात मिळणाऱ्या पैशांवर खर्च भागत नाही़ पिकांचे उत्पादन जादा घेऊन जास्त आर्थिक नफा मिळविण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांची शेतीसाठी लागेल तो खर्च करण्याची तयारी असते़ उत्पादन आल्यावर सर्वच देणी भागविण्यात येईल, या आशेवर खर्चाची उलाढाल करण्यासाठी खासगी सावकाराचा आधार घेतला जातो़ ग्रामीण, शहरी भागात राजरोजसपणे सावकारकी चालू आहे़ शेतकऱ्यांची अडचण पाहून व्याजाचा दर आकारला जातो़ यामध्ये पाच, दहा, पंधरा टक्क्यांपर्यंत व्याजाचा दर असतो़ शेतीचा खर्च व संसाराचा गाडा चालविण्यासाठी आगतिक झालेल्या शेतकऱ्याला सावकारकीचे पाय धरावे लागत आहेत. शेतकऱ्याकडे मासिक व्याज देण्याची व्यवस्थाच नसल्याने त्याचाच गैरफायदा घेत सावकार व्याजावर व्याज लावून चक्रवाढ व्याजाप्रमाणे वर्षाअखेर त्याची रक्कम वसूल करतो़ यावर्षी निसर्गाच्या अवकृपेमुळे हा शेतकरी अडचणीत आला आहे़ पाऊसच नसल्याने विशेषत: ऊस पिकाची वाढ झाली नाही़ त्यामुळे एकरी उताऱ्यात कमालीची घट आलेली आहे़ पीक उत्पादन खर्चात वाढ झाली असताना यंदा उसाचा दरही घसरला आहे़ या एकूणच दृष्टचक्रामुळे शेतकऱ्यांनी सेवा सोसायटी, बँकांचे घेतलेले कर्जही फिटेना़ त्यामुळे बँकेने मार्चअखेर खाती ‘निल’ करण्यासाठी तगादा लावला आहे़ कर्जदार शेतकऱ्यांचे बँकेचेच पैसे फिटत नसल्यामुळे आपले पैसे कधी मिळणार म्हणून खासगी सावकार कर्जदारांच्या पाठी लागला आहे़ या वसुलीच्या तगाद्याने कर्जदार शेतकरी संकटातून शॉर्टकट मार्ग काढण्यासाठी विषाचा प्रयोग करीत आहेत. यातूनच बिनबोभाट चालू असलेली ग्रामीण भागातील खासगी सावकारकी चव्हाट्यावर आली असून, शेतकऱ्यांवर सावकारीचा फास आवळत आहे़घेतलेले कर्ज परत करणे गरजेचे आहे़ मात्र, व्याजाची आकारणी, परिस्थिती याचे भानही सावकराने राखणे तितकेच आवश्यक आहे़ शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर एकदा निर्णय घेण्याऐवजी सावकारांवर अंकुश ठेवून सावकारांच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी वेळीच पावले उचलणे गरजेचे आहे़