शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

‘भोगावती’त तिरंगी लढत शक्य

By admin | Updated: January 9, 2017 00:58 IST

निवडणुकीची रणधुमाळी : दोन काँग्रेससह चरापलेंचीही मोर्चेबांधणी

सुनील चौगले ल्ल आमजाई व्हरवडेपरिते (ता. करवीर) येथील भोगावती साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली. सध्या राजकीय घडामोडी पाहता दोन्ही कॉँग्रेसच्या विरोधात माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले आघाडीच्या तयारीत असल्याने ‘भोगावती’ला तिरंगी लढतीचे संकेत आहेत.गत निवडणुकीत राष्ट्रवादीने मित्रपक्षांना बरोबर घेऊन कॉँग्रेसची वीस वर्षांची सत्ता संपुष्टात आणून प्रथमच ‘भोगावती’वर राष्ट्रवादीचा झेंडा फडकावला. गेल्या आठ-दहा वर्षांपासून येथील राजकारण्यांच्या चुकीच्या निर्णयाने कारखाना आर्थिक संकटात आला आहे. ५२ गावांचे कार्यक्षेत्र तसेच करवीर व राधानगरी तालुक्यातील ३० हजार सभासदांनी मोठ्या अपेक्षेने ‘राष्ट्रवादी’च्या ताब्यात सत्ता दिली, पण संचालक मंडळाकडून कारखाना ऊर्जितावस्थेत येण्याची आशा असताना गेल्या दहा वर्षांत तो आणखीनच आर्थिक गाळात रूतला. कारखान्यावर दोनशे कोटींपेक्षा जास्त कर्जाचा डोंगर असल्याचा आरोप होत आहे. संचालकांनी केलेली नोकरभरती राष्ट्रवादीला अडचण निर्माण करत आहे. निवडणुकीत पुन्हा राष्ट्रवादीचे पॅनेल करताना ए. वाय. पाटील यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहणार आहे. यंदा ते शेकाप, जनता दल, शिवसेना यांना घेऊनच विरोधकांना तगडे आव्हान देणार हे निश्चित !कॉँग्रेसकडूनही जोरदार मोर्चेबांधणी करताना कॉँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष पी. एन. पाटील सावध पावले उचलत आहेत. ते पॅनेलमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या तयारीत आहेत. भोगावती शिक्षण मंडळातील गेल्या पाच-सहा वर्षांपासूनच्या कारभाराने खुद्द नेतेच नाराज आहेत. त्यामुळे ते स्वच्छ प्रतिमेच्या चेहऱ्याच्या शोधात आहेत. सध्या कॉँग्रेसकडे उदयसिंह पाटील (कौलवकर) यांच्यासारखा स्वच्छ प्रतिमेचा चेहरा आहे. त्यांच्याबद्दल असणाऱ्या सहानुभूतीमुळे पी. एन. पाटील यांना सत्ता मिळविणे सोपे होेणार आहे. सध्या कॉँग्रेसकडे उमेदवारी देताना पक्ष नेतृत्वाला कसरत करावी लागणार आहे. वर्षभरापासून माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले तिसऱ्या आघाडीसाठी मोर्चेबांधणी करत आहेत. त्यादृष्टीने त्यांनी मेळावे घेऊन भूमिका स्पष्ट केली. आमदार सतेज पाटील यांचे नेतृत्व मानून ते तिसऱ्या आघाडीची मोट बांधत आहेत. राष्ट्रवादीने कारखान्यात, तर कॉँग्रेसने शिक्षण मंडळात केलेला कारभार ते सभासदांसमोर आणणार आहेत. आज दोन्ही कॉँग्रेससह अनेक पक्षांचे कार्यकर्ते त्यांच्या संपर्कात आहेत. सतेज पाटील यांनी मात्र अजूनही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाइं, भाजपमध्ये अजून शांतताच आहे. ते कोणाबरोबर जाणार की स्वतंत्र आघाडी करणार हे लवकरच स्पष्ट होईल. ‘ए . वाय.’चा करिश्मा पुन्हा चालणार ?मागील सत्ता ही ए. वाय. पाटील यांच्या मुरब्बी राजकारणानेच राष्ट्रवादीला मिळाली होती. मात्र, राष्ट्रवादीच्या व मित्रपक्षांच्या काही संचालकांनी केलेला अनागोंदी कारभार, पुत्रप्रेमाने पछाडलेल्यांनी पात्रता नसताना पुत्रांना दिलेले प्रमोशन राष्ट्रवादी आघाडीला घातक ठरणार आहे. त्यामुळे अशा संचालकांना घरचा रस्ता दाखवून नवीन चेहऱ्यांना संधी दिली तर ए. वाय. पाटील पुन्हा राष्ट्रवादीला सत्ता मिळविण्याचा करिश्मा करू शकतील हे निश्चित !नेतृत्व उदयसिंह पाटील यांच्याकडेकॉँग्रेसने सत्ता मिळविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली. स्वच्छ प्रतिमा असणारे उदयसिंह पाटील (कौलवकर) यांच्याकडे भोगावतीचे नेतृत्व देण्याचा विचार खुद्द पी. एन. पाटीलच करत असल्याने भोगावतीला स्वच्छ प्रतिमेच्या नेतृत्वाचे संकेत आहेत. आज कौलवकरच कॉँग्रेसला सत्ता मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलणार.