शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

वृक्ष वल्ली आम्हा सोयरे, वनचरे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 23:36 IST

भारत पाटील ‘वृक्ष वल्ली आम्हा सोयरे, वनचरे! पक्षी ही सुस्वरे, आळविती!’ संत तुकाराम यांनी मानवाच्या जीवनामध्ये वृक्ष किती महत्त्वाचा ...

भारत पाटील‘वृक्ष वल्ली आम्हा सोयरे, वनचरे! पक्षी ही सुस्वरे, आळविती!’ संत तुकाराम यांनी मानवाच्या जीवनामध्ये वृक्ष किती महत्त्वाचा आहे हे गाथेमध्ये सांगितले आहे. ‘झाडे तो लेकुरें आपुली! लेकरासारखी जपावी!’ असं छत्रपती शिवाजी महराज यांना वाटत होतं. आपण स्वतंत्र भारताचे सुधारलेले नागरिक आहोत. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला कधी अथर्पूणर्ता येईल? जेव्हा स्वच्छता, पर्यावरण समृद्धी आणि स्वयंपूर्णत: येईल त्यावेळी. आपल्या पूर्वजांनी आदर्श विकसित समाजाची स्वप्नं बघितली होती, यासाठी त्यांनी आपलें सगळे आयुष्य वेचले होते. त्यांनी दिलेल्या कृतिशील विचारांच्या शिदोरीवर आपण आज आपली गावे व आपला समाज समृद्ध करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्या खांद्यावर आहे. ‘राष्ट्र आपणाला काय देतं? यापेक्षा आपण राष्ट्राला काय देतो?’ हा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे. भारतीय संस्कृती पर्यावरण व निसर्गाला आपला बंधू, सखा व देव मानणारी पवित्र संस्कृती आहे आणि याच पवित्र संस्कृतीतील खेड्यांत, शिवारात राहणारी व या मातीत घाम गाळून स्वत:ला घडविणारी आपण सारी माणसं आहोत. निसर्गाने आपणाला भरभरून दिले आहे; परंतु आपण मात्र निसर्गाची किती काळजी करतो? ‘आपल्या कर्म दरिद्रीपणामुळे आपण साऱ्यांनी पर्यावरणाची वाट लावली आहे.’ यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. निसर्गचक्र उद्ध्वस्त केले आहे. यामुळे सगळे मानवी जीवन संकटात आले आहे. पाणी, हवा, ग्लोबल वॉर्मिंग व प्रदूषण या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ‘एक झाड आपणाला काय काय देते? याचा मात्र आपण कधीही विचार करीत नाही.’ झाड आपणाला आॅक्सिजन देते व हा प्राणवायू आपणाला आजूबाजूला असलेल्या झाडांपासून फुकट मिळत असतो. यामुळे आपणाला त्याची अजिबात किंमत वाटत नाही. म्हणूनच आपण झाडांची बेसुमार कत्तल करीत सुटलो आहोत. झाडे लावण्यापेक्षा आपणाला ती तोडण्यातच आनंद वाटत आहे. या चुकीच्या मानसिकतेमुळे आज समस्त मानव जात धोक्यात आली आहे. झाड म्हणजे एक गाव असते. असंख्य फांद्यांवर अगणित पाने व फुले जशी गुण्यागोविंदाने नांदतात, एक पान दुसºया पानासंगे कधीही भांडत नाही. ‘एका झाडाचे खोड कधी दुसºया खोडाशी कोर्ट कज्जा खेळत नाही.’ हेच झाड आपणाला सावली देताना बाप असतं. फळ देताना ते आई होतं. पक्षांना आसरा देतं, तर माणसाच्या पिढ्यान्पिढ्या सातत्याने जगवत आहे. झाड आपणाला फळे, फुले, लाकूड, निवारा, औषधे, पाऊस, सावली तर देतच आहे; पण आई-बापाचे प्रेम व संस्कृती सुद्धा झाड आपणाला देत आहे. जमिनीतील पाण्याची पातळी टिकवून आपली तहान पण भागवत आहे. भविष्यातील या संकटाला सामोरे जात असताना आपण साऱ्यांंनी ‘पर्यावरण समतोल व निसर्गचक्र याविषयी सर्वांची जशी आई मुलांचे संगोपन करते. त्या भावनेने आपण प्रत्येक मनुष्याने झाडांचे संगोपन केले पहिजे.’ अजूनही पन्हाळ्याच्या दोन्ही बांधारीमधील राक्षी, निकमवाडी, धबधबेवाडी, सोमवारपेठ, इंजौळे, खडेखोल, दळवेवाडी, बंदिवडे, करंजफेण व पलीकडील बुधवारपेठ, नेबापूर, आपटी, जेऊर, वेखंडवाडी, बादेवाडी, बोरिवडे परिसरामध्ये भरपूर झाडं लावली पाहिजेत, असे मला वाटते. यामुळे बºयाच समस्या सुटतील. यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे हे तेथील सर्वसामान्य लोकांच्या हिताचे आहे, असे मला वाटते. २00५/६ मध्ये पाऊस खूप झाला होता. ‘त्यावेळी बुधवारपेठपासून मसाई पठारपर्यंत 3 इंचांपासून ते 3.५ मीटरपर्यंतच्या भेगा पडल्या होत्या.’ आपटी गावात तलावाशेजारी जमिनीचे भूस्खलनही झाले होते. त्यात बºयाच घरांचे नुकसान झाले होते. त्यावेळी सरपंच विश्वास पाटील यांनी खूप मेहनत घेतली होती. नावली पैकी धारवाडी येथे जमीन घसरली होती. तसेच मराठवाडी व केकतवाडी येथील डोंगर सरकला होता. यामुळे तेथील लोकांचे वास्तव्यच धोक्यात आले होते. या दोन्ही वाड्यांचे पुनर्वसन करण्याची वेळ आली होती. तशी ही पन्हाळा व दोन्ही बांधारींसाठी धोक्याची घंटा आहे. ही गंभीर बाब आहे. त्यावेळी जिल्हाधिकारी प्रवीण दराडे, विकास देशमुख, तहसीलदार समीर शिंगटे व माझी सगळी पंचायत समिती आणि जिआॅलॉजिस्ट्स मोरे यांचे खूप मोठे सहकार्य झाले होते. नैसर्गिक आपत्तीवेळी अधिकारी व लोकप्रतिनिधी मनापासून एक होऊन काम करण्याचा अनुभव मला खूप काही शिकवून गेला. ‘ग्रामपंचायतमध्ये आता वृक्षांची नोंदवही ठेवलीच पहिजे. प्रत्येक गावात गाव तिथे रोपवाटिका निर्माण केली पहिजे.’ दरवर्षी गावात दरमाणशी झाडं लावली पाहिजेत.(लेखक ग्रामविकास व व्यसनमुक्तीचळवळीतील बिनीचे कार्यकर्ते आहेत)