शहरं
Join us  
Trending Stories
1
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
4
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
5
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
6
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
7
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
8
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
9
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
10
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
11
बचाव मोहिमेंतर्गत ताडोबातील गंभीर अवस्थेतील छोटा मटका वाघ जेरबंद; 'ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर'ला हलवलं
12
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
13
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?
14
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
15
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
16
"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम
17
शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
18
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
19
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
20
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी

नळयोजनांचे त्रयस्थ तांत्रिक परीक्षण बंधनकारक

By admin | Updated: June 17, 2015 00:38 IST

राज्य शासनाचा निर्णय : ग्रामीण पेयजल योजनेच्या कामाचा दर्जा, पाण्याची गुणवत्ता वाढणार

राम मगदूम - गडहिंग्लज -राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत नळयोजनांच्या कामांचा दर्जा व पाण्याची गुणवत्ता वाढविण्याबरोबरच जनतेला शाश्वत पाणीपुरवठ्याची हमी देण्यासाठी या योजनांचे ‘त्रयस्थ तांत्रिक परीक्षण’ करून घेणे बंधनकारक झाले आहे. यासंदर्भातील मार्गदर्शक सूचनांचा अध्यादेश जारी झाला आहे.राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत पाणीपुरवठा व स्वच्छता विषयक धोरण ठरविणे, कार्यक्रमाची अंमलबजावणी व देखरेख केली जाते. जिल्हा परिषदा व ग्रामपंचायती या कार्यक्रमाची अंमलबजावणी करणाऱ्या प्रमुख संस्था आहेत.महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि भू-जल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा या राज्यस्तरावरील तांत्रिक संस्थामार्फत तांत्रिक तज्ज्ञ/कर्मचारी तसेच गरजेनुसार तांत्रिक साहाय्य पुरविले जाते. संबंधित संस्थांच्या भूमिका व जबाबदाऱ्या निश्चित असल्या तरी या कार्यक्रमाचे नियोजन, अंमलबजावणी व देखरेख यामध्ये समन्वयाचा अभाव आहे.‘पेयजल’मुळे विकेंद्रीकरणास चालना मिळाली. ९८ हजारपेक्षा खेड्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले. तरीदेखील ३० टक्केपेक्षा कमी घरगुती नळाद्वारे पुरविण्यात येणाऱ्या सेवेची गुणवत्ता हलक्या प्रतीची राहिली आहे. वाढत्या शहरीकरणामुळे सेवा पुरविण्यात राज्यासमोर आव्हाने निर्माण झाली आहेत.या पार्श्वभूमीवर ग्रामीण पाणी पुरवठा योजनांसाठी तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता, अंमलबजावणी, त्रयस्थ तांत्रिक परीक्षण व देखभाल दुरुस्तीबाबत शासनाने सुधारित मार्गदर्शक सूचना पारित केल्या आहेत. त्यामध्ये त्रयस्थ तांत्रिक परीक्षण बंधनकारक असून, त्याची जबाबदारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.समितीत कोण असणार ?स्वतंत्र पडताळणी यंत्रणेत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये, आयटीआय, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण गुणवत्ता व सनियंत्रण पथक व पाणीपुरवठा क्षेत्राशी निगडित अन्य शासकीय संस्थांच्या सेवा घ्याव्यात. त्यांना पाणीपुरवठा व स्वच्छता क्षेत्रातील किमान १० वर्षांचा व तांत्रिक लेखापरीक्षणाचा किमान पचा वर्षांचा अनुभव असावा. त्यांना तांत्रिक मानके, कायदे व शासन निर्णय यांचे संपूर्ण ज्ञान असावे. समितीत किमान १० सदस्य व संस्थात्मक विकासतज्ज्ञही असावा. या समितीची मुदत तीन वर्षे राहील. त्रयस्थ यंत्रणेची हमीदोन कोटीपर्यंतच्या योजनेसाठी ५ लाख, २ ते ७.५० कोटीपर्यंतच्या योजनेसाठी १० लाख व ७.५० कोटीहून अधिक किमतीसाठी १५ लाख इतके शुल्क ठोक स्वरूपात जिल्हा परिषदेकडील ४ टक्के प्रशासकीय निधीतून या समितीला अदा करण्यात येईल. मात्र, तपासणी अहवाल हा अचूक, वेळेवर व वस्तुनिष्ठ पुराव्यावर आधारित असल्याची हमी त्रयस्थ यंत्रणेने देणे अनिवार्य आहे.