शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

पाणी प्रकल्प भूसंपादनासाठी तिप्पट भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 01:03 IST

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्फनाला, आंबे ओहोळ आणि नागनवाडी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जमीन उपलब्ध होत नसल्याने या प्रकल्पांचे काम अडले आहे. त्यामुळे पुनर्वसनासाठी जमीन देणाऱ्यांना बाजारभावापेक्षा तिप्पट नुकसानभरपाई देण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. त्यावर निर्णय घेऊन पावसाळ्यानंतर या सर्व प्रकल्पांची अंतिम टप्प्यातील कामे सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती ...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्फनाला, आंबे ओहोळ आणि नागनवाडी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जमीन उपलब्ध होत नसल्याने या प्रकल्पांचे काम अडले आहे. त्यामुळे पुनर्वसनासाठी जमीन देणाऱ्यांना बाजारभावापेक्षा तिप्पट नुकसानभरपाई देण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. त्यावर निर्णय घेऊन पावसाळ्यानंतर या सर्व प्रकल्पांची अंतिम टप्प्यातील कामे सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाणी टंचाई आढावा बैठकीत दिली.जिल्ह्यातील प्रलंबित पाणी प्रकल्प पूर्ण करण्याची गरज शुक्रवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या टंचाई आढावा बैठकीत व्यक्त करण्यात आली. यावेळी चंद्रकात पाटील म्हणाले, सातारा जिल्ह्यातील एका प्रकरणामध्ये संबंधित जमीन देणाºयांना बाजारभावाच्या तिप्पट रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला. याच पद्धतीने या तिन्ही प्रकल्पांच्या बाबतीत प्रस्ताव तयार केले असून ते शासनाकडे सादर केले आहेत. त्यावरच निर्णय झाला की त्यानुसार संबंधित शेतकºयांना पैसे अदा केले जातील. त्यामुळे शेतकºयांचे प्रश्न संपतील. पावसाळ्यानंतर या प्रकल्पांच्या उर्वरित कामांनाही सुरुवात करता येणार आहे. धामणी प्रकल्पाबाबत जुना ठेकेदार न्यायालयात गेल्याने अडचण निर्माण झाली आहे. तो निकाल लागल्यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई नाही आणि अगदीच जिथे गरज असेल तेथे टँकर दिला जाईल, असे यावेळी मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.बैठकीला आमदार हसन मुश्रीफ, डॉ. सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, संध्यादेवी कुपेकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील, किरण पाटील, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता एस. एस. शिंदे उपस्थित होते.चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्ह्यात मोठ्या व मध्यम प्रकल्पांमध्ये ४४ टक्के तर लघु प्रकल्पांमध्ये ३७ टक्के असा एकूण १०८० दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. चिकोत्रा व चित्री प्रकल्पातील पाण्याची पातळी गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे २२ मेपासून सिंचनासाठी उपसा बंदी प्रस्तावित करण्यात आली आहे व हा पाणीसाठा पिण्यासाठी राखीव करण्यात आला आहे.आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, चित्री, चिकोत्रा पट्ट्यातील गावांची काय अवस्था आहे याचा जरा मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दौरा करावा. अपुºया पाणी प्रकल्पांमुळेच ही परिस्थिती उद्भवल्याचे मुश्रीफ यांनी वारंवार सांगितले. आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी काही गावांमध्ये कूपनलिकांची मागणी करत पाझर तलावांचाही मुद्दा उपस्थित केला तेव्हा तशी गावांची यादी प्रशासनाकडे द्या, असे त्यांना पालकमंत्र्यांनी सांगितले. आमदार सुजित मिणचेकर म्हणाले, आमच्या भागातील काही गावांमध्ये लोकसहभागातून कामे सुरू आहेत, त्याला शासनाने सहकार्य करावे. आमदार उल्हास पाटील यांनी यावेळी चालू असलेल्या कामांवरील यंत्रणा आजच काढून घेतल्याची तक्रार केली तर गतवर्षी पावसाळा सुरू झाल्यावर काम सुरू करण्यासाठी यंत्रणा मिळाल्याचे सांगितले.दादांनी मांडला सौर योजनेचा हिशेबसौर योजनेवर कूपनलिकांचे पाणी साठवून वितरित करण्याच्या जिल्हा परिषदेच्या योजनेची यावेळी माहिती देण्यात आली. एका प्रकल्पासाठी ५ लाख रुपये खर्च येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले तेव्हा पालकमंत्र्यांनी ५ लाखांचे वर्षाचे ८ टक्क्यांनी व्याज धरले तर ४० हजार रुपये होतात. एवढा खर्च वीज बिलालादेखील येणार नाही, असे सांगत हा हिशेब मला पटत नसल्याचे सांगितले.मुश्रीफांचा १५ वर्षांचा अनुभवया सौरउर्जेवरील योजनेचे पुढच्या वर्षी काय झाले ते सांगा, असे मुश्रीफांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांना सांगितल्यानंतर पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘मुश्रीफ यांना १५ वर्षांचा अनुभव आहे. त्यांच्या सरकारी योजना चालत नाही असा हा अनुभव आहे,’ असा टोला लगावला.एजंटांचा सुळसुळाटसौरऊर्जेवरील योजनेचा हिशेब पटत नसल्याने अशा कोणत्याही योजना कुणीही घेऊन येतो, त्यावर एजंटांचा सुळसुळाट झालाय, असे मुश्रीफ म्हणाले तेव्हा मंत्री पाटील यांनी ‘खूप असे सांगत कोणीही येतो आणि प्रेंझेंटेशन देतो’ असे सांगत याबाबत नाराजी व्यक्त केली.टंचाई जाणवल्यास टॅँकरपिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवल्यास तहसीलदारांनी एका दिवसात तेथे टँकर द्यावा, अशा सूचना करून पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पाण्याची स्थिती चांगली आहे. मे महिन्यापूर्वी करावयाच्या उपाययोजनांमध्ये तलाव, विहिरींमधील गाळ काढणे, विंधन विहिरी नव्याने घेणे अशी विविध ३३९ कामे होणार असून त्यासाठी २ कोटी ३२ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.