शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
5
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
6
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
7
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
8
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
9
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
10
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
11
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
12
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
13
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
14
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
15
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
16
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
17
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
18
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
19
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार

कबनूरच्या जलस्वराज्य प्रकल्पावरून ‘तू तू - मै मै’

By admin | Updated: June 28, 2016 22:52 IST

पाणीपुरवठा ठप्प : दोन ठिकाणी एकमेकाविरोधी मागण्यांसाठी उपोषण सुरू

इचलकरंजी : कबनूर (ता. हातकणंगले) येथील जलस्वराज्य प्रकल्प ग्रामपंचायतीने घ्यावा व घेऊ नये, अशा दोन्ही एकमेकाविरोधी मागण्यांसाठी दोन विविध ठिकाणी बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. या दोघांच्या भांडणात गावाला मात्र गेल्या दहा दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही. अशा परिस्थितीत ग्रामविकास अधिकारी गायब झाले आहेत, तर स्थानिक नेत्यांनी हात वर केल्याची विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे.कबनूर गावासाठी पिण्याचे पाणी शुद्धिकरण करून मिळावे म्हणून सन २०१० साली जलस्वराज्य प्रकल्प राबविण्यात आला. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ग्रामपंचायतीकडे रितसर वर्ग करणे आवश्यक होते. मात्र, राजकीय वरदहस्ताने नेत्यांनी प्रकल्प आपल्याच ताब्यात ठेवला. सहा वर्षांनंतर आता अध्यक्ष मनोहर मणेरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे सोपविला.मात्र, हा प्रकल्प नियमानुसार चालविण्यात आला नसून, यामध्ये मोठा अपहार झाल्याचा आरोप करीत कृष्णात गोते यांच्यासह सहाजणांनी सोमवारपासून कबनूर चौकात बेमुदत उपोषण सुरू केले. हा प्रकल्प ग्रामपंचायतीने वर्ग करून घेऊ नये; अन्यथा प्रकल्पाची देखभाल दुरुस्ती पंचायतीला स्वखर्चाने करावी लागणार असून, यामुळे ग्रामपंचायतीची आर्थिक घडी विस्कटणार आहे. तसेच या प्रकल्पावर काम करणारे ३३ कर्मचारी आपण या योजनेवर गेल्या अनेक वर्षांपासून अत्यल्प पगारात काम करीत आहोत. त्यामुळे ही योजना सर्व कर्मचाऱ्यांसह ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण करून घ्यावी व कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा कर्मचारी संघटनेद्वारे ग्रामपंचायतीसमोर मंगळवारपासून उपोषण सुरू करण्यात आले आहे.दोन्हीही बाजूने एकमेकाविरोधी भूमिकेसाठी उपोषण सुरू असून, प्रशासन यामध्ये कोणती भूमिका घेणार? व गावाला कधी पाणीपुरवठा होणार? या प्रश्नात ग्रामस्थ गुरफटले आहेत. (वार्ताहर) पाण्यासाठी तीव्र आंदोलनग्रामपंचायतीमध्ये सध्या मणेरे-पी. एम. पाटील गटाची सत्ता आहे. त्यांनी या प्रश्नावर तोडगा काढून तत्काळ पाणीपुरवठा सुरू करावा; अन्यथा गावातील काही संघटना व ग्रामस्थांच्यावतीने गाव बंद करून तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास कबनूरमध्ये पाणी प्रश्नावर तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.