शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

‘बिद्री’ च्या सत्तेचा मंगळवारी फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 18:10 IST

बिद्री (ता. कागल) येथील दुधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या सत्तेच्या चाव्या कोणाच्या हातात जाणार, याचा फैसला मंगळवारी होणार आहे. दुपारी तीनपर्यंत संस्था गटाचा निकाल अपेक्षित असून, संपूर्ण निकालासाठी मात्र बुधवारी पहाटेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

ठळक मुद्देदुपारपर्यंत संस्था गटाचा निकाल संपूर्ण निकालासाठी बुधवारची पहाट उजाडणारनिकालाबाबत कमालीची उत्सुकता!

सरवडे : बिद्री (ता. कागल) येथील दुधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या सत्तेच्या चाव्या कोणाच्या हातात जाणार, याचा फैसला मंगळवारी होणार आहे. दुपारी तीनपर्यंत संस्था गटाचा निकाल अपेक्षित असून, संपूर्ण निकालासाठी मात्र बुधवारी पहाटेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

‘बिद्री’साठी रविवारी अत्यंत चुरशीने विविध गटांतील ५८ हजार ८५९ मतदारांपैकी ४७ हजार २७७ (८०.३२ टक्के) मतदारांनी मतदान केले. संस्था गट वगळता सर्वाधिक मतदान गट क्रमांक तीन कागलमध्ये ८५.६४ टक्के मतदान झाले.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार हसन मुश्रीफ व के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील महालक्ष्मी विकास आघाडी व आमदार प्रकाश आबिटकर, संजय मंडलिक व दिनकरराव जाधव यांच्या नेतृत्वाखालील ‘राजर्षी शाहू विकास’ आघाडी यांच्यात सरळ लढत झाली.

दोन्ही आघाडीच्या नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावल्याने निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे. निवडणुकीत झालेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याच्या नजरा लागल्या आहेत.

 मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून लोणार वसाहत येथील रामकृष्ण हॉलमध्ये मतमोजणीस सुरुवात होणार आहे. मोजणी १८७ टेबलांवर होणार असून, पहिल्यांदा संस्था गटाची मोजणी प्रक्रिया होणार आहे.

साधारणत: दुपारी तीन वाजता संस्था गटाचा निकाल अपेक्षित आहे. गत निवडणुकीच्या मतमोजणीत झालेला विलंब व वाढलेले मतदान यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी जादा टेबलांची मांडणी केली आहे. यासाठी ३७४ कर्मचाºयांची नेमणूक केली असून, शंभर कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत.

मतपत्रिकेच्या वर्गीकरणाची प्रक्रिया संपल्यानंतर दुपारी एकनंतरच गटनिहाय मतमोजणीस सुरुवात होईल. त्यामुळे साधारणत: बुधवारी पहाटेपर्यंत संपूर्ण निकाल लागण्याची शक्यता आहे.

निकालाबाबत कमालीची उत्सुकता!

‘बिद्री’चे कार्यक्षेत्र चार तालुक्यांत असले तरी निवडणुकीबाबत जिल्ह्यात उत्सुकता आहे. रविवारी मतदान झाल्याने सोमवारी सकाळपासूनच निकालाची चौकशी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीकडे केली जात होती.